AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पाकिस्तानी गस्तीनौकेच्या गोळीबारात मृत्यूमुखी पडलेल्या मच्छीमाराच्या कुटुंबाला राज्यसरकार करणार 5 लाखांची मदत

ही मासेमारी नौका गुजरात राज्यातील ओखा येथे भारत पाकिस्तान हद्दा नजीक मासेमारी करीत असताना पाकिस्तानी मेरिटाईम सिक्युरिटी एजन्सीकडून भारतीय जलधी क्षेत्रात शिरकाव करून मासेमारी नौकेवर बेछूट गोळीबार करण्यात आला.

पाकिस्तानी गस्तीनौकेच्या गोळीबारात मृत्यूमुखी पडलेल्या मच्छीमाराच्या कुटुंबाला राज्यसरकार करणार 5 लाखांची मदत
गोळीबारात मृत्यूमुखी पडलेल्या मच्छीमाराच्या कुटुंबाला राज्यसरकार करणार 5 लाखांची मदत
| Edited By: | Updated on: Nov 09, 2021 | 7:23 PM
Share

मुंबई : पाकिस्तानी गस्तीनौकेच्या गोळीबारात मृत्यूमुखी पडलेल्या मच्छिमार श्रीधर चामरेच्या कुटुंबाला राज्य सरकार 5 लाखाची मदत करणार आहे. राज्याचे मत्स्यव्यवसाय मंत्री अस्लम शेख यांनी मंगळवारी ही माहिती दिली. श्रीधरचा 6 नोव्हेंबर रोजी पाकिस्तान-ओखा (गुजरात) सागरी सीमारेषेवर पाकिस्तानी सुरक्षा एजन्सीकडून गुजरात राज्याच्या पोरबंदर जिल्ह्यातील मासेमारी नौकेवर झालेल्या गोळीबारात मृत्यू झाला होता. यामुळे मच्छिमारांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

भारत-पाक हद्दीनजीक मासेमारी करताना घडली घटना

गुजरात राज्याच्या ओखा बंदर येथील मासेमारी नौका ‘जलपरी’ मासेमारी करण्यास समुद्रात निघाली होती. ही मासेमारी नौका गुजरात राज्यातील ओखा येथे भारत पाकिस्तान हद्दा नजीक मासेमारी करीत असताना पाकिस्तानी मेरिटाईम सिक्युरिटी एजन्सीकडून भारतीय जलधी क्षेत्रात शिरकाव करून मासेमारी नौकेवर बेछूट गोळीबार करण्यात आला. गुजरातमधील वनगबरा येथील मालक नानजी राठोड यांच्या ‘जलपरी’ बोटीवर पालघर तालुक्यातील वडराई गावातील श्रीधर चामरे हा गेल्या तीन महिन्यांपासून खलाशी म्हणून काम करीत होता.

बोटीवरील कॅप्टन जखमी

पाकिस्तान ट्रॉलर्समधून आलेल्या सैनिकांनी भारतीय मच्छीमारावर बेछूट गोळीबार केला. या गोळीबारात वडराई येथील मच्छिमार श्रीधर याला तीन गोळ्या लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. तर बोटीवरील कॅप्टन तांडेल यांना एक गोळी लागली असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या संपूर्ण घटनेचा मच्छीमार बांधवासहित कुटुंबीयांनी पाकिस्तानचा निषेध व्यक्त केला आहे.

मूळ गावी श्रीधरवर अंत्यसंस्कार

शवविच्छेदनानंतर श्रीधर चामरेचा मृतदेह आज पहाटे 5 वाजता त्याच्या मूळ गावी वडराई येथे आणण्यात आला. त्यानंतर त्याच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले. यावेळी संपूर्ण मच्छीमार समाजाकडून श्रीधरला अखेरचा निरोप देण्यात आला. (The state government will provide Rs 5 lakh to the family of a fisherman who died in the firing)

इतर बातम्या

बंगालमध्ये ऑनलाईन व्हिडिओ गेम खेळणे जीवावर बेतले, दोन तरुणांना लोकलने चिरडले, वाचा काय घडले?

एस.टी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या आंदोलनास वंचित बहुजन आघाडी व मनसेचा पाठींबा

Follow Us
नीलम गोऱ्हे अडचणीत येणार? तृप्ती देसाई यांचा नवा दावा काय?
नीलम गोऱ्हे अडचणीत येणार? तृप्ती देसाई यांचा नवा दावा काय?.
रुपाली चाकणकरांचे अशोक खरातला 177 कॉल तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे
रुपाली चाकणकरांचे अशोक खरातला 177 कॉल तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे.
अंजन गावात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद
अंजन गावात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद.
मुंबईतील शाळांमध्ये 'मनाचे श्लोक' सक्तीचे? ठाकरे गट आणि एमआयएममध्ये...
मुंबईतील शाळांमध्ये 'मनाचे श्लोक' सक्तीचे? ठाकरे गट आणि एमआयएममध्ये....
अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; तृप्ती देसाईंनी केला घाम फुटणारा आरोप
अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; तृप्ती देसाईंनी केला घाम फुटणारा आरोप.
शिंदेंच्या काळात नगरविकास खात्यात मोठा भ्रष्टाचार, राऊतांचे थेट आरोप
शिंदेंच्या काळात नगरविकास खात्यात मोठा भ्रष्टाचार, राऊतांचे थेट आरोप.
मुंबई, पुण्यावरही 'अवकाळी'ची अवकृपा, पुढील 24 तास धोक्याची...
मुंबई, पुण्यावरही 'अवकाळी'ची अवकृपा, पुढील 24 तास धोक्याची....
राऊतांचा मोठा दावा शिंदे-अजित पवार गटातील 25-30 आमदार भाजपच्या वाटेवर?
राऊतांचा मोठा दावा शिंदे-अजित पवार गटातील 25-30 आमदार भाजपच्या वाटेवर?.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि प्रफुल पटेल यांची दिल्लीत तासभर चर्चा
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि प्रफुल पटेल यांची दिल्लीत तासभर चर्चा.
NCP मध्ये पत्राचं वादळ, सुनेत्रा पवारांची पटेल-तटकरेंवर नाराजी
NCP मध्ये पत्राचं वादळ, सुनेत्रा पवारांची पटेल-तटकरेंवर नाराजी.