AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी ! पंढरपुरात अखेर 300 वारकऱ्यांना परवानगी, विसाव्यापासून मठापर्यंत मानाच्या पालख्या पायी जाणार

आषाढी वारीवर यंदाही कोरोनाचं सावट आहे. पण गेल्यावर्षी पेक्षा यावर्षी पोलीस प्रशासनाने वारकऱ्यांसाठी थोडी मुभा दिली आहे.

मोठी बातमी ! पंढरपुरात अखेर 300 वारकऱ्यांना परवानगी, विसाव्यापासून मठापर्यंत मानाच्या पालख्या पायी जाणार
आषाढी वारी पालखी सोहळा (प्रातिनिधिक फोटो)
| Edited By: | Updated on: Jul 19, 2021 | 10:21 PM
Share

पंढरपूर : आषाढी वारीवर यंदाही कोरोनाचं सावट आहे. पण गेल्यावर्षा पेक्षा यावर्षी पोलीस प्रशासनाने वारकऱ्यांसाठी थोडी मुभा दिली आहे. पंढरपुरात मानाच्या दहा पालख्या लवकरच दाखल होतील. दरवर्षीसारखा जरी जल्लोष होणार नसला तरी प्रत्येक पालखीसोबत यावर्षी 30 वारकऱ्यांना परवानगी देण्यात आली आहे. पोलीस प्रशासनाने विसाव्यापासून मठापर्यंत पालख्यांना पायी घेऊन जाण्यास परवानगी दिली आहे. त्याचबरोबर प्रत्येक पालखीसोबत 30 वारकऱ्यांना सहभागी होण्यास मुभा देण्यात आली आहे. त्यामुळे दहा मानाच्या पालख्यांसोबत प्रत्येकी 30 असे एकूण 300 वारकऱ्यांना आता वारीत सहभागी होता येणार आहे. प्रशासनाच्या या निर्णयाबद्दल वारकऱ्यांनी समाधान व्यक्त केलं आहे.

पालख्या विसाव्यापासून मठापर्यंत चालत जाणार

मानाच्या दहा पालख्यांचे प्रमुख आणि पोलीस यांच्यात आज संध्याकाळी महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत प्रत्येक मानाच्या पालखीसाठी 30 असे एकूण 300 वारकऱ्यांना परवानगी देण्यात आली. या बैठकीत आळंदी पालखीचे प्रमुख विकास ढगे यांच्यासह इतर पालखी प्रमुखांनी प्रत्येक पालखीसोबत 40 वारकऱ्यांना परवानगी देण्याची विनंती केली. पण कोरोना संक्रमनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी प्रत्येकी 30 वारकऱ्यांसाठी परवानगी दिली. या निर्णयामुळे आता पालख्या विसाव्यापासून मठापर्यंत चालत जातील.

वारकऱ्यांची प्रतिक्रिया काय?

या बैठकीनंतर आळंदी पालखीचे प्रमुख विकास ढगे यांनी ‘टीव्ही 9 मराठी’सोबत बातचित केली. यावेळी त्यांनी प्रशासनाच्या निर्णयावर समाधान व्यक्त केलं. “वाखरी पासून पंढरपूर पर्यंत प्रत्येक मानाच्या पालखीसोबत 40 वारकऱ्यांना परवानगी मिळावी, अशी आमची मागणी होती. ती मागणी कदाचित मान्यही झाली असती. पण आता एकंदरीतच उशिर झाला आहे. त्याचबरोबर वारकऱ्यांचा विचार करता लवकर निर्णय होणं गरजेचं होतं”, अशी प्रतिक्रिया विकास ढगे यांनी दिली.

“आम्ही पायी वारी झाली असती तरच समाधानी झालो असतो. पण यावर्षाची एकंदरीत परिस्थिती विचारत घेऊन आम्ही सर्वांनी घेतलेला निर्णय आहे. त्यामुळे दुधाची तहान ताकाने भागावे अशाप्रकारची स्थिती आहे. पण तरीदेखील शासनाने सकारात्मक पाऊल उचलून 40 पैकी 30 वारकऱ्यांना परवानगी दिली. त्यामुळे याबाबत समाधान व्यक्त करण्यात हरकत नाही”, असंदेखील ते यावेळी म्हणाले.

पोलिसांची भूमिका

या बैठकीनंतर पोलीस प्रशानाकडून प्रतिक्रिया देण्यात आली. “अतिशय चांगल्याप्रकारे चर्चा झाली आहे. वारकर संप्रदायानेसुद्धा सहकार्याचील भूमिका घेतली आहे. वारकरी संप्रदायाकडून एक प्रस्ताव आला होता. विसाव्यापर्यंत बसने नंतर पायी पालखी नेण्याची परवानगी मागितली होती. त्यांचा हा प्रस्ताव मान्य करण्यात आला आहे. त्यामुळे प्रत्येक पालखीसाठी 30 असे दहा मानाच्या पालख्यांसाठी एकूण 300 वारकऱ्यांना परवानगी देण्यात आली आहे”, असं पोलिसांनी सांगितलं.

या आहेत मानाच्या 10 पालख्या

1) संत निवृत्ती महाराज (त्र्यंबकेश्वर )

2) संत ज्ञानेश्वर महाराज ( आळंदी )

3) संत सोपान काका महाराज ( सासवड )

4) संत मुक्ताबाई ( मुक्ताईनगर )

5) संत तुकाराम महाराज ( देहू )

6) संत नामदेव महाराज ( पंढरपूर )

7) संत एकनाथ महाराज ( पैठण )

8) रुक्मिणी माता ( कौडानेपूर -अमरावती )

9) संत निळोबाराय ( पिंपळनेर – पारनेर अहमदनगर)

10) संत चांगाटेश्वर महाराज ( सासवड) (Maharashtra State Road Transport Corporation will provide buses for ashadhi wari, says anil parab)

संबंधित बातमी : मातोश्री ते पंढरपूर, उभ्या पावसात स्वत: ड्रायव्हिंग, बाजूला रश्मी ठाकरे, मुख्यमंत्री पंढरपूरकडे रवाना

Follow Us
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध.
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्...
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्....
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात..
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात...
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,.
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल.
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी.
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा.
रितेश- जेनेलियाच्या हाती लालपरीचे स्टेरिंग, देशमुख कपल करणार एसटी....
रितेश- जेनेलियाच्या हाती लालपरीचे स्टेरिंग, देशमुख कपल करणार एसटी.....
अमरावतीच्या लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयानची पोलिसांनी काढली धिंड
अमरावतीच्या लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयानची पोलिसांनी काढली धिंड.
व्हायरल व्हिडिओनंतर गिरीश महाजनांचं स्पष्टीकरण काय?
व्हायरल व्हिडिओनंतर गिरीश महाजनांचं स्पष्टीकरण काय?.