AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भाजप आमदाराकडून पहिल्यांदाच MIM च्या खासदाराचं कौतुक, महाराष्ट्रात चर्चेचा विषय

चंद्रकांत खैरे हे भागवत कराड यांच्याशी कधीच बरोबरी करु शकणार नाहीत, अशी टोला बंब यांनी लगावला आहे. इतकंच नाही तर चंद्रकांत खैरे यांच्यावर टीका करताना बंब यांनी एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांचं कौतुक केलं आहे. त्यांचे आणि आमचे मतभेद असले तरी त्यांच्या कामाबाबत त्याचं कौतुक करावं लागे, असं प्रशांत बंब म्हणाले.

भाजप आमदाराकडून पहिल्यांदाच MIM च्या खासदाराचं कौतुक, महाराष्ट्रात चर्चेचा विषय
भाजप आमदार प्रशांत बंब, एमआयएम खासदार इम्तियाज जलील
| Edited By: | Updated on: Aug 13, 2021 | 5:26 PM
Share

औरंगाबाद : औरंगाबादचे माजी खासदार आणि शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे आणि भागवत कराड यांच्यावर केलेल्या टीकेला आमदार प्रशांत बंब यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. चंद्रकांत खैरे हे भागवत कराड यांच्याशी कधीच बरोबरी करु शकणार नाहीत, अशी टोला बंब यांनी लगावला आहे. इतकंच नाही तर चंद्रकांत खैरे यांच्यावर टीका करताना बंब यांनी एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांचं कौतुक केलं आहे. त्यांचे आणि आमचे मतभेद असले तरी त्यांच्या कामाबाबत त्याचं कौतुक करावं लागे, असं प्रशांत बंब म्हणाले. (BJP MLA Prashant Bamb praises AIMIM MP Imtiaz Jalil)

चंद्रकांत खैरे यांचं औरंगाबाद शहरावर 30 वर्षे राज्य होतं. पण या 30 वर्षाच्या काळात त्यांनी औरंगाबाद शहर पूर्णपणे खिळखिळं करुन टाकलं. त्यांनी औरंगाबाद शहराची वाताहत केली. चंद्रकांत खैरे हे कधीच भागवत कराड यांची बरोबर करु शकणार नाहीत. औरंगजेबाच्या आधी मलिक अंबरने शहरासाठी चांगलं काम केलं होतं. आता दानवे आणि कराड हे दोघे मिळून शहराचा विकास करतील असा दावाही बंब यांनी केलाय. इतकंच नाही तर एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांचंही बंब यांनी कौतुक केलं आहे. इम्तियाज जलील तरी एमआयएम पक्षाचे खासदार असतील तरी ते शहरात खैरे यांच्यापेक्षा काही विकासाची चांगली काम करत आहेत, हे आपण मानलं पाहिजे. जरी एमआयएम आणि आम्ही भविष्यातही विरोधक असू, पण जी चांगली काम आहेत त्याला चांगलं म्हणलं पाहिजे, असंही बंब म्हणाले.

चंद्रकांत खैरे काय म्हणाले होते?

शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी भाजप नेते आणि केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्यावर गंभीर आरोप केला uale.. दानवे यांनी रुग्णालयात बसून पैशांचं वाटप केलं. त्यामुळेच माझा पराभव झाला, असा गौप्यस्फोट चंद्रकांत खैरे यांनी केला. लोकसभा निवडणुकीच्या काळात रावसाहेब दानवे यांनी रुग्णालयात बसून पैसे वाटप केले. त्यामुळे माझा पराभव झाला. जावयाला पुढे करून दानवेंनी माझा पराभव केला. आता तोच जावई दानवेंना शिव्या घालत आहे, असा हल्लाही खैरे यांनी चढवला होता.

कराडांना मीच नगरसेवक केल, मी मोठा नेता

यावेळी त्यांनी केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड यांच्यावरही टीका केली. कराड यांना मीच नगरसेवक केलं. मीच त्यांना महापौर केलं. मी त्यांच्यापेक्षा खूप मोठा नेता आहे. त्यांची आणि माझी तुलना होऊ शकत नाही, असं ते म्हणाले. मराठवाडा हा शिवसेनेचा गड आहे. इथे भाजप यशस्वी होऊ शकणार नाही, असा दावाही त्यांनी यावेळी केला.

बाबा पेट्रोल पंप ते चिकलठाणा दरम्यान सलग एकच फ्लायओव्हर करा -जलील

औरंगाबाद शहरातील बाबा पेट्रोल पंप ते चिकलठाणा दरम्यान सलग एकच फ्लायओव्हर रस्ता व्हावा याबाबत आपण केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी बोललो असल्याचं इम्तियाज जलील यांनी म्हटलंय. सध्या औरंगाबादेत तीन ओव्हर ब्रीज आहेत. त्यांना जोडून एकच वस फेस प्लायओव्हर व्हावा यासाठी एक्स्पर्ट एजन्सीकडून लवकर पाहणी होणार असल्याची माहिती जलील यांनी पत्रकार परिषदेत दिली होती.

संबंधित बातम्या :

VIDEO: कराडांपेक्षा माझी उंची खूप मोठी, त्यांची माझ्याशी तुलनाच होऊ शकत नाही: चंद्रकांत खैरे

भागवतराव कराडांची बरोबरी करण्याचं सोडाच, पण इम्तियाज जलीलही चंद्रकांत खैरेंपेक्षा उजवे आहेत; भाजप आमदाराचा पलटवार

BJP MLA Prashant Bamb praises AIMIM MP Imtiaz Jalil

मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा.
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी.
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर.