AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अखेर ग्रामसभांना परवानगी, कोरोना नियमांचं पालन करावं लागणार

कोविड 19 च्या अनुषंगानं राज्य सरकारनं घालून दिलेल्या सर्व नियमांचं पालन करुन ग्रामसभांना आयोजन करण्यास पुन्हा परवानगी दिली आहे.

अखेर ग्रामसभांना परवानगी, कोरोना नियमांचं पालन करावं लागणार
ग्रामसभा, प्रतिकात्मक फोटो
| Updated on: Feb 11, 2021 | 6:09 PM
Share

मुंबई : राज्यातील ग्रामपंचायत निवडणूक आणि संरपंच निवडीनंतर ग्रामसभा होणार की नाही, या प्रश्नाचं उत्तर आता मिळालं आहे. कारण, कोरोना संकटाच्या काळात राज्य सरकारनं ग्रामसभांवर घातलेली बंदी उठवली आहे. सोशल डिस्टन्सिंग आणि कोविड 19 च्या अनुषंगानं राज्य सरकारनं घालून दिलेल्या सर्व नियमांचं पालन करुन ग्रामसभांना आयोजन करण्यास पुन्हा परवानगी दिली आहे. तशी माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिलीय.(Permission to hold Gram Sabha by rural development ministry)

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर जानेवारीमध्ये ग्रामसभा सुरु करण्यास संमती देण्यात आली होती. पण मधल्या काळात कोरोना विषाणूचा नवा प्रकार समोर आल्यानंतर ग्रामसभांना तात्पुरती स्थगिती दिली होती. दरम्यान, ग्रामसभेच्या मंजुरीअभावी वार्षिक विकास आराखडे, शासनाच्या विविध योजनांतर्गत वैयक्तिक लाभार्थ्यांची यादी, पुनर्वसित गावांचे प्रस्ताव, गौण खनिज परवानगी, खेट संरपंच विरोधातील अविश्वास प्रस्ताव, चौदाव्या आणि पंधराव्या वित्त आयोगाचा निधी खर्च करणे, अशा अनेक बाबी प्रलंबित राहिलेल्या आहेत.

आता पूर्वीप्रमाणे ग्रामसभा होणार

या बाबी विचारात घेऊन कोविड 19 च्या अनुषंगानं निर्गमित मार्गदर्शनक तत्वांचे काटेकोरपणे पालन करण्याच्या अटीला अधीन राहुन पूर्वीप्रमाणे ग्रामसभांचे आयोजन करण्यात परवानगी देण्याची आल्याची माहिती ग्रामविकासमंत्र्यांनी दिली आहे. प्रत्येक वित्तीय वर्षात किमान 4 ग्रामसभांचे आयोजन करणं बंधनकारक आहे.

दरम्यान, कोरोना विषाणूच्या प्रासाराला प्रतिबंध घालण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारनं वेळोवेळी आदेश दिले आहेत. त्याचबरोबर अधिसूचनाही काढली आहे. त्यानुसार सर्व प्रकारच्या सामाजिक, राजकीय सभा आणि संमेलनांवर बंदी घालण्यात आली होती. मात्र, सध्यस्थितीत कोविडच्या अनुषंगाने लॉकडाऊन काळातील निर्बंधांमध्ये शिथिलता आणली जात आहे. जनजीवन पूर्ववत होत आहे. त्या पार्श्वभूमीवर ग्रामसभांच्या आयोजनास देण्यात आलेली स्थगिती उठविण्यात येत आहे. यासंदर्भातील शासन परिपत्रक गुरुवारी जारी केल्याचंही ग्रामविकासमंत्र्यांनी सांगितलं.

31 मार्चपर्यंत ग्रामसभा न घेण्याचा झाला होता निर्णय

ग्रामसभांवर 31 मार्चपर्यंत स्थगिती देण्याचा सरकारचा विचार असल्याची माहिती खुद्द ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली होती. कोरोना महामारींमुळे ग्रामपंचायत निवडणूक लांबणीवर टाकण्यात आल्या होत्या. त्यामुळे ग्रामपंचायतींवर प्रशासकांची नेमणूक करण्यात आली होती. मात्र एका प्रशासकाकडे अनेक गावांचा कारभार देण्यात आला होता. आता एकच प्रशासक 4-5 ठिकाणी जाऊ शकत नाही. त्यामुळे ग्रामसभांवर 31 मार्चपर्यंत स्थगिती देण्याचा सरकारचा विचार असल्याची माहिती ग्रामविकासमंत्र्यांनी दिली होती.

संबंधित बातम्या :

ग्रामपंचायतींचा गुलाल उधळला, पण 31 मार्चपर्यंत ग्रामसभा नाही! कारण काय?

जयंत पाटील म्हणतात, ग्रामपंचायतीत राष्ट्रवादी अव्वल, काँग्रेस चौथी!

Permission to hold Gram Sabha by rural development ministry

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.