AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nandurbar water scarcity | नंदुरबारच्या ग्रामीण भागात भीषण पाणीटंचाई; जिल्हा प्रशासनाचा 238 गावांमध्ये विहिरी अधिग्रहनाचा प्रस्ताव

धडगाव तालुक्यात टँकरनं पाणीपुरवठा करण्याचा प्रस्ताव पारित करण्याचे काम जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात येत आहे. पाणीटंचाईच्या काळात जिल्हा प्रशासनाला कोणत्याही प्रकारच्या निधीची कमतरता पडू देणार नसल्याची माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री के सी पाडवी यांनी दिली आहे.

Nandurbar water scarcity | नंदुरबारच्या ग्रामीण भागात भीषण पाणीटंचाई; जिल्हा प्रशासनाचा 238 गावांमध्ये विहिरी अधिग्रहनाचा प्रस्ताव
नंदुरबारच्या ग्रामीण भागात भीषण पाणीटंचाईImage Credit source: t v 9
| Edited By: | Updated on: May 08, 2022 | 9:46 AM
Share

 नंदुरबार : नंदुरबार जिल्ह्यात वाढत्या तापमानात सोबत पाण्याच्या बाष्पीभवनातही वाढ झाली आहे. जिल्ह्यातील बारा लघुसिंचन (Irrigation Project) प्रकल्पात आजच्या स्थितीला अवघा 11 टक्के जलसाठा शिल्लक आहे. ग्रामीण भागातील पाणीटंचाई तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मागच्या पावसाळ्यात सर्वात कमी पाऊस नवापूर तालुक्यात झाल्याने नवापूर तालुक्यात पाणीटंचाई गंभीर स्वरूपाचे होऊ शकते. जिल्ह्यातील पाणीटंचाईची स्थिती लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाच्या (District Administration) वतीने योग्य ते नियोजन करण्यात येत आहे. जिल्ह्यातील 238 गावांत विहीर अधिग्रहण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. धडगाव तालुक्यातील काही ठिकाणी टॅंकरने पाणीपुरवठा (Tanker Water Supply) करावा लागणार आहे.

पाऊस कमी पडल्याने टंचाई

धडगाव तालुक्यात टँकरनं पाणीपुरवठा करण्याचा प्रस्ताव पारित करण्याचे काम जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात येत आहे. पाणीटंचाईच्या काळात जिल्हा प्रशासनाला कोणत्याही प्रकारच्या निधीची कमतरता पडू देणार नसल्याची माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री के सी पाडवी यांनी दिली आहे.  यावर्षी नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यात सगळ्यात कमी पाऊस पडला. त्यामुळं विहिरी अधिग्रहण करण्याच निर्णय घ्यावा लागतोय. 238 गावांत विहिरी अधिग्रहन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या संख्येत वाढ होण्याची शक्यता पालकमंत्र्यांनी व्यक्त केली.

काही ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा करावा लागेल

उन्हाळ्यात जास्त पाण्याचा वापर करावा लागतो. बाष्पीभवनानं पाणी कमी होतं. अशावेळी जिल्ह्यात पाणीटंचाई जाणवण्याची शक्यता आहे. सध्या जिल्ह्यात टँकरची संख्या कमी आहे. धडगावला डोंगराळ भाग असल्यामुळं त्या भागात टँकरनं पाणीपुरवठा करावा लागतो. पाच-सहा गावांमध्ये टँकरनं पाणीपुरवठा करावा लागेल. तडोजा, नंदुरबार, नवापूर, धडगाव या तालुक्यांत पाण्याची कमतरता भासू नये, यासाठी हे नियोजन केल्याचं पालकमंत्र्यांनी सांगितलं.

चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.