AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अखेर ग्रामसभांना परवानगी, कोरोना नियमांचं पालन करावं लागणार

कोविड 19 च्या अनुषंगानं राज्य सरकारनं घालून दिलेल्या सर्व नियमांचं पालन करुन ग्रामसभांना आयोजन करण्यास पुन्हा परवानगी दिली आहे.

अखेर ग्रामसभांना परवानगी, कोरोना नियमांचं पालन करावं लागणार
ग्रामसभा, प्रतिकात्मक फोटो
| Updated on: Feb 11, 2021 | 6:09 PM
Share

मुंबई : राज्यातील ग्रामपंचायत निवडणूक आणि संरपंच निवडीनंतर ग्रामसभा होणार की नाही, या प्रश्नाचं उत्तर आता मिळालं आहे. कारण, कोरोना संकटाच्या काळात राज्य सरकारनं ग्रामसभांवर घातलेली बंदी उठवली आहे. सोशल डिस्टन्सिंग आणि कोविड 19 च्या अनुषंगानं राज्य सरकारनं घालून दिलेल्या सर्व नियमांचं पालन करुन ग्रामसभांना आयोजन करण्यास पुन्हा परवानगी दिली आहे. तशी माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिलीय.(Permission to hold Gram Sabha by rural development ministry)

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर जानेवारीमध्ये ग्रामसभा सुरु करण्यास संमती देण्यात आली होती. पण मधल्या काळात कोरोना विषाणूचा नवा प्रकार समोर आल्यानंतर ग्रामसभांना तात्पुरती स्थगिती दिली होती. दरम्यान, ग्रामसभेच्या मंजुरीअभावी वार्षिक विकास आराखडे, शासनाच्या विविध योजनांतर्गत वैयक्तिक लाभार्थ्यांची यादी, पुनर्वसित गावांचे प्रस्ताव, गौण खनिज परवानगी, खेट संरपंच विरोधातील अविश्वास प्रस्ताव, चौदाव्या आणि पंधराव्या वित्त आयोगाचा निधी खर्च करणे, अशा अनेक बाबी प्रलंबित राहिलेल्या आहेत.

आता पूर्वीप्रमाणे ग्रामसभा होणार

या बाबी विचारात घेऊन कोविड 19 च्या अनुषंगानं निर्गमित मार्गदर्शनक तत्वांचे काटेकोरपणे पालन करण्याच्या अटीला अधीन राहुन पूर्वीप्रमाणे ग्रामसभांचे आयोजन करण्यात परवानगी देण्याची आल्याची माहिती ग्रामविकासमंत्र्यांनी दिली आहे. प्रत्येक वित्तीय वर्षात किमान 4 ग्रामसभांचे आयोजन करणं बंधनकारक आहे.

दरम्यान, कोरोना विषाणूच्या प्रासाराला प्रतिबंध घालण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारनं वेळोवेळी आदेश दिले आहेत. त्याचबरोबर अधिसूचनाही काढली आहे. त्यानुसार सर्व प्रकारच्या सामाजिक, राजकीय सभा आणि संमेलनांवर बंदी घालण्यात आली होती. मात्र, सध्यस्थितीत कोविडच्या अनुषंगाने लॉकडाऊन काळातील निर्बंधांमध्ये शिथिलता आणली जात आहे. जनजीवन पूर्ववत होत आहे. त्या पार्श्वभूमीवर ग्रामसभांच्या आयोजनास देण्यात आलेली स्थगिती उठविण्यात येत आहे. यासंदर्भातील शासन परिपत्रक गुरुवारी जारी केल्याचंही ग्रामविकासमंत्र्यांनी सांगितलं.

31 मार्चपर्यंत ग्रामसभा न घेण्याचा झाला होता निर्णय

ग्रामसभांवर 31 मार्चपर्यंत स्थगिती देण्याचा सरकारचा विचार असल्याची माहिती खुद्द ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली होती. कोरोना महामारींमुळे ग्रामपंचायत निवडणूक लांबणीवर टाकण्यात आल्या होत्या. त्यामुळे ग्रामपंचायतींवर प्रशासकांची नेमणूक करण्यात आली होती. मात्र एका प्रशासकाकडे अनेक गावांचा कारभार देण्यात आला होता. आता एकच प्रशासक 4-5 ठिकाणी जाऊ शकत नाही. त्यामुळे ग्रामसभांवर 31 मार्चपर्यंत स्थगिती देण्याचा सरकारचा विचार असल्याची माहिती ग्रामविकासमंत्र्यांनी दिली होती.

संबंधित बातम्या :

ग्रामपंचायतींचा गुलाल उधळला, पण 31 मार्चपर्यंत ग्रामसभा नाही! कारण काय?

जयंत पाटील म्हणतात, ग्रामपंचायतीत राष्ट्रवादी अव्वल, काँग्रेस चौथी!

Permission to hold Gram Sabha by rural development ministry

Follow Us
मनसेचा उद्या 20वा वर्धापन दिन; राज ठाकरे रायगडकडे रवाना
मनसेचा उद्या 20वा वर्धापन दिन; राज ठाकरे रायगडकडे रवाना.
टेक्नोलॉजीमुळे वृक्षलागवड करणं देखील शक्य! फडणवीसांनी दिली माहिती
टेक्नोलॉजीमुळे वृक्षलागवड करणं देखील शक्य! फडणवीसांनी दिली माहिती.
ज्योती वाघमारेंकडून एकनाथ शिंदेंबद्दल गौरवोद्गार! म्हणाल्या...
ज्योती वाघमारेंकडून एकनाथ शिंदेंबद्दल गौरवोद्गार! म्हणाल्या....
राष्ट्रपतींच्या अपमानावरून पंतप्रधान मोदींचा ममता बॅनर्जींवर निशाणा
राष्ट्रपतींच्या अपमानावरून पंतप्रधान मोदींचा ममता बॅनर्जींवर निशाणा.
सगळ्या पदांपेक्षा मोठी ओळख लाडका भाऊ; एकनाथ शिंदेंचं विधान
सगळ्या पदांपेक्षा मोठी ओळख लाडका भाऊ; एकनाथ शिंदेंचं विधान.
महिला दिनानिमित्त सीएसएमटी मेट्रो स्थानकात आकर्षक सजावट
महिला दिनानिमित्त सीएसएमटी मेट्रो स्थानकात आकर्षक सजावट.
जिल्हा परिषदेत भाजपाचा अध्यक्ष होईल! चंद्रकांत पाटील यांचा विश्वास
जिल्हा परिषदेत भाजपाचा अध्यक्ष होईल! चंद्रकांत पाटील यांचा विश्वास.
सोलापूरात मराठा क्रांती मोर्चाकडून काळी रंगपंचमी साजरी
सोलापूरात मराठा क्रांती मोर्चाकडून काळी रंगपंचमी साजरी.
भारताला पुन्हा विश्वचषक जिंकण्याची संधी! क्रिकेटप्रेमींचा उत्साह
भारताला पुन्हा विश्वचषक जिंकण्याची संधी! क्रिकेटप्रेमींचा उत्साह.
संतोष देशमुख हत्या प्रकरण; आरोपी जयराम चाटे एक दिवस जेलबाहेर
संतोष देशमुख हत्या प्रकरण; आरोपी जयराम चाटे एक दिवस जेलबाहेर.