AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नांदेड, बारामती, माढासह 22 जागा द्या, प्रकाश आंबेडकरांची नवी मागणी

मुंबई : काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून भारिपला आघाडीत घेण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. बैठकांवर बैठका होत आहेत. पण भारिपचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्याकडून ठोस आश्वासन मिळत नसल्याचं आघाडीच्या नेत्यांचं म्हणणं आहे. त्यातच आता प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीने 22 जागांची मागणी केली आहे. या 22 जागांवर प्रकाश आंबेडकरांकडून उमेदवारही जाहीर करण्यात आले आहेत. भारिपने ज्या 22 जागा […]

नांदेड, बारामती, माढासह 22 जागा द्या, प्रकाश आंबेडकरांची नवी मागणी
| Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 4:19 PM
Share

मुंबई : काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून भारिपला आघाडीत घेण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. बैठकांवर बैठका होत आहेत. पण भारिपचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्याकडून ठोस आश्वासन मिळत नसल्याचं आघाडीच्या नेत्यांचं म्हणणं आहे. त्यातच आता प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीने 22 जागांची मागणी केली आहे. या 22 जागांवर प्रकाश आंबेडकरांकडून उमेदवारही जाहीर करण्यात आले आहेत.

भारिपने ज्या 22 जागा जाहीर केल्यात, त्या 22 जागा हव्यात. त्यात मागेपुढे होऊ शकतं, पण आम्हाला जास्तीत जास्त जागा हव्यात. प्रकाश आंबेडकर आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट होईल का माहित नाही. पण वंचित बहुजन आघाडीची जास्तीत जास्त जागांची मागणी आहे, असं वंचित बहुजन आघाडीचे नेते लक्ष्मण माने यांनी आघाडीच्या नेत्यांसोबत बैठकीनंतर सांगितलं.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला कायद्याच्या चौकटीत आणण्यासाठी मसुदा द्या, अशी मागणी काँग्रेसने केली आहे. याबाबतही बैठकीत चर्चा झाल्याचं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी सांगितलं. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाडही बैठकीला उपस्थित होते. आघाडीबाबत सविस्तर चर्चा झाल्याचं ते म्हणाले.

“भारिपने मागितलेल्या 22 जागांमध्ये नांदेड, बारामती आणि माढा यांचाही समावेश आहे. प्रकाश आंबेडकरांना सोबत घेण्याची आमची मनापासून इच्छा आहे. त्यांना अजूनही विनंती करु. त्यांनी या तीन जागा मागितल्या आहेत याचा अर्थ ते चर्चा करायला तयार आहेत. पक्षश्रेष्ठी ठरवतील की मोदी लाटेतही निवडून आलेल्या जागा सोडायच्या किंवा नाही. सुप्रिया सुळे, शरद पवार आणि अशोक चव्हाण यांना निवडणूक लढायची की नाही याचा निर्णय घ्यावा लागेल,” असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.

प्रकाश आंबेडकरांकडून आघाडीकडे याअगोदर 12 जागांची मागणी करण्यात आली होती. त्यानंतर आता 22 जागा द्या ही नवी मागणी करण्यात आल्याने आघाडीच्या नेत्यांचीही डोकेदुखी वाढल्याचं चित्र आहे. विविध जिल्ह्यात सभा घेताना या सभेतच प्रकाश आंबेडकरांनी आतापर्यंत 22 उमेदवार जाहीर केले आहेत. या सर्व जागा आम्हाला सोडव्या, असं त्यांचं म्हणणं आहे. विशेष म्हणजे या जागांमध्ये मोदी लाटेतही निवडून आलेल्या जागांचा समावेश आहे.

मी केवळ शब्दाचा पक्का नाही, तर कामाचा माणूस आहे
मी केवळ शब्दाचा पक्का नाही, तर कामाचा माणूस आहे.
दुबेंना मोदी-शाहांचा पाठिंबा होता का? वर्षा गायकवाड यांची टीका
दुबेंना मोदी-शाहांचा पाठिंबा होता का? वर्षा गायकवाड यांची टीका.
सभागृहात न बसणाऱ्या खासदारांची पंतप्रधान मोदींकडून कानउघडणी!
सभागृहात न बसणाऱ्या खासदारांची पंतप्रधान मोदींकडून कानउघडणी!.
मुंबईच्या महापौरपदाच्या निवडणुकीसाठी ठाकरेंची सेना उमेदवार देणार
मुंबईच्या महापौरपदाच्या निवडणुकीसाठी ठाकरेंची सेना उमेदवार देणार.
वाहतूक कोंडीला नेहरूच जबाबदार म्हणू नका; अंबादास दानवेंचा खोचक टोला
वाहतूक कोंडीला नेहरूच जबाबदार म्हणू नका; अंबादास दानवेंचा खोचक टोला.
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावरून राऊत यांचा खोचक टोला
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावरून राऊत यांचा खोचक टोला.
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेनंतर 'विकासा'चा आणखी एक मार्ग झाला बंद
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेनंतर 'विकासा'चा आणखी एक मार्ग झाला बंद.
दुष्काळी तालुक्यात थंड प्रदेशातील राजमाची यशस्वी शेती
दुष्काळी तालुक्यात थंड प्रदेशातील राजमाची यशस्वी शेती.
पवार कुटुंबाची विद्या प्रतिष्ठानमध्ये बैठक; राज्याचं लक्ष
पवार कुटुंबाची विद्या प्रतिष्ठानमध्ये बैठक; राज्याचं लक्ष.
राजकीयदृष्टीनं सुरू असलेल्या चर्चेवरून दु:ख वाटतं! रोहित पवारांनी व्यक
राजकीयदृष्टीनं सुरू असलेल्या चर्चेवरून दु:ख वाटतं! रोहित पवारांनी व्यक.