AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पूरग्रस्त भागातील विद्यालय, शैक्षणिक संस्थांना विद्यापीठ निधी देण्यास तयार : उदय सामंत

जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी आवश्यक ॲडव्हान्स कोर्सेस या उपकेंद्रात सुरु करण्यासाठी विद्यापीठाने प्राधान्य द्यावे, असं मत उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केलं.

पूरग्रस्त भागातील विद्यालय, शैक्षणिक संस्थांना विद्यापीठ निधी देण्यास तयार : उदय सामंत
| Edited By: | Updated on: Aug 02, 2021 | 5:27 AM
Share

रत्नागिरी : जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी आवश्यक ॲडव्हान्स कोर्सेस या उपकेंद्रात सुरु करण्यासाठी विद्यापीठाने प्राधान्य द्यावे, असं मत उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केलं. त्यांच्या हस्ते रत्नागिरी उपपरिसर, मुंबई विद्यापीठ, एमआयडीसी, रत्नागिरी येथे रत्नागिरी उपपरिसर, मुंबई विद्यापीठचे नामकरण चरित्रकार पद्मभूषण स्व. डॉ. धनंजय किर रत्नागिरी उपपरिसर म्हणून नामकरण आणि लोकमान्य टिळक अध्यासन (अभ्यास व संशोधन) केंद्राचे उद्घाटन झाले. त्यावेळी ते बोलत होते.

“मुंबई विद्यापीठ उपकेंद्राचे पद्मभूषण डॉ. धनंजय कीर उपपरिसर असे नामकरण”

उदय सामंत म्हणाले, “चरित्रकार पद्मभूषण स्व. डॉ. धनंजय किर यांनी जे साहित्य लिहून ठेवलं आहे, त्यांचे जे कार्य आहे ते रत्नागिरी जिल्ह्यामध्ये दिपस्तंभाप्रमाणे उभे राहिले पाहिजे. यासाठी त्यांचे नाव उपकेंद्राला देण्याची मागणी 6 महिन्यात मान्य झाली. आजपासून रत्नागिरी उपपरिसर, मुंबई विद्यापीठ हे चरित्रकार पद्मभूषण स्व. डॉ. धनंजय किर रत्नागिरी उपपरिसर म्हणून ओळखलं जाणार आहे.”

“पूरग्रस्त भागातील विद्यालय, शैक्षणिक संस्थांना विद्यापीठ निधी देण्यास तयार”

“निसर्ग वादळात जी विद्यालयं बाधित झाली त्या आपद्ग्रस्त विद्यालयांना मदत करण्यात आली आहे. तसेच महाराष्ट्रातील अध्यासन केंद्रांनाही निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. कोकणामध्ये ज्या ठिकाणी पूर आला त्या ठिकाणच्या विद्यालय, शैक्षणिक संस्था यांना उभे करण्यासाठी विद्यापीठ निधी देण्यासाठी तयार आहे,” असंही सावंत यांनी नमूद केलं.

“विद्यार्थ्यांना स्वत: रोजगार निर्मिती शक्य करणाऱ्या अभ्यासक्रमांवर भर द्यावा”

उदय सामंत म्हणाले, “रत्नागिरी जिल्ह्यामध्ये शासकीय इंजिनीयरिंग कॉलेज पॉलिटेक्निकल कॉलेजच्या आवारात या शैक्षणिक वर्षापासून सुरु होत आहेत. या ठिकाणी दोन कोर्सेस मर्जींग करुन इलेक्ट्रो-मॅकेनिक, सिव्हील-इन्फ्रास्ट्रक्चर आदी प्रकारचे कोर्सेस सुरु करण्यात येत आहेत. अशा प्रकारचे कोर्सेस सुरु करणारे हे महाराष्ट्रातील पहिल कॉलेज असणार आहे. तसेच कवी कालीदास संस्कृत विद्यापीठाचे उपकेंद्रही या वित्तीय वर्षामध्ये सुरु होते.”

“शासकीय लॉ कॉलेज, छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय रिसर्च सेंटर व ग्रंथालय, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे उपकेंद्र, उर्दुभवन रिचर्स सेंटर आदि शैक्षणिक दालन रत्नागिरी येथे होत आहे. त्यामुळे रत्नागिरी हे शैक्षणिक हब होईल. त्यामुळे येथील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी इतर ठिकाणी जाण्याची गरज भासणार नाही. ते शिक्षण येथेच उपलब्ध होणार आहे,” असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

यावेळी जिल्हाधिकारी डॉ. बी. एन.पाटील,रत्नागिरीचे नगराध्यक्ष बंडया साळवी, विद्यापीठाचे कुलसचिव (प्र.) डॉ. बळीराम गायकवाड, चरित्रकार पद्मभूषण स्व. डॉ. धनंजय किर यांचे नातू डॉ. शिवदिप किर, लोकमान्य टिळक अध्यासन मुंबई विद्यापीठाच्या प्र. संचालिका सुचित्रा नाईक, रत्नागिरी उपपरिसर, मुंबई विद्यापीठाचे प्र. संचालक डॉ. किशोर सुकटणकर, जयु भाटकर, प्रा. राजेंद्रप्रसाद मसुरकर आदि मान्यवर उपस्थित होते.

हेही वाचा :

“बाळासाहेबांचं शिवसेना भवन हे महाराष्ट्रासाठी भूषण, जनता यांना निवडणुकीत भुईसपाट करणार”

VIDEO | आधी मुख्यमंत्र्यांसमोर आता उदय सामंतांसमोर, स्वाती भोजनेचा आमदार, खासदारांचा पगार फिरवण्याची मागणी कायम, कार्यकर्तेच नाही, मंत्र्यांनीही हात जोडले

कोकणातील चिखल हटवण्यासाठी 35 डंपर मागवणार, मुंबई, नवी मुंबईतून येणार कामगार, चिपळूणमध्ये मेडिकलही सुरू करणार : उदय सामंत

व्हिडीओ पाहा :

Uday Samant assure to help School Colleges in flood affected Kokan

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.