AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महाराष्ट्राच्या विकासाला ब्रेक लावणारे हे कोण लोक आहेत?; पंतप्रधान मोदींचा महाविकास आघाडीवर घणाघात

तब्बल 76000 कोटी खर्च करण्यात येणार आहे. या कार्यक्रमावेळी भाषण करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाविकासआघाडीवर जोरदार हल्लाबोल चढवला.

महाराष्ट्राच्या विकासाला ब्रेक लावणारे हे कोण लोक आहेत?; पंतप्रधान मोदींचा महाविकास आघाडीवर घणाघात
| Updated on: Aug 30, 2024 | 3:57 PM
Share

PM Narendra Modi Palghar Vadhavan Port : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पालघरमधील वाढवण बंदराचा भूमीपूजनाचा सोहळा पार पडला. यामुळे देशाचा व्यापार आणि आर्थिक विकासाला चालना मिळणार आहे. यासाठी तब्बल 76000 कोटी खर्च करण्यात येणार आहे. या कार्यक्रमावेळी भाषण करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाविकासआघाडीवर जोरदार हल्लाबोल चढवला. “महाराष्ट्राचा विकास हे माझं प्राधान्य आहे. आज मेक इन इंडियाचा लाभ महाराष्ट्राला होत आहे. मात्र त्या अडीच वर्षात या ठिकाणी कोणतंही काम झालं नाही”, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

“भारताच्या प्रगतीत महाराष्ट्राची मोठी भूमिका”

“पालघरमधील वाढवण बंदरापासून दिल्लीचा महामार्ग जवळ आहे. वर्षभर इथून कार्गो येईल आणि जाईल. त्याचा लाभ तुम्हाला मिळेल. राज्यातील बहीण भावांना मिळेल. नव्या पिढीला मिळेल. महाराष्ट्राचा विकास हे माझं प्राधान्य आहे. आज मेकिंग इंडियाचा लाभ महाराष्ट्राला होत आहे. आज आत्मनिर्भर अभियानाचा लाभ महाराष्ट्राला होत आहे. आज भारताच्या प्रगतीत महाराष्ट्र मोठी भूमिका निभावत आहे”, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

“अडीच वर्ष कोणतंही काम झालं नाही”

महाराष्ट्र विरोधी दलाने तुमच्या विकासावर तुमच्या भल्यावर नेहमी ब्रेक लावण्याचं काम केलं. मी आज तुम्हाला एक उदाहरण देतो. आपल्या देशाला मोठ्या पोर्टची गरज होती. पालघरच त्यासाठी उपयुक्त जागा आहे. हा पोर्ट प्रत्येक हवामानात काम करू शकतो. पण ६० वर्ष हा प्रोजेक्ट लटकवला गेला. काही लोक सुरुच करत नव्हते. २०१४ मध्ये तुम्ही आम्हाला दिल्लीत पाठवलं. २०१६ मध्ये जेव्हा देवेंद्र फडणवीस यांचं सरकार आलं. तेव्हा त्यांनी गंभीरपणे काम सुरू केलं. २०२०मध्ये बंदर बनवण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर सरकार बदललं. त्यानंतर अडीच वर्ष या ठिकाणी कोणतंही काम झालं नाही, असा थेट आरोप पंतप्रधान मोदींनी केला.

महाराष्ट्राच्या विकासाला ब्रेक लावणारे हे लोक कोण?

एकट्या या प्रकल्पाने या ठिकाणी अनेक लाख कोटीची गुंतवणूक येणार आहे. १२ लाख रोजगार येणार आहे. या विकासाला कुणाचा विरोध होता. महाराष्ट्राच्या विकासाला ब्रेक लावणारे हे कोण लोक होते? राज्यातील तरुणांना रोजगार मिळण्यास कुणाचा आक्षेप होता? आधीच्या सरकारने हे काम पुढे का नाही नेलं? ही गोष्ट राज्यातील लोकांनी कधीच विसरू नये. खरं तर काही लोकांना महाराष्ट्राला मागास ठेवायचं आहे. पण आमची महायुतीचं सरकार राज्याला देशात सर्वात पुढे न्यायचं आहे, असेही पंतप्रधान मोदींनी म्हटले.

Follow Us
प्रतीक्षा संपली! मुंबईत पावसाच्या सरी, या भागात पवासाची हजेरी!
प्रतीक्षा संपली! मुंबईत पावसाच्या सरी, या  भागात पवासाची हजेरी!
पुण्यातील रेव्ह पार्टीच्या अंधारात खूप काही घडलं, 150 पैकी 72 जण गेले
पुण्यातील रेव्ह पार्टीच्या अंधारात खूप काही घडलं, 150 पैकी 72 जण गेले तरी कुठे? वडेट्टीवार यांचा गंभीर आरोप!
विरोधीपक्ष मोठ्या तयारीत? ममता बॅनर्जींची सोनिया गांधींसोबत बंद दाराआड
विरोधी पक्ष मोठ्या तयारीत? ममता बॅनर्जींची सोनिया गांधींसोबत बंद दाराआड चर्चा; 45 मिनीटे... काय घडलं?
यूट्यूब टिचर खान सरांच्या अटकेविषयी सर्वात मोठी अपडेट, कोर्टाने दिला..
यूट्यूब टिचर खान सरांच्या अटकेविषयी सर्वात मोठी अपडेट, कोर्टाने दिला महत्त्वाचा आदेश, आता...
राष्ट्रवादीत मोठं घडतंय? राजीनाम्याऐवजी नायकवडींना पवरांनी दिली मोठी..
राष्ट्रवादीत मोठं घडतंय? राजीनाम्याऐवजी नायकवडींना दिली मोठी जबाबदारी, स्वतःच म्हणाले...
पुणेकरांनो सावधान! पाणी वाचवा, नाहीतर नळ कोरडे पडतील
Pune Water Cut | पुणेकरांनो सावधान! पाणी वाचवा, नाहीतर नळ कोरडे पडतील; महापालिकेची मोठी घोषणा काय?
4 सिलेंडरनंतर महिलांनी काय करायचं? उरलेले 8 महिने धूरच घ्यायचा का?
Sachin Sawant | 4 सिलेंडरनंतर महिलांनी काय करायचं? उरलेले 8 महिने धूरच घ्यायचा का?; उज्ज्वला योजनेवरून काँग्रेसचा संताप
लक्ष्मण हाकेंच्या व्हिडीओने खळबळ, बड्या नेत्याबद्दल सांगताना...थेट केल
Video | लक्ष्मण हाकेंच्या व्हिडीओने खळबळ, बड्या नेत्याबद्दल सांगताना...थेट केलेल्या विधानाची राज्यात मोठी चर्चा!
धरण भरलं, आश्वासनं भरली; पण गावकऱ्यांच्या घागरी मात्र रिकाम्याच!
Dahanu | धरण भरलं, आश्वासनं भरली; पण गावकऱ्यांच्या घागरी मात्र रिकाम्याच! साखरे गावाचा पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष
Video | बच्चू कडूंच्या त्या वक्तव्यावर शिंदेची प्रतिक्रिया, हावभावानेच
Video | बच्चू कडूंच्या त्या वक्तव्यावर शिंदेची प्रतिक्रिया, हावभावानेच वेधलं लक्ष