AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कृष्णा नदीची पाणीपातळी स्थिर असल्याने मगरींच्या स्थलांतराला मोठा ब्रेक, निसर्गप्रेमींना दिसल्या लहान- मोठ्या 10 मगरी

यंदा मात्र पाणीपातळी स्थिर असल्याने मगरींना आपला अधिवास सोडावा लागलेला दिसत नाही. कृष्णा नदीत सातत्याने कारखाण्यातील सोडल्या जाणाऱ्या रासायनिक मळीच्या जलप्रदूषणामुळे लाखो मासे मृत होण्याचे प्रकार घडत आहेत.

कृष्णा नदीची पाणीपातळी स्थिर असल्याने मगरींच्या स्थलांतराला मोठा ब्रेक, निसर्गप्रेमींना दिसल्या लहान- मोठ्या 10 मगरी
| Edited By: | Updated on: Aug 04, 2022 | 3:42 PM
Share

सांगली : सांगलीच्या (Sangli) पलूस तालुक्यातील औदुंबर, भिलवडी, चोपडेवाडी नदीकाठी निसर्गप्रेमींना जवळपास दहा लहान मोठ्या मगरी पहायला मिळाला आहेत. या मगरींचा आकार साधारण सहा फुटांपासून ते तेरा चौदा फुटांपर्यंत असल्याचे देखील सांगण्यात येतंय. यंदा कृष्णा नदीची (Krishna River) पाणीपातळी स्थिर असल्याने मगरींच्या स्थलांतराला मोठा ब्रेक मिळालायं. गेल्या काही वर्षांत 20 जुलै ते 15 ऑगस्ट दरम्यान कृष्णा नदी पात्राबाहेर पुरस्थिती असायची. अशावेळी मगरी (Crocodile) आजूबाजूला चरी, ओढे, वगळी शेतांमध्ये दिसायच्या.

पाणीपातळी स्थिर असल्याने मगरींनी आपला अधिवास सोडला नाही

यंदा मात्र पाणीपातळी स्थिर असल्याने मगरींना आपला अधिवास सोडावा लागलेला दिसत नाही. कृष्णा नदीत सातत्याने कारखाण्यातील सोडल्या जाणाऱ्या रासायनिक मळीच्या जलप्रदूषणामुळे लाखो मासे मृत होण्याचे प्रकार घडत आहेत. तसेच नदीत इतर मास्यांचे मत्सबीज खाणाऱ्या खिलापीया मास्यांची संख्या वाढत आहे. अशावेळी नदीतील इतर मासे नष्ट होण्याची भिती निर्माण झालीयं. मात्र या खिलापीया मास्यांच्या संख्येवर नियंत्रण ठेवणारी मगर ही अत्यंत महत्त्वाची जैव नियंत्रक आहे.

दोन तीन वर्षात मगरींचा पाणवठ्यावर वावर वाढला

कृष्णा नदीमध्ये मगरीचे अस्तित्व अत्यंत महत्वाचे आहे. कृष्णाकाठी गावागावातील गटारगंगा नदीच्या पाण्यात मिसळते. त्या ठिकाणी खिलापीया मासे प्रचंड वाढले आहेत. ते खाण्यासाठी गेल्या दोन तीन वर्षात मगरींचा पाणवठ्यावर वावर वाढला असल्याने संदीप नाझरे यांनी सांगितले. मगर ही सरहद्द प्रिय वण्यजीव आहे. सहजासहजी ती तिचा नैसर्गिक अधिवास सोडत नाही. महापूरासारख्या नैसर्गिक आपत्तीच्या अपवादात्मक काळात स्थलांतर करत असते. आजूबाजूच्या ओढा वगळीतून स्थलांतर केलेल्या मगरी या पूराचे पाणी ओसरताच परत नदीपात्रात येतात.

Follow Us
अमित शाहांना मी फोनवर बोलताना पाहिलंय; दिल्ली लाठीचार्जबाबत...
अमित शाहांना मी फोनवर बोलताना पाहिलंय; दिल्ली लाठीचार्जबाबत राहुल गांधींचा धक्कादायक दावा
व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्काराची घोषणा! वाचा विजेत्यांची यादी
व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्काराची घोषणा! वाचा विजेत्यांची यादी
नुसती धावपळ... आंदोलक थेट गाड्यांवर चढले अन्... शेतकरी आंदोलनामुळे...
नुसती धावपळ... आंदोलक थेट गाड्यांवर चढले अन्... शेतकरी आंदोलनामुळे भोपाळ शहरात तणाव, नेमकं प्रकरण काय?
तुकाराम मुंढे यांचा मोठा निर्णय! आता विना परवाना शाळांमध्ये...
Tukaram Mundhe | तुकाराम मुंढे यांचा मोठा निर्णय! आता परवाना नसेल तर शाळांमध्ये अन्न पुरवठा करता येणार नाही; 50 मीटर परिसरात...
दिल्ली आंदोलनातील तरुणींवर कंगना रणौत यांची जहरी टीका; गटर जनरेशन...
दिल्ली आंदोलनातील तरुणींवर कंगना रणौत यांची जहरी टीका; गटर जनरेशन म्हणत केलं वादग्रस्त वक्तव्य!
दिलीप वळसे पाटील- शरद पवार भेट, आणखी कोण कोण होतं उपस्थित? Inside...
दिलीप वळसे पाटील- शरद पवार भेट, आणखी कोण कोण होतं उपस्थित? Inside Story समोर
हेच विद्यार्थी सरकार बदलतील; घरी परतताच दीपकेचा मोदी सरकारला थेट इशारा
Abhijeet Dipke | हेच विद्यार्थी सरकार बदलतील; घरी परतताच अभिजीत दीपकेचा मोदी सरकारला थेट इशारा
मोठी बातमी! NDA मध्ये येताच सुप्रिया सुळेंना मिळणार मोठं गिफ्ट?दावा...
मोठी बातमी! NDA मध्ये येताच सुप्रिया सुळेंना मिळणार मोठं गिफ्ट? दिल्लीतील हालचालीमागे... बड्या व्यक्तीच्या दाव्याने खळबळ
तो सुखरूप घरी परतला हे आमच्यासाठी... दीपकेंच्या वडिलांची प्रतिक्रिया
तो सुखरूप घरी परतला हे आमच्यासाठी... अभिजीत दीपकेंच्या वडिलांची प्रतिक्रिया चर्चेत
मोठी बातमी! दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला, पुण्यात...
मोठी बातमी! दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला, पुण्यात घडामोडींना वेग