AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विद्यार्थ्यांना तुडवावी लागते चिखलातून वाट, चंद्रपूर जिल्ह्यातील हे महामार्ग आहेत बंद

राजुरा ते गोवरी मार्गावरील वाहतूक ठप्प आहे. शेतकरी कर्मचारी शालेय विद्यार्थ्यांचे बेहाल आहेत. रुग्णांना उपचारासाठी राजुरा येथे वेळेत पोचता येत नाही.

विद्यार्थ्यांना तुडवावी लागते चिखलातून वाट, चंद्रपूर जिल्ह्यातील हे महामार्ग आहेत बंद
| Edited By: Govinda Hatwar | Updated on: Jul 28, 2023 | 3:47 PM
Share

चंद्रपूर : जिल्ह्यात शाळेसाठी विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास बघायला मिळाला आहे. राजुरा तालुक्यातील गोवरी येथे ही घटना उजेडात आली आहे. मागील दोन वर्षापासून राजुरा -गोवरी मार्गाचे काम अतिशय संथगतीने सुरू आहे. विशेष म्हणजे हे काम पावसाळ्यात सुरू आहे. नागरिकांना ये जा करण्यासाठी कुठलाही पर्यायी मार्ग तयार करण्यात आलेला नाही. नाल्यावरील कच्चा रपटा पावसामुळे वाहून गेल्याने नागरिकांना आणि शाळकरी विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेऊन धोकादायक प्रवास करावा लागत आहे. मात्र या विद्यार्थ्यांच्या हाल अपेष्टा बघून प्रशासनाला अजूनही जाग आलेली नाही. सार्वजनिक बांधकाम विभागाचे याकडे दुर्लक्ष झालेले आहे. त्यामुळे पालकांमध्ये प्रचंड रोष आहे.

राजुरा ते गोवरी मार्गावरील वाहतूक ठप्प आहे. शेतकरी कर्मचारी शालेय विद्यार्थ्यांचे बेहाल आहेत. रुग्णांना उपचारासाठी राजुरा येथे वेळेत पोचता येत नाही. बस सेवा बंद झालेली आहे. या मार्गावरील वाहतूक आणि वर्दळीचा रस्ता असताना पुलाचे काम प्राधान्याने करणे गरजेचे होते. गोवरी येथे गोयेगाव आणि माथरा येथील विद्यार्थी हायस्कूलमध्ये शिकण्यासाठी येतात. तसेच राजुरा येथे महाविद्यालय शिक्षण घेण्यासाठी शेकडो विद्यार्थी गौरी, पवनी, कडोली येथून ये- जा करतात.

राजुरा-गोवरी मार्गाचा संपर्क तुटला

मात्र शैक्षणिक हंगामातच रस्त्याची दुरावस्था असल्याने राजुरा-गोवरी मार्गाचा संपर्क तुटलेला आहे. याबाबत नागरिकांनी अनेकदा आंदोलन केलेले आहेत. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी आणि पालकांनीसुद्धा प्रशासनाला निवेदन दिलेले आहे. मात्र केवळ पोकळ आश्वासने देऊन प्रशासनाने नागरिकांची दिशाभूल केली आहे.

विद्यार्थी शिवाजी काळे म्हणाला, पुलाचे काम सुरू असल्याने आम्हाला रपटा बनवून दिला आहे. आम्ही मातरा येथून गोवरी येथे शिकायला जातो. रपटा पावसामुळे वाहून गेला आहे. बस गावात येऊ शकत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना शेतातून पायी वाट काढून शाळेत जावे लागते.

दुर्घटना घडल्यास जबाबदार कोण?

शिवाजी हायस्कूलचे शिक्षक श्री बुटले म्हणाले, उन्हाळ्यात ठेकेदाराने वेळेवर काम पूर्ण केले नाही. पुलाचे काम अर्धवट राहिले. यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. जिकडे-तिकडे पाणीच पाणी असल्याने विद्यार्थी शाळेपर्यंत पोहचू शकत नाही. जीव मुठीत घेऊन विद्यार्थी शाळेत येतात. पण, दुर्घटना घडल्यास जबाबदार कोण राहणार, असा सवाल त्यांनी विचारला.

चंद्रपुरातील हे मार्ग बंद

१) राजुरा -बल्लारपूर

२) राजुरा – सास्ती

३) धानोरा -भोयगाव

४)गौवरी कॉलनी – पोवणी

५)तोहोगाव

६)कोरपना – कोडशी (अधे मधे बंद चालू स्थितीत )

७)रूपापेठ – मांडवा (अधे मधे बंद चालू स्थितीत )

८) जांभूळधरा – उमरहिरा (अधे मधे बंद चालू स्थितीत )

९) पिपरी – शेरज

१०) पारडी – रुपापेठ (अधे मध्ये बंद चालू स्थितीत)

११) कोडशी – पिपरी

१२) कोरपना – हातलोणी (अधे मध्ये बंद चालू स्थितीत)

१३) कुसळ – कातलाबोडी – कोरपना

१४) शेरज – हेटी ( अधे मधे बंद चालू)

१५) वनसडी – भोयगाव

Follow Us
अंधेरीत भरधाव BEST बसच्या अपघाताचा थरार, अनेक वाहनांना उडवलं
Andheri Accident | अंधेरीत भरधाव BEST बसच्या अपघाताचा थरार, अनेक वाहनांना उडवलं, रिक्षांचा चुराडा
अजित पवार विमान दुर्घटना : CBI चौकशीवर फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
Devendra Fadnavis on Ajit Pawar Accident | अजित पवार विमान दुर्घटना : CBI चौकशीवर CM फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
कर्जमाफीने शेतकरी श्रीमंत होत नाही, पण... फडणवीस नेमकं काय म्हणाले?
Devendra Fadnavis | कर्जमाफीने शेतकरी श्रीमंत होत नाही, पण... मुख्यमंत्री फडणवीस नेमकं काय म्हणाले?
किती पोटदुखी... किती जळजळ... शरद पवार भेटीवरून शिंदेंचा ठाकरे गटावर...
किती पोटदुखी... किती जळजळ... शरद पवार भेटीवरून उपमुख्यमंत्री शिंदेंचा ठाकरे गटावर जोरदार हल्लाबोल
रमेश म्हात्रेंना मोठा झटका! कोर्टाने सुनावली पोलीस कोठडी; पक्षातूनही..
Ramesh Mhatre | डॉक्टर मारहाण प्रकरणात रमेश म्हात्रेंना मोठा झटका! कोर्टाने सुनावली पोलीस कोठडी; पक्षातूनही कारवाईचे संकेत?
सावरकरांना भारतरत्न देण्यावरून मुनगंटीवार संतापले, सरकारला घरचा आहेर
Sudhir Mungantiwar | सत्ता आली की वचन विसरलात?; सावरकरांना भारतरत्न देण्यावरून मुनगंटीवार संतापले, सरकारला घरचा आहेर
खाजेची पावडर टाकून वारकऱ्यांचे मोबाईल, पैसे लंपास; वारकऱ्याला अश्रू...
Pandharpur Wari Chori News | पालखी सोहळ्यात चोरट्यांचा सुळसुळाट! खाजेची पावडर टाकून वारकऱ्यांचे मोबाईल, पैसे लंपास; वारकऱ्याला अश्रू अनावर
सौरव सोनवणेला अटक करा, MCOCA लावा... म्हणत जनसागर रस्त्यावर
Beed kej Morcha | विलास घुले हत्या प्रकरण पेटलं! सौरव सोनवणेला अटक करा, MCOCA लावा... म्हणत जनसागर रस्त्यावर
5 कोटींचं आमिष अन् पक्षांतराची चर्चा! नाशिकच्या राजकारणात काय घडतंय?
5 कोटींचं आमिष अन् पक्षांतराची चर्चा! नाशिकच्या राजकारणात मोठं काय घडतंय? चर्चांना वेग
नगरसेवक कुठेही जाणार नाही, जे जातील... ठाकरे गटाची मोठी पोलखोल
Nashik Thackeray Nagarsevak | नगरसेवक कुठेही जाणार नाही, जे जातील त्यांना... ठाकरे गटाची पत्रकार परिषदेत मोठी पोलखोल