शेतकऱ्यांची लूट करताना केंद्र-राज्य एकत्र, भाषण करण्याऐवजी मदत करा, राजू शेट्टींचा घणाघात

तिवृष्टीमुळे मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाल आहे. शेतकऱ्यांना मदत करण्याऐवजी मुख्यमंत्री फक्त भाषण करतात. भाषणाने शेतकऱ्यांचे पोट भरत नाही, अशी घणाघाती टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केली.

शेतकऱ्यांची लूट करताना केंद्र-राज्य एकत्र, भाषण करण्याऐवजी मदत करा, राजू शेट्टींचा घणाघात
RAJU SHETTY
Follow us
| Updated on: Oct 11, 2021 | 7:11 PM

बीड : अतिवृष्टीमुळे मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाल आहे. शेतकऱ्यांना मदत करण्याऐवजी मुख्यमंत्री फक्त भाषण करतात. भाषणाने शेतकऱ्यांचे पोट भरत नाही, अशी घणाघाती टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केली. बीड जिल्ह्यातील गेवराई येथील शेतकरी परिषदेमध्ये बोलत होते.

फक्त भाषणाने पोट भरत नाही

“अतिवृष्टीमुळे मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना मदत करण्याऐवजी मुख्यमंत्री फक्त भाषण करतात. भाषणाने शेतकऱ्यांचे पोट भरत नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी तत्काळ शेतकऱ्यांना मदत द्यावी,” असे शेट्टी म्हणाले. तसेच लखीमपूर खेरी येथील शेतकरी हत्याकांडावर बोलताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला. “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना खेळाडूंना भेटण्यासाठी व बोलण्यासाठी वेळ आहे. मात्र मागील अनेक दिवसांपासून आंदोलन करणाऱ्या आणि शहीद झालेल्या शेतकऱ्यांना भेट देण्यासाठी त्यांच्याकडे वेळ नाही, असे राजू शेट्टी म्हणाले.

एफआरपीचे तुकडे करण्याचा घाट

बीडचा दौरा पूर्ण केल्यानंतर राजू शेट्टी जालना जिल्ह्यात गेले होते. यावेळीदेखील त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर टीका केली. तसेच एफआरपीच्या मुद्द्यावर केंद्र सरकारला धारेवर धरलं. “केंद्र सरकारने एफआरपीचे तुकडे करण्याचा घाट घातला आहे. त्याला राज्य सरकारने संमती दिली आहे. एरव्ही केंद्र आणि राज्य सरकार एकमेकांना बघून घेण्याची भाषा करतात. मात्र ऊस उत्पादक शेतकऱ्यांची लूट करताना केंद्र आणि राज्य सरकार एकत्र येतात,” असा गंभीर आरोप शेट्टी यांनी केला.

पीकविमा कंपन्यांच्या माध्यमातून दरोडा टाकण्याचे काम

तसेच “पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना केंद्र आणि राज्य सरकारने मदत करताना गांभीर्य दाखवले नाही. विमा कंपन्या शेतकऱ्यांना फसवत आहेत. या कंपन्या शेतकऱ्यांच्या नुकसानीचे खोटे रेकॉर्ड करत आहेत. शेतकऱ्यांना पीकविमा मंजूर करताना पैशाची मागणी करतात. पीकविमा कंपन्यांच्या माध्यमातून दरोडा टाकण्याचे काम होत आहे. मग या दरोड्यामध्ये राज्य आणि केंद्र सरकारचा हिस्सा आहे का ?” असा सवाल राजू शेट्टी यांनी केला.

गप्प बसणार नाही, लढाई छेडणार

दरम्यान, पुढे बोलताना शेतकऱ्यांवर दरोडे टाकत असाल तर आपण गप्प बसणार नाही. मोठी लढाई छेडणार, असा इशारादेखील राजू शेट्टी यांनी राज्य आणि केंद्र सराकरला दिला.

इतर बातम्या :

महाराष्ट्र बंदला विरोध म्हणजे शेतकरी चिरडण्याला पाठिंबा; भाजप, मनसे संजय राऊतांच्या निशाण्यावर

ऊसाची FRP एकरकमी देणार, राजर्षी शाहू महाराज साखर कारखान्याची मोठी घोषणा

Lakhimpur Violence : लखीमपूर हिंसाचार प्रकरणात आशिष मिश्राला 3 दिवसांची पोलीस

(raju shetty criticizes maha vikas aghadi and central government on farmer help and frp law while talking in jalna and beed)

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.