AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तर महाराष्ट्र पेटून उठेल, शंभुराज देसाई भडकले; कुणाला दिला हा इशारा?

राज्याच्या उत्पन्नाचे स्त्रोत वाढवत आहोत. आम्ही शांत आहोत. तोपर्यंत आमचा अंत पाहू नका. आम्ही व्यक्त झालो तर अनेकांच्या पायाखालची वाळू सरकेल, असा इशाराच त्यांनी दिला.

तर महाराष्ट्र पेटून उठेल, शंभुराज देसाई भडकले; कुणाला दिला हा इशारा?
Image Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Dec 31, 2022 | 12:48 PM
Share

सातारा: संभाजीराजेंना धर्मवीर नव्हे स्वराज्य रक्षक म्हणा, असं विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी म्हटलं होतं. त्यावरून सत्ताधाऱ्यांनी अजित पवार यांच्यावर टीका सुरू केली आहे. दादा आधी बोलले असते तर मुख्यमंत्र्यांनी त्यांना आधीच उत्तर दिलं‌ असतं. संभाजी महाराजांना धर्मवीर हे नाव आज नाही देण्यात आलेलं. त्यांनी हिंदू धर्म रक्षणासाठी बलिदान दिलं. त्यामुळे त्यांना धर्मवीर म्हटलं जातं, असं सांगतानाच अजितदादांचं म्हणणं म्हणजे दुसऱ्याला शिकवावे ब्रह्मज्ञान आणि आपण कोरडे पाषाण असं आहे. याप्रकरणाने महाराष्ट्र पेटून उठेल, असा इशाराच राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई यांनी दिला आहे.

शंभुराज देसाई यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी अजित पवार यांच्यापासून ते उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत सर्वांवर टीका केली. अजित पवार उपमुख्यमंत्री असताना बऱ्याच आमदार आणि माजी आमदारांना सुरक्षा देण्यता आली होती. जेव्हा एखाद्या लोकप्रतिनिधीच्या जीवाला धोका असतो तेव्हा त्याची माहिती घेऊनच त्याला सुरक्षा यंत्रणा पुरवली जाते, असं शंभुराज देसाई यांनी एका पत्रकार परिषदेत बोलताना सांगितलं.

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना नागपूरला कधी दोन दिवसासाठी अधिवेशन घेतलं नाही. उद्धव ठाकरे कधी नागपूरला आले नाही. आम्ही मात्र दोन आठवडे अधिवेशन चालवलं. कोणताही वेळ न वाया घालवता आम्ही अधिवेशन पार पाडलं, असा टोला त्यांनी लगावला.

आम्ही सभागृहात असायचो. ठाकरे सेना शिल्लक आहे की नाही माहीत नाही. कारण त्यांची सभागृहात उपस्थिती नसायची. ते फक्त मीडियासमोर येऊन तोंड वाजवायचे. केवळ सत्ताधारी पक्षाला अडचणीत कसं आणता येईल एवढंच भास्कर जाधव पाहत होते. त्यामुळे त्यांना किती महत्त्व द्यायचं हा प्रश्न आहे, अशी टीका त्यांनी केली.

आम्हालाही खूप बोलता येईल. पण आम्ही बोलत नाही. 2024च्या निवडणुकीत काय ते समजेल. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात आम्ही उठवा केला. बाळासाहेबांची शिवसेना वाढवण्याचं काम आम्ही करत आहोत. आम्ही प्रभावीपणे सरकार चालवण्याचं काम करत आहोत.

राज्याच्या उत्पन्नाचे स्त्रोत वाढवत आहोत. आम्ही शांत आहोत. तोपर्यंत आमचा अंत पाहू नका. आम्ही व्यक्त झालो तर अनेकांच्या पायाखालची वाळू सरकेल, असा इशाराच त्यांनी दिला.

Follow Us
खरात प्रकरणातील त्या आरोपांवर नीलम गोऱ्हे यांनी मांडली भूमिका!
खरात प्रकरणातील त्या आरोपांवर नीलम गोऱ्हे यांनी मांडली भूमिका!.
भोर तालुक्यात वादळी वारा, यात्रेनिमित्त टाकलेला मंडपही कोसळला!
भोर तालुक्यात वादळी वारा, यात्रेनिमित्त टाकलेला मंडपही कोसळला!.
सातारा जिल्हा परिषद राडा प्रकरण पोलीस अधीक्षक यांना भोवलं
सातारा जिल्हा परिषद राडा प्रकरण पोलीस अधीक्षक यांना भोवलं.
पुण्यात अवकाळी पावसासह गारपीट; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा
पुण्यात अवकाळी पावसासह गारपीट; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा.
मुंबई पालिकेत महायुतीत नाराजीनाट्य सुरुच
मुंबई पालिकेत महायुतीत नाराजीनाट्य सुरुच.
गॅस तुटवड्यावर छगन भुजबळांचे स्पष्टीकरण; PNG साठी अर्ज करण्याचे आवाहन
गॅस तुटवड्यावर छगन भुजबळांचे स्पष्टीकरण; PNG साठी अर्ज करण्याचे आवाहन.
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले....
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले.....
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात.
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत.
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास.