AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पायातलं हाता घ्या, राजू शेट्टींची 23 ऑगस्ट रोजी आक्रोश मोर्चाची हाक

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी आक्रोश मोर्चाची हाक दिली आहे. येत्या 23 ऑगस्ट रोजी हा मोर्चा निघणार आहे. (Raju Shetti calls morcha against maha vikas aghadi)

पायातलं हाता घ्या, राजू शेट्टींची 23 ऑगस्ट रोजी आक्रोश मोर्चाची हाक
राजू शेट्टी,स्वाभिमानी शेतकरी संघटना
| Edited By: | Updated on: Aug 21, 2021 | 10:44 AM
Share

कोल्हापूर: स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी आक्रोश मोर्चाची हाक दिली आहे. येत्या 23 ऑगस्ट रोजी हा मोर्चा निघणार आहे. शेतकऱ्यांनी पायातलं हातात घ्यावं आणि मोर्चात सामिल व्हावं, असं आवाहन राजू शेट्टी यांनी शेतकऱ्यांना केलं आहे. त्यामुळे या मोर्चाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. (Raju Shetti calls morcha against maha vikas aghadi)

राजू शेट्टी यांनी 23 ऑगस्ट रोजी आक्रोश मोर्चाची हाक दिली होती. त्यावर राजीव गांधी जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमात ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी शेट्टींना थोडं थांबण्याचं आवाहन केलं होतं. मात्र, शेट्टी हे मोर्चा काढण्यावर ठाम आहेत. सरकार वेळकाढूपणाचं धोरण अवलंबत आहे. शेतकऱ्यांना गंडवण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे हा मोर्चा निघणारच. आता थांबणं शक्य नाही, असं शेट्टी यांनी सांगितलं. आघाडी सरकारकडून फसवणूक होत आहे असं वाटत असेल तर शेतकऱ्यांनो पायातलं हातात घ्या आणि या मोर्चात सामील व्हा, असं आवाहनही शेट्टी यांनी बळीराजाला केलं आहे.

फक्त आश्वासनं देतात

संपूर्ण पीक कर्जमाफीसह पूर पट्ट्यातील घरांचं विना अट संपूर्ण पुनर्वसन करण्याची प्रमुख मागणी खासदार राजू शेट्टी यांनी केलीय. त्यामुळे 23 ऑगस्टपर्यंत सरकारनं नुकसान भरपाईचं धोरण ठरवावं, अन्यथा पुढचा निर्णय मोर्चावेळी जाहीर करु, असा इशारा राजू शेट्टी यांनी सरकारला दिला होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार फक्त आश्वासनं देऊन गेले. ज्यांना शेती कळत नाही त्यांनी मदत केली. मात्र, ज्यांना ती कळते त्यांनी मदत द्यायला टाळाटाळ केली, अशा शब्दात राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडीला टोला लगावला होता.

मी मदत करणारा मुख्यमंत्री- उद्धव ठाकरे

महापुरानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोल्हापुरात येत पूरस्थितीची पाहणी केली होती. त्यावेळी मी यापूर्वीही सांगितलं आहे की मी सवंग लोकप्रियतेसाठी कोणतीही घोषणा करणार नाही. पण सगळ्या पूरग्रस्तांना नक्की मदत करेन. आपण पॅकेज जाहीर करणारा मुख्यमंत्री नसल्याचं म्हणत मी मदत करणारा मुख्यमंत्री आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले होते.

सरकारकडून मदतीची घोषणा

दरम्यान, 3 ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत पूरग्रस्तांसाठी 11 हजार 500 कोटी रुपयांचं पॅकेज जाहीर करण्यात आलं आहे. त्यावेळी कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील पूरस्थितीचा आढावा घेण्यात आला. यावेळी नुकसानीचं सादरीकरणही करण्यात आलं. त्यानंतर पूरग्रस्तांसाठी मदत करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला. अतिवृष्टीमुळे राज्यात पुरामुळे झालेल्या नुकसानीपोटी तातडीची मदत तसेच दुरुस्ती व इतर दीर्घकालीन उपायांसाठी 11 हजार 500 कोटी रुपये खर्चास मान्यता देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. (Raju Shetti calls morcha against maha vikas aghadi)

संबंधित बातम्या:

अकोटच्या 18 वर्षीय अपंग मुलाचा सर्पदंशाने मृत्यू, कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर, पंचक्रोशीत हळहळ

भाजप आमदाराकडून पहिल्यांदाच MIM च्या खासदाराचं कौतुक, महाराष्ट्रात चर्चेचा विषय

उच्च न्यायालयाने सूचित केल्यानंतर तरी राज्यपाल 12 आमदारांची नियुक्ती करतील, राष्ट्रवादी काँग्रेसचा जोरदार टोला

(Raju Shetti calls morcha against maha vikas aghadi)

Follow Us
कोकण किनारपट्टीवर वादळी पावसाचा इशारा, शेतकरी चिंतेत
कोकण किनारपट्टीवर वादळी पावसाचा इशारा, शेतकरी चिंतेत.
मोठी अपडेट! अजित पवारांबाबत आक्षेपार्ह बोलणाऱ्या नेत्यांची ऑडिओ क्लिप
मोठी अपडेट! अजित पवारांबाबत आक्षेपार्ह बोलणाऱ्या नेत्यांची ऑडिओ क्लिप.
आज घराबाहेर पडण्याआधी ही बातमी वाचा! लोकल सेवा विस्कळीत होणार....
आज घराबाहेर पडण्याआधी ही बातमी वाचा! लोकल सेवा विस्कळीत होणार.....
महागाईचा आणखी एक मोठा झटका! गोकुळ दूधही महागलं, तब्बल एवढ्या रुपयांनी
महागाईचा आणखी एक मोठा झटका! गोकुळ दूधही महागलं, तब्बल एवढ्या रुपयांनी.
बापरे! NEET पेपरफुटीत हे काय घडलं? मॅडमने भलतंच केलं, ॲडमिशन करून...
बापरे! NEET पेपरफुटीत हे काय घडलं? मॅडमने भलतंच केलं, ॲडमिशन करून....
सरकार संवादात अपयशी मराठा आंदोलनावर पवारांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न
सरकार संवादात अपयशी मराठा आंदोलनावर पवारांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न.
तटकरे-पटेलांबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची पत्रकार परिषद, स्पष्ट...
तटकरे-पटेलांबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची पत्रकार परिषद, स्पष्ट....
NEET घोटाळ्यात राज्यातील आणखी एक बायोलॉजी प्राध्यापक अटकेत
NEET घोटाळ्यात राज्यातील आणखी एक बायोलॉजी प्राध्यापक अटकेत.
NCPच्या दिल्ली कार्यालयात तटकरे-पटेल यांच्या नावाच्या पाट्या, मात्र...
NCPच्या दिल्ली कार्यालयात तटकरे-पटेल यांच्या नावाच्या पाट्या, मात्र....
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा.