AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नांदेड, बारामती, माढासह 22 जागा द्या, प्रकाश आंबेडकरांची नवी मागणी

मुंबई : काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून भारिपला आघाडीत घेण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. बैठकांवर बैठका होत आहेत. पण भारिपचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्याकडून ठोस आश्वासन मिळत नसल्याचं आघाडीच्या नेत्यांचं म्हणणं आहे. त्यातच आता प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीने 22 जागांची मागणी केली आहे. या 22 जागांवर प्रकाश आंबेडकरांकडून उमेदवारही जाहीर करण्यात आले आहेत. भारिपने ज्या 22 जागा […]

नांदेड, बारामती, माढासह 22 जागा द्या, प्रकाश आंबेडकरांची नवी मागणी
| Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 4:19 PM
Share

मुंबई : काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून भारिपला आघाडीत घेण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. बैठकांवर बैठका होत आहेत. पण भारिपचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्याकडून ठोस आश्वासन मिळत नसल्याचं आघाडीच्या नेत्यांचं म्हणणं आहे. त्यातच आता प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीने 22 जागांची मागणी केली आहे. या 22 जागांवर प्रकाश आंबेडकरांकडून उमेदवारही जाहीर करण्यात आले आहेत.

भारिपने ज्या 22 जागा जाहीर केल्यात, त्या 22 जागा हव्यात. त्यात मागेपुढे होऊ शकतं, पण आम्हाला जास्तीत जास्त जागा हव्यात. प्रकाश आंबेडकर आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट होईल का माहित नाही. पण वंचित बहुजन आघाडीची जास्तीत जास्त जागांची मागणी आहे, असं वंचित बहुजन आघाडीचे नेते लक्ष्मण माने यांनी आघाडीच्या नेत्यांसोबत बैठकीनंतर सांगितलं.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला कायद्याच्या चौकटीत आणण्यासाठी मसुदा द्या, अशी मागणी काँग्रेसने केली आहे. याबाबतही बैठकीत चर्चा झाल्याचं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी सांगितलं. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाडही बैठकीला उपस्थित होते. आघाडीबाबत सविस्तर चर्चा झाल्याचं ते म्हणाले.

“भारिपने मागितलेल्या 22 जागांमध्ये नांदेड, बारामती आणि माढा यांचाही समावेश आहे. प्रकाश आंबेडकरांना सोबत घेण्याची आमची मनापासून इच्छा आहे. त्यांना अजूनही विनंती करु. त्यांनी या तीन जागा मागितल्या आहेत याचा अर्थ ते चर्चा करायला तयार आहेत. पक्षश्रेष्ठी ठरवतील की मोदी लाटेतही निवडून आलेल्या जागा सोडायच्या किंवा नाही. सुप्रिया सुळे, शरद पवार आणि अशोक चव्हाण यांना निवडणूक लढायची की नाही याचा निर्णय घ्यावा लागेल,” असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.

प्रकाश आंबेडकरांकडून आघाडीकडे याअगोदर 12 जागांची मागणी करण्यात आली होती. त्यानंतर आता 22 जागा द्या ही नवी मागणी करण्यात आल्याने आघाडीच्या नेत्यांचीही डोकेदुखी वाढल्याचं चित्र आहे. विविध जिल्ह्यात सभा घेताना या सभेतच प्रकाश आंबेडकरांनी आतापर्यंत 22 उमेदवार जाहीर केले आहेत. या सर्व जागा आम्हाला सोडव्या, असं त्यांचं म्हणणं आहे. विशेष म्हणजे या जागांमध्ये मोदी लाटेतही निवडून आलेल्या जागांचा समावेश आहे.

Follow Us
खरातच्या भोंदूगिरीला बळी पडलेल्या राजेंद्र जासूद यांचा खळबळजनक खुलासा
खरातच्या भोंदूगिरीला बळी पडलेल्या राजेंद्र जासूद यांचा खळबळजनक खुलासा.
चंद्रकांत खैरे यांचा अघोरी पूजेबाबत धक्कादायक दावा, राजकीय वर्तुळात...
चंद्रकांत खैरे यांचा अघोरी पूजेबाबत धक्कादायक दावा, राजकीय वर्तुळात....
आपल्या वयाच्या आधीच दातांचं वय वाढतं? कसं? तुमचं डेंटल एज
आपल्या वयाच्या आधीच दातांचं वय वाढतं? कसं? तुमचं डेंटल एज.
दातांचे वय वाढण्यापूर्वी व्हा सावध; आजच तुमचं डेंटल एज तपासा
दातांचे वय वाढण्यापूर्वी व्हा सावध; आजच तुमचं डेंटल एज तपासा.
इराण-इस्त्रायल तणावाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारचा निर्णय
इराण-इस्त्रायल तणावाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारचा निर्णय.
कोल्हापूर जिल्हा प्रशासनाकडून पेट्रोल विक्रीबाबत मोठा निर्णय
कोल्हापूर जिल्हा प्रशासनाकडून पेट्रोल विक्रीबाबत मोठा निर्णय.
भोंदू बाबा अशोक खरातला पहिला सर्वात मोठा दणका... अखेर...
भोंदू बाबा अशोक खरातला पहिला सर्वात मोठा दणका... अखेर....
चाकणकर राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदावरून जाणार की राहणार?
चाकणकर राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदावरून जाणार की राहणार?.
भोंदूबाबा खरात याच्या वडिलांच्या दशक्रिया पत्रिकेत रुपाली चाकणकरचे नाव
भोंदूबाबा खरात याच्या वडिलांच्या दशक्रिया पत्रिकेत रुपाली चाकणकरचे नाव.
राज्यसभेच्या सीटवरून प्रियंका चतुर्वेदी नाराज?, संजय राऊत काय म्हणाले?
राज्यसभेच्या सीटवरून प्रियंका चतुर्वेदी नाराज?, संजय राऊत काय म्हणाले?.