AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chandrapur Rain | चंद्रपूर जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू, गेल्या 24 तासात 50 मिलिमीटर पावसाची नोंद…

चंद्रपूर जिल्ह्यात ब्रह्मपुरी तालुक्यात गेल्या 24 तासात 127 मिलिमीटर एवढ्या सर्वाधिक पावसाची नोंद करण्यात आलीयं. राज्यात सध्या सर्वच ठिकाणी पावसाचा जोर वाढल्याचे चित्र आहे. पुढील काही तासात चंद्रपूरसह विदर्भातील काही जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आल्याने मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

Chandrapur Rain | चंद्रपूर जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू, गेल्या 24 तासात 50 मिलिमीटर पावसाची नोंद...
| Edited By: | Updated on: Aug 09, 2022 | 3:20 PM
Share

चंद्रपूर : चंद्रपूर (Chandrapur) जिल्ह्यात पावसाची संततधार सुरूयं. वर्धा नदीवर अमरावती-यवतमाळ जिल्ह्यात बांधलेल्या अप्पर व लोअर वर्धा या धरणांमधून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने नद्यांच्या पाणी पातळीत मोठी वाढत झालीयं. महिनाभरात तिसऱ्यांदा महाराष्ट्राचा (Maharashtra) तेलंगणाशी संपर्क तुटला आहे. बल्लारपूर शहराजवळच्या वर्धा नदी पुलावर पुराचे पाणी चढल्याने वाहतूक ठप्प झाली असून प्रवाशांना अडकून पडावे लागले आहे. वर्धा नदीच्या पुरामुळे आसपासच्या सर्वच पुलांवर पाणी (Water) चढल्याने वाहतूक ठप्प झाल्याचे चित्र सध्या जिल्हात बघायला मिळते आहे.

चंद्रपूर जिल्ह्यात ब्रह्मपुरी तालुक्यात गेल्या 24 तासात 127 मिलिमीटर पावसाची नोंद

चंद्रपूर जिल्ह्यात ब्रह्मपुरी तालुक्यात गेल्या 24 तासात 127 मिलिमीटर एवढ्या सर्वाधिक पावसाची नोंद करण्यात आलीयं. राज्यात सध्या सर्वच ठिकाणी पावसाचा जोर वाढल्याचे चित्र आहे. पुढील काही तासात चंद्रपूरसह विदर्भातील काही जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आल्याने मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. चंद्रपूर जिल्हात पुढील काही तास पावसाचा जोर वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

पुढील काही तासांमध्ये नदीच्या पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता

वर्धा, इरई व पैनगंगा या नदीकाठच्या गावांना प्रशासनाने अतिसतर्कतेचा इशारा दिलायं. कारण पुढील काही तासांमध्ये नदीच्या पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता आहे. गेल्या चार ते पाच दिवसांपासून चंद्रपूर जिल्ह्यात पावसाची संततधार सातत्याने सुरू आहे. तसेच धरण पाणलोट क्षेत्रामध्ये देखील सातत्याने पावसाचा जोर वाढताना दिसतो आहे. यामुळे आता धरणातील पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आलायं.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.