AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Buldana Youth drowned : बुलडाण्यात अंत्यसंस्कारासाठी गेलेल्या युवकाचा तलावात बुडून मृत्यू, NDRF च्या जवानांनी शोधून काढला मृतदेह

बुलडाणा जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून सततच्या पावसाने शेतीचे नुकसान झालेय. अनेक ठिकाणी शेती खरडून गेलीय तर काही शेतकऱ्यांचे शेतात पाणी साचल्यामुळे बांध फुटले.

Buldana Youth drowned : बुलडाण्यात अंत्यसंस्कारासाठी गेलेल्या युवकाचा तलावात बुडून मृत्यू, NDRF च्या जवानांनी शोधून काढला मृतदेह
बुलडाण्यात अंत्यसंस्कारासाठी गेलेल्या युवकाचा तलावात बुडून मृत्यूImage Credit source: t v 9
| Edited By: | Updated on: Jul 15, 2022 | 4:21 PM
Share

बुलडाणा : साखरखेर्डा येथील रतन तलावात बुडून एका युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडलीय. गणेश बाबुराव दानवे (Ganesh Danve) असे मृत युवकाचे नाव आहे. तो साखरखेर्डा (Sakharkharda) गावातीलच एका वृध्द महिलेच्या अंत्यसंस्कारसाठी या तलावाजवळील स्मशानभूमीत (Crematorium) गेला होता. मात्र अंत्यसंस्कार झाल्यावर त्याला या तलावात अंघोळ करण्याचा मोह आवरला नाही. यावेळी तो तलावात खोल पाण्यात बुडला. बुलडाणा जिल्ह्यातील साखरखर्डा येथील मृत गणेश दानवे हा युवक गावाच्या बाहेर असलेल्या रतन तलावाशेजारी अंत्यसंस्कारसाठी गेला होता. मात्र स्मशानभूमी शेजारी असलेल्या तलावात अंघोळ करायला गेला असता तो पाण्यात बुडला. यावेळी काही युवकांनी त्याला विरोधही केला. परंतु, कुणाचेही न ऐकता सरळ तो तलावात काही अंतरावर चालत गेला. आपण सहज पुढच्या काठावर जाऊ शकतो, असा भ्रम त्याला झाला असावा. तलावाच्या मधोमध जात नाही, तोच गणेश पाण्यात बुडाला. तलावाची पातळी खोलवर असल्याने शोध घेऊनही तो मिळून आला नाही. गेल्या तीन दिवसापासून सतत पाऊस सुरू असल्यामुळे 13 जुलैला गणेशचा मृतदेह तलावात सापडला नव्हता. पावसामुळे शोध कार्यात ही अडथळा येत होता. परंतु काल एनडीआरएफच्या टीमने शोध मोहीम राबवली. तलावात असलेल्या युवकाचा मृतदेह त्यांना सापडला.

संग्रामपूर तालुक्यामध्ये शेतीचे मोठं नुकसान

बुलडाणा जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून सततच्या पावसाने शेतीचे नुकसान झालेय. अनेक ठिकाणी शेती खरडून गेलीय तर काही शेतकऱ्यांचे शेतात पाणी साचल्यामुळे बांध फुटले. यामुळे शेती खरडून गेलीय. सोबत पीकही वाहून गेलीत. मोठं आर्थिक नुकसान झालंय. बुलडाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यात ही अशीच परिस्थिती आहे. सततच्या पावसाने शेतकरी चिंतेत आहेत. शेतातली पीक सडण्याच्या मार्गावर आहेत. शेतात तणनाशक फवारणी, निंदन, डवरे, काहीच काम चालत नसल्यामुळे पिके ही धोक्यात आलीय. हातमजुरी करणाऱ्या मजुरांचे पण हाल होत आहेत. शासनाकडून मदतीची मागणी शेतकरीवर्गाकडून होत आहे.

विठ्ठल रुक्मिणीचे मंदिर कोसळले

गेल्या अनेक वर्षांपासून सवडद येथे विठ्ठल रुक्मिणीचे मंदिर आहे. दरवर्षी येथे अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात येते. गावातील भाविक ही दररोज दर्शनासाठी मंदिरात येतात. आषाढी एकादशीच्या दिवशी गावांतील नव्हे तर परिसरातील भाविक दर्शनासाठी येतात. आषाढी एकादशी संपताच दररोजच्या पावसाने 13 जुलैला दुपारी मंदिर अचानक कोसळले. सुदैवाने मंदिरात कुणी भाविक नसल्याने मोठा अनर्थ टळला. विठ्ठल रुक्मिणीचे मंदिर कोसळल्याने या मंदिरासाठी आता गावातील पुन्हा दानशूर हात पुढे आले आहेत. लवकरच हे मंदिर पुन्हा उभे राहणार आहे, असा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केलंय. मात्र शासनानेसुद्धा मदत करावी अशी मागणी सुद्धा ग्रामस्थांनी केलीय.

पोस्टर लागले, तक्रारही दिली, तरीही सापडेना, आता तर कुटुंबीयही बेपत्ता
पोस्टर लागले, तक्रारही दिली, तरीही सापडेना, आता तर कुटुंबीयही बेपत्ता.
हिरव्या रंगाच्या वादात आता संजय राऊतांची उडी
हिरव्या रंगाच्या वादात आता संजय राऊतांची उडी.
मुंब्रा हिरवा करू... वादाला इम्तियाज जलील यांच्याकडून पुन्हा फोडणी
मुंब्रा हिरवा करू... वादाला इम्तियाज जलील यांच्याकडून पुन्हा फोडणी.
शिवाजी पार्कात प्रजासत्ताक दिनाचा दिमाखदार सोहळा पार पडला
शिवाजी पार्कात प्रजासत्ताक दिनाचा दिमाखदार सोहळा पार पडला.
सत्ता, संघर्ष, राजकारणापेक्षा देश महत्वाचा; एकनाथ शिंदे
सत्ता, संघर्ष, राजकारणापेक्षा देश महत्वाचा; एकनाथ शिंदे.
राज्यात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते ध्वजवंदन
राज्यात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते ध्वजवंदन.
विकसित भारताचा संकल्प दृढ होवो; पंतप्रधानांकडून देशवासीयांना शुभेच्छा
विकसित भारताचा संकल्प दृढ होवो; पंतप्रधानांकडून देशवासीयांना शुभेच्छा.
समाज घडवण्यात गुरू तेग बहादुर यांचे मोलाचे योगदान - फडणवीस
समाज घडवण्यात गुरू तेग बहादुर यांचे मोलाचे योगदान - फडणवीस.
शिंदे सेना गद्दारांची टोळी, आणि ही टोळी भाजप चालवते
शिंदे सेना गद्दारांची टोळी, आणि ही टोळी भाजप चालवते.
विरुद्ध दिशेनं गाडी की घातली? जाब विचारणाऱ्या वाहतूक पोलिसाला मारहाण!
विरुद्ध दिशेनं गाडी की घातली? जाब विचारणाऱ्या वाहतूक पोलिसाला मारहाण!.