AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सोलापूरमध्ये शाळांची घंटा वाजणार, 8 वी ते 12 वीपर्यंत वर्ग भरवण्याचा मार्ग मोकळा

पुढील आठवड्यापासून सोलापूर शहरातील शाळांची घंटा वाजणार आहे. शहरातील आठवी ते बारावीपर्यंत शाळा सुरू होण्याचा मार्ग मोकळा झालाय. शासनाने मंगळवारी (10 ऑगस्ट) जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वात सोलापूर शहराचा समावेश आहे.

सोलापूरमध्ये शाळांची घंटा वाजणार, 8 वी ते 12 वीपर्यंत वर्ग भरवण्याचा मार्ग मोकळा
प्रातिनिधिक फोटो
| Edited By: | Updated on: Aug 11, 2021 | 9:20 AM
Share

सोलापूर : पुढील आठवड्यापासून सोलापूर शहरातील शाळांची घंटा वाजणार आहे. शहरातील आठवी ते बारावीपर्यंत शाळा सुरू होण्याचा मार्ग मोकळा झालाय. शासनाने मंगळवारी (10 ऑगस्ट) जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वात सोलापूर शहराचा समावेश आहे. आता शाळा सुरू करण्यासाठी सोलापूर महापालिका आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे. शालेय शिक्षण विभागाने 17 ऑगस्टपासून शाळा सुरू करण्याचा निर्णय जाहीर केला. यानुसार आता पुढील मंगळवारपासून आठवी ते बारावी पर्यंतच्या शाळा सुरू होणार आहेत.

दरम्यान, सोलापूर जिल्ह्यात मागील 24 तासांमध्ये कोरोनाचे नवे 565 रुग्ण आढळले आहेत. सोलापूर ग्रामीण भागातील 9 जणांचा कोरोनाने मृत्यू झालाय, तर सोलापूर शहरात गेल्या 24 तासात एकाही कोरोना बाधित मृतांची नोंद नाही.

सोलापूरमधील म्युकरमायकोसिस  रुग्णांची संख्या 637 वर

सोलापूर जिल्ह्यात म्युकर मायकोसिसचे नवे 3 रुग्ण आढळले आहेत. यातील एका रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय. जिल्ह्यातील एकूण म्युकरमायकोसिस  रुग्णांची संख्या 637 वर पोहचलीय, तर आत्तापर्यंत 38 जणांचा मृत्यू झालाय.

बार्शी तालुक्यात एकाच दिवसात 62 कोरोना रुग्ण

सोलापूरमधील बार्शी शहर व तालुक्यात कोरोना बधितांचा आकडा हळूहळू वाढू लागला आहे. बार्शी तालुक्यात एकाच दिवसात 62 कोरोना रुग्ण आढळले. मागील पाच दिवसात 96 रुग्ण आढळून आल्यानंतर 24 तासात 62 नवे रुग्ण आढळले. यापैकी एक जणाचा कोरोनाने मृत्यू झालाय.

पोलीस आणि ग्रामपंचायतींकडून आठवडी बाजार न भरवण्याचं आवाहन

सोलापूर ग्रामीण भागात आठवडा बाजार भरू नये यासाठी पोलीस आणि ग्रामपंचायतींकडून आवाहन करण्यात आलेय. मागील आठवड्यात वळसंग येथे आठवडा बाजार भरल्यामुळे मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती. त्यामुळेच आता प्रशासनाने हे आवाहन केलंय. टीव्ही 9 मराठीच्या बातम्यांची दखल घेत पोलिसांनी आणि ग्रामपंचायतींनी आठवडी बाजार न भरवण्याचं आवाहन केलंय.

ग्रामपंचायतींकडून सायकलवर स्पीकर लावून बाजारात न येण्यासाठी आवाहन करण्यात येतंय. तसेच नियमांचं पालन न केल्यास कारवाई करण्याचा पोलिसांनी इशारा दिलाय.

हेही वाचा :

मोठी बातमी,17 ऑगस्टपासून ग्रामीण भागातील 5 वी ते 7 वी, शहरी भागातील 8 वी ते 12 वीचे वर्ग सुरु होणार

जळगावात फी न भरल्याने शाळेनं विद्यार्थ्यांना परीक्षेपासून वंचित ठेवलं, जि.प. सभापतींकडून कारवाईचा इशारा

पूरग्रस्त भागातील विद्यालय, शैक्षणिक संस्थांना विद्यापीठ निधी देण्यास तयार : उदय सामंत

व्हिडीओ पाहा :

Standard 8th to 12th Schools will be open in Solapur from 17 August 2021

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.