AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ahmednagar Crime: वीज पंप सुरू करण्याच्या वादातून तरुणाची हत्या; मृतदेह विहिरीत फेकला

वडगाव येथील रहिवासी बडे यांची जमीन भागवत गर्जे यांच्या वडिलांनी खरेदी केली होती. बडे यांचा पुतण्या व गर्जे यांच्यामध्ये जमिनीवरुन आणि विहिरीच्या पाण्यावरुन वाद होत होते. हा वाद पुढे आणखी चिघळत चालला होता. याच वादाचे पर्यावसन पुढे हत्येमध्ये झाले.

Ahmednagar Crime: वीज पंप सुरू करण्याच्या वादातून तरुणाची हत्या; मृतदेह विहिरीत फेकला
प्रातिनिधिक छायाचित्र
| Edited By: | Updated on: Dec 29, 2021 | 12:05 AM
Share

पाथर्डी : विहिरीवरील वीज पंप सुरू करण्याच्या वादातून पाथर्डी तालुक्यातील वडगाव येथील भागवत मारुती गर्जे (३८) याचा खून करण्यात आला. डोक्यात धारदार शस्त्राने घाव घालून ही हत्या करण्यात आली. हत्या केल्यानंतर मृतदेह विहिरीत फेकून देण्यात आला. मारेकरी युवक पसार झाला आहे. हत्या झालेल्या भागवत गर्जेला चार मुली, पत्नी व आई, वडील असा परिवार आहे. किरकोळ वादातून घडलेल्या या हत्याकांडाने पाथर्डी परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. पोलिस या घटनेचा कसून तपास करीत आहेत.

हत्येला कारणीभूत ठरलेला नेमका वाद काय?

वडगाव येथील रहिवासी बडे यांची जमीन भागवत गर्जे यांच्या वडिलांनी खरेदी केली होती. बडे यांचा पुतण्या व गर्जे यांच्यामध्ये जमिनीवरुन आणि विहिरीच्या पाण्यावरुन वाद होत होते. हा वाद पुढे आणखी चिघळत चालला होता. याच वादाचे पर्यावसन पुढे हत्येमध्ये झाले. हा वाद स्थानिक पातळीवर मिटवण्यासाठी पंचांनी बसून प्रयत्न केले होते. त्यानंतरही बडे आणि गर्जे यांच्यात मतभेद सुरुच होते. 27 डिसेंबरला रात्री साडेबारा वाजता भागवत गर्जे हा शेताला पाणी देण्यासाठी गेला होता. वीज कनेक्शनचा फ्युज उडाल्यामुळे तो बसवून भागवत विहिरीवर आला होता.

याचदरम्यान तेथे दबा धरुन बसलेला आरोपी बडे याने भागवत गर्जे विहरीजवळ येताच त्याच्यावर धारदार शस्त्राने डोक्यात वार केला. हा वार डोक्याच्या मागच्या बाजूला लागल्याने भागवत जमिनीवर कोसळला. रात्री दोन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. ही हत्या केल्यानंतर बडे याने भागवतला विहिरीत ढकलले. त्यानंतर बडेने अज्ञात व्यक्तीला फोन काॅल लावला आणि भागवत गर्जेचा काटा काढला, असे सांगितल्याचे उघडकीस आले आहे.

संशयित आरोपी फरार; पोलिसांकडून शोध जारी

या प्रकरणातील संशयित आरोपी बडे हा फरार झाला आहे. बडेचा आणि भागवत गर्जे याचा दिर्घ काळापासून वाद सुरू होता. त्यामुळे हे हत्याकांड पूर्ववैमनस्यातून घडल्याचे निदर्शनास आले आहे. त्याच अनुषंगाने पोलिसांनी पुढील तपासाची चक्रे फिरवली आहेत. मृत भागवत गर्जेचा मृतदेह पाथर्डी येथील उपजिल्हा रुग्णालयात रात्री शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. भागवत गर्जेला चार लहान मुली आहेत त्यामुळे त्याच्या मृत्यूने परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. (Youth killed in Ahmednagar over power pump dispute)

इतर बातम्या

Ulhasnagar: सहकाऱ्यांच्या जामिनासाठी आला, अन पोलिसांना सापडला, उल्हासनगरच्या चालिया साहेब मंदिरातील चोरीचा उलगडा

Malegaon : मालेगाव बॉम्बस्फोट केसमधील साक्षीदाराने साक्ष बदलली, सुनावणी दरम्यान धक्कादायक खुलासा

भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....