AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अरविंद बनसोडे मृत्यू प्रकरण : गृहमंत्र्यांसह नितीन राऊतांचा दबाव, प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप

वंचित बहुजन आघाडीने प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी अरविंद बनसोडे मृत्यू प्रकरणी गंभीर आरोप केले आहेत (Prakash Ambedkar on Arvind Bansode death ).

अरविंद बनसोडे मृत्यू प्रकरण : गृहमंत्र्यांसह नितीन राऊतांचा दबाव, प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप
| Updated on: Jun 18, 2020 | 5:07 PM
Share

नागपूर : वंचित बहुजन आघाडीने प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी अरविंद बनसोडे मृत्यू प्रकरणी गंभीर आरोप केले आहेत (Prakash Ambedkar on Arvind Bansode death ). राज्याचे कॅबिनेट मंत्री नितीन राऊत आणि गृहमंत्री अनिल देशमूख अरविंद बनसोडे यांच्या कुटुंबावर दबाव आणत आहेत, असा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला. तसेच या प्रकरणाचा योग्य पद्धतीनं तपास झाला नसल्याचंही म्हटलं. यावेळी त्यांनी या प्रकरणातील तपास अधिकाऱ्यावर कारवाई करण्याचीही मागणी केली.

प्रकाश आंबेडकर म्हणाले, “आज अरविंद बनसोडच्या कुटुंबियांची नागपूर न्यायालय परिसरात भेट घेतली. कुटुंबियांच्या सांत्वनपर भेटीसाठी त्यांच्या घरी जात होतो. त्याचवेळी आज आरोपींना नागपूर जिल्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात येणार आहे हे समजल्यामुळे कुटुंबियांना कोर्ट परिसरात भेटलो. यावेळी अरविंदच्या वकिलांशीही सविस्तर बोलणं झालं. आम्ही अरविंद बनसोड परिवाराच्या या न्यायालयीन लढाईत सोबत आहोत.”

पोलिसांची भूमिका संशयास्पद, तपास सीबीआयकडे द्यावा

दरम्यान, प्रकाश आंबेडकर यांनी अरविंद बनसोडे मृत्यूप्रकरणात पोलिसांची भूमिका संशयास्पद असल्याचा आरोप केला आहे. तसेच हा तपास सीबीआयकडे देण्याची मागणी केली आहे. ते म्हणाले, “अरविंद बनसोड याची हत्या झाली आहे. पोलिसांमार्फत ही आत्महत्या असल्याचे जाणीवपूर्वक पसरवले जात आहे. त्यामुळे हे प्रकरण केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाकडे (सीबीआय) देण्यात यावे. नागपूर, थडीपवनी येथे अरविंद बनसोड याची हत्या करण्यात आली होती. 27 मे रोजी झालेल्या या हत्याप्रकरणी पोलिसांनी राजकीय दबावापोटी आत्महत्येचा गुन्हा दाखल करुन घेतला. कारण आरोपी मिथिलेश उमरकरचा गृहमंत्र्यांशी संबंध आहे. म्हणून हे प्रकरण दडपण्यात येत असल्याचा आरोप बनसोड यांच्या नातेवाईकांनी केला आहे.”

“घटना घडली त्यावेळेस मयत अरविंद बनसोड याचा मित्र गजानन राऊत हा घटनास्थळी उपस्थित होता. त्याच्या समोर आरोपींनी बनसोड याला जबर मारहाण केली. नंतर त्यांनीच बनसोडेला कीटकनाशक पाजले. प्रकरण हाताबाहेर गेल्याचे समजताच आरोपींनी कोणालाही न विचारता, बनसोडला स्वतःच्या गाडीत टाकून हॉस्पिटलमध्ये नेले. त्यापूर्वीच बनसोडचा मृत्यू झाला होता, अशी माहिती राऊत याने पोलिसांना दिली. मात्र, पोलीस याबाबत कायदेशीर कारवाई करायला तयार नाही. त्यामुळे हे प्रकरण सीबीआयकडे देण्यात यावं”, अशी मागणी प्रकाश आंबेडकर यांनी केली.

संबंधित बातम्या :

अरविंद बनसोडे मृत्यूप्रकरणात हालचाली, मृत्यूप्रकरणातील तपास अधिकारी बदलला

Breaking News | ‘अरविंद बनसोडेची आत्महत्या नव्हे हत्या’- प्रकाश आंबेडकर

संबंधित व्हिडीओ :

Prakash Ambedkar on Arvind Bansode death

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.