AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gadchiroli | गडचिरोली जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गाची चाळण, अपघाताचे प्रमाण वाढले, मुख्यमंत्र्याच्या आदेशाला प्रशासनाने दाखवली केराची टोपली!

प्रवास करताना जीवाला धोका व अपघाताला निमंत्रण देणारे खड्डे महामार्गावर आहेत. तसेच खड्ड्यांमुळे 100 किलोमीटरच्या प्रवासासाठी पाच तासांपेक्षाही अधिक वेळ लागतोयं. यामुळे वाहनांच्या रांगाच रस्त्यावर लागत आहे. इतकेच नाही तर जड वाहनांमुळे अधिक वेळ प्रवाश्यांचा जात असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी जड वाहनास या रस्त्यावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.

Gadchiroli | गडचिरोली जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गाची चाळण, अपघाताचे प्रमाण वाढले, मुख्यमंत्र्याच्या आदेशाला प्रशासनाने दाखवली केराची टोपली!
Image Credit source: tv9
| Edited By: | Updated on: Jul 25, 2022 | 1:17 PM
Share

गडचिरोली : गडचिरोली (Gadchiroli) जिल्ह्यातील अनेक राष्ट्रीय महामार्गाची परिस्थिती गंभीर आहे. राष्ट्रीय महामार्गाची चाळण झाली असून मोठं मोठे खड्डे पडले आहेत. रस्त्यावरील खड्ड्याच्या साम्राज्यामुळे गडचिरोलीचे जिल्हाधिकारी संजय मीना (Collector Sanjay Meena) यांनी आलापल्ली ते सिरोंचा 100 किलोमीटरच्या राष्ट्रीय महामार्गावर जड वाहतूकीस बंदी घालण्याचा निर्णय देखील घेतला आहे. महामार्गावरील (Highway) खड्ड्यांमुळे अपघाताच्या घटनांमध्ये देखील वाढ झालीयं. जड वाहतूकीमुळे रस्ता दिवसेंदिवस अधिकच खराब होत आहे. पावसामुळे तर रस्त्याचे तीनतेराच वाजले आहेत.

खड्ड्यांमुळे 100 किलोमीटरच्या प्रवासासाठी पाच ते सहा तास

गडचिरोली जिल्ह्यातील सतत 10 ते 12 दिवस अनेक भागात मुसळधार पाऊस होता. या पावसाच्या फटक्यामुळे नदी व नाल्यांना मोठ्या प्रमाणात पूर आल्याने पुरामुळे गडचिरोली जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गसह 6 राज्य महामार्ग आणि अनेक दुर्गम भागातील रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. या खड्ड्यांमुळे 100 किलोमीटरच्या प्रवासासाठी पाच ते सहा तास प्रवाशांना लागत असून जिल्ह्यातील चार ते पाच तालुक्यातील प्रवाश्यांना मोठी अडचण निर्माण होत आहे.

प्रवास करताना जीवाला धोका व अपघाताला निमंत्रण देणारे खड्डे

प्रवास करताना जीवाला धोका व अपघाताला निमंत्रण देणारे खड्डे महामार्गावर आहेत. तसेच खड्ड्यांमुळे 100 किलोमीटरच्या प्रवासासाठी पाच तासांपेक्षाही अधिक वेळ लागतोयं. यामुळे वाहनांच्या रांगाच रस्त्यावर लागत आहे. इतकेच नाही तर जड वाहनांमुळे अधिक वेळ प्रवाश्यांचा जात असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी जड वाहनास या रस्त्यावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. रस्त्यावरील खड्डे लवकरात लवकर बुजून रस्त्याची दुरूस्थी करावी अशी मागणी आता ग्रामस्थ करताना दिसत आहेत.

मुख्यमंत्र्यांच्या आदेशाला केराची टोपली

या राष्ट्रीय महामार्गावर मागील तीन वर्षात 60 लोकांच्या जीव गेल्याची धक्कादायक आकडेवारी पुढे आलीयं. या राष्ट्रीय महामार्गाच्या कामाच्या निष्काळजीपणामुळे कोर्टात जनहित याचिका संतोष काटे यांनी दाखल केलीयं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आदेश देऊनही अद्याप या राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू झालेले नाही. एकनाथ शिंदे यांनी या राष्ट्रीय महामार्गाचे काम ताबडतोब करण्याचे आदेश प्रशासनाला दिले होते. मात्र, मुख्यमंत्र्याच्या आदेशाला केराची टोपली दाखवण्यात आलीयं. अजूनही महामार्गाचे काम सुरू करण्यात न आल्याने आर्श्चय व्यक्त केले जातंय.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.