AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भाग बदलत पाऊस पडणार, पेरणी करताना शेतकऱ्यांनी…; पंजाबराव डख यांचा पावसाबाबतचा अंदाज काय?

Panjabrao Dakh Weather Forecast Report : हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी हवामानाचा आणि पावसाचा अंदाज वर्तवला आहे. शेतकऱ्यांनी पीकांची पेरणी कधी करावी, याबाबतचाही सल्ला दिलाय. तसंच पाऊस कसा पडेल? त्याचं स्वरुप काय असेल यावरही पंजाबराव डख यांनी भाष्य केलंय.

भाग बदलत पाऊस पडणार, पेरणी करताना शेतकऱ्यांनी...; पंजाबराव डख यांचा पावसाबाबतचा अंदाज काय?
पंजाबराव डख यांचा पावसाचा अंदाजImage Credit source: Facebook
आयेशा सय्यद
आयेशा सय्यद | Updated on: Jun 13, 2024 | 6:55 PM
Share

मान्सून महाराष्ट्रात दाखल झाला आहे. काही ठिकाणी दमदार पाऊस होतोय. तर काही ठिकाणी रिमझिम पावसाच्या सरी कोसळत आहेत. अशात बळीराजा खरीप पिकांच्या पेरणीच्या तयारीला लागलाय. पेरणी कधी करावी? याचा अंदाज शेतकरी घेत आहेत. पण पेरणी नेमकी कधी करावी? याची शेतकरी चाचपणी करत आहेत. अशातच हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी पावसाबाबतचा अंदाज व्यक्त केला आहे. पाऊस कधी आणि किती प्रमाणात पडणार? यावर पंजाबराव डख यांनी अंदाज व्यक्त केलाय. शेतकऱ्यांनी पेरणी कधी करावी, यावरही पंजाबराव डख यांनी भाष्य केलं आहे.

पंजाबराव डख यांचा अंदाज काय?

राज्यात 14 जूनपर्यंत दररोज भाग बदलत पाऊस पडणार आहे. परंतु या कालावधीत राज्यातील दक्षिणेकडील भागांमध्ये चांगला पाऊस पडणार अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे. सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, अहमदनगर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, बीड, लातूर, धाराशिव, पंढरपूर या भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे. उर्वरित महाराष्ट्रात मात्र खूप मोठ्या प्रमाणात पाऊस पडणार नाही. तसेच 15 ते 16 जून दरम्यान पावसाची विश्रांती पाहायला मिळू शकते, असा अंदाज पंजाबराव डख यांनी व्यक्त केला आहे.

शेतकऱ्यांना सल्ला काय?

16 जून नंतर पुन्हा एकदा पाऊस सक्रिय होणार आहे. साधारणता 18 जून नंतर जोरदार पाऊस सुरु होईल. आता महाराष्ट्रात पावसाला सुरुवात झाली आहे. मात्र शेतकऱ्यांनी थोडी प्रतिक्षा करूनच पेरणी करावी. जमीन किमान सहा इंच ओल गेल्यानंतरच पेरणी करण्याचा निर्णय घ्यावा, असा सल्ला पंजाबराव डख यांनी शेतकऱ्यांना दिला.

शेतकरी काही वेळी पेरणी लवकर करतात. त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट येतं. यावरही डख बोलले आहेत. पेरणीचा निर्णय घाई घाईने घेऊ नये. अन्यथा शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागू शकते. मनसोक्त तसंच पेरणीयोग्य पाऊस झाल्यावर पेरणीचा निर्णय घेतला पाहिजे. जेणेकरून शेतकऱ्यांना नुकसानीचा सामना करावा लागणार नाही, असा सल्लाही पंजाबराव डख यांनी शेतकऱ्यांना दिलाय.

Follow Us
संतोष पंडित यांना अखेर जामीन मंजूर, चंद्रकांत पाटील व्हिडिओ प्रकरणात..
संतोष पंडित यांना अखेर जामीन मंजूर, चंद्रकांत पाटील व्हिडिओ प्रकरणात दिलासा
गणेशोत्सवात आंदोलन करणं... चंद्रशेखर बावनकुळे यांचे जरांगे पाटलांना...
गणेशोत्सवात आंदोलन करणं... चंद्रशेखर बावनकुळे यांचे मनोज जरांगे पाटील यांना आवाहन
आमच्या वहिनी आहेत ना’ या अभियानांतर्गत राष्ट्रवादीचा मास्टर प्लॅन...
आमच्या वहिनी आहेत ना’ या अभियानांतर्गत राष्ट्रवादीचा मास्टर प्लॅन; रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या नेतृत्त्वात...
शिवसेना कुणाची हे तर... आजच सुनावणी पार पडली अन् शिंदे गटातील महिला...
शिवसेना कुणाची हे तर... आजच सुनावणी पार पडली अन् शिंदे गटातील महिला नेत्याचं मोठं विधान
दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंनी मांडली भूमिका, स्वतः ट्वीट...
दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंनी मांडली भूमिका, स्वतः ट्वीटद्वारे केला खुलासा!
माझा मुंबईत जाऊनच जीव निघालाा तर... जरांगे पाटलांची प्रतिक्रिया...
माझा मुंबईत जाऊनच जीव निघालाा तर...  आंदोलनाविषयी मनोज जरांगे पाटलांची मोठी प्रतिक्रिया!
त्यांच्यांतील लोकंच म्हणातात, जरांगे आंदोलनस्थळी... छगन भुजबळ नेमकं...
त्यांच्यांतील लोकंच म्हणातात, जरांगे आंदोलनस्थळी... छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?
बीड पाटोदा रस्त्यावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको; चलो मुंबईचा नारा...
बीड पाटोदा रस्त्यावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको; चलो मुंबईचा नारा...
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची...
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती
बिमारी का बहाना है, तुम्हे मुंबई... गुणरत्न सदावर्तेंनची जरांगेंवर...
बिमारी का बहाना है, तुम्हे मुंबई... गुणरत्न सदावर्तेंनची मनोज जरांगेंवर अजब कविता