लग्नानंतर सासरच्या लोकांकडून सारिकाचा छळ सुरु झाला. माहेरच्या लोकांनी मानपान केला नाही, सोने दिले नाही याचा राग मनात धरून मयत सारिका यांना सतत अपमानित करणे, नवीन कपडे न घेणे, उपाशी ठेवणे, माहेरी न पाठवणे, माहेरी फोनवर बोलू न देणे, दोन्ही मुलीच झाल्याने टोचून बोलणे, मारहाण करणे असा छळ सुरू केला.