AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुण्यातील उपोषणकर्त्या आदिवासी विद्यार्थ्यांना मोठे यश, सरकारने जीआर काढले; आंदोलन मागे घेतलं!

पुण्यातून मोठी बातमी समोर आली आहे. मांजरी येथे सुरू असलेले आदिवासी विद्यार्थांचे उपोषण अखेर मागे घेण्यात आले आहे. तब्बल 17 दिवसांनी हे उपोषण मागे घेण्यात आले आहे.

पुण्यातील उपोषणकर्त्या आदिवासी विद्यार्थ्यांना मोठे यश, सरकारने जीआर काढले; आंदोलन मागे घेतलं!
Tribal Student Hunger Strike StopImage Credit source: TV 9 Marathi
| Updated on: Aug 29, 2026 | 10:05 PM
Share

पुण्यातून मोठी बातमी समोर आली आहे. मांजरी येथे सुरू असलेले आदिवासी विद्यार्थांचे उपोषण अखेर मागे घेण्यात आले आहे. तब्बल 17 दिवसांनी हे उपोषण मागे घेण्यात आले आहे. विद्यार्थ्यांनी उपोषण जरी सोडले असले तरी आंदोलन मात्र तात्पुरते स्थगित करण्यात आले असल्याची माहिती विद्यार्थ्यांनी दिली आहे. आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांच्या हस्ते या आदिवासी विद्यार्थ्यांनी आपले उपोषण सोडले आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

आदिवासी विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत या विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर सकारात्मक चर्चा झाली होती, राज्य सरकारने त्यांच्या मागण्या मान्य केल्या होत्या अशी माहितीही समोर आली आहे. त्यानंतर आज रात्री उशिरा मंत्री अशोक उईके यांनी आंदोलक विद्यार्थ्यांची भेट घेतली. यावेळी या विद्यार्थ्यांनी आपले उपोषण मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे.

आज दुपारी जोपर्यंत लेखी आश्वासन आणि शासनादेश (जीआर) हाती मिळत नाही, तोपर्यंत उपोषण मागे घेतले जाणार नाही, अशी आंदोलक विद्यार्थ्यांनी भूमिका घेतली होती. प्रवासाचा वेळ वगळता अडीच-तीन तासांत मंत्री महोदय आणि शिष्टमंडळ पोहोचेल आणि जीआर सादर करेल, त्यानंतरच आंदोलनाच्या समाप्तीची घोषणा केली जाईल असं विद्यार्थ्यांनी म्हटलं होतं. त्यानुसार आता उपोषण सोडवण्यात आले असून आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे.

विद्यार्थ्यांचा सरकारला इशारा

समोर आलेल्या माहितीनुसार, गेल्या 17 दिवसांपासून हे उपोषण सुरू होते. आज त्यांच्या 14 प्रमुख मागण्या सरकारने मान्य केल्या आहेत. यापैकी दोन मागण्याचे GR राज्य सरकारकडून काढण्यात आले आहेत. या दोन्ही मागण्याचे जीआर घेऊन मंत्री अशोक उईके हे आंदोलनस्थळी पोहोचले आहेत. यानुसार 12 हजार 500 जागांची पदभरती 6 महिन्यांत पूर्ण केली जाणार आहे. तसेच उर्वरित मागण्या या 3 महिन्यांमध्ये मान्य केल्या जाणार आहेत असे आश्वासन सरकारकडून या विद्यार्थ्यांना देण्यात आले आहे. मात्र 3 महिन्यांमध्ये मागण्या मान्य न झाल्यास पुन्हा उपोषण करण्यात येईल असा इशाराही सरकारला देण्यात आला आहे.

Follow Us
मराठा आरक्षणावर 12 डिसेंबरला मनोज जरांगे पाटील घेणार मोठा निर्णय!
मराठा आरक्षणावर 12 डिसेंबरला मनोज जरांगे पाटील घेणार मोठा निर्णय!
मुंबई उच्च न्यायालयाने अन्न व औषध प्रशासनाला फटकारले...
'तुम्ही स्वतःला देव समजता का?' मुंबई उच्च न्यायालयाचा तुकाराम मुंडेंच्या अन्न व औषध प्रशासनाला सवाल
'नमो सहकार टॅक्सी'अंतर्गत मुंबै बँकेमार्फत टॅक्सी खरेदीसाठी 95% कर्ज
प्रवीण दरेकर यांची मोठी घोषणा; नमो सहकार टॅक्सी अंतर्गत मुंबै बँकेमार्फत टॅक्सी खरेदीसाठी 95 टक्के कर्ज...
मुंबईत मोठ्या गणेश मंडळांच्या बाप्पांचे जल्लोषात आगमन!
मुंबईत मोठ्या गणेश मंडळांच्या बाप्पांचे जल्लोषात आगमन; गणेशोत्सवाला उत्साहात सुरुवात!
विठ्ठलवाडी आगाराच्या बस चालकाची दादागिरी; थेट ॲम्ब्युलन्सच अडवली...
कल्याणमध्ये विठ्ठलवाडी आगाराच्या बस चालकाची दादागिरी; ॲम्ब्युलन्स अडवली, नागरिकांचा संताप...
अस्वच्छतेमुळे सिंधुदुर्ग रुग्णालयाचे उपहारगृह बंद; परवाना निलंबित
सिंधुदुर्ग शासकीय रुग्णालयाच्या उपहारगृहात मिसळमध्ये आढळले झुरळ; एफडीएची कारवाई
नेपाळ महापुरात बँकेची तिजोरी नदीत वाहून गेली
नेपाळ महापुरात बँकेची तिजोरी नदीत वाहून गेली. २९ जणांना लुटमारीचा प्रयत्न करताना अटक
कुंभमेळ्याला बदनाम करणे थांबवा, अन्यथा नाशिककर चोप देतील; राऊतांना...
कुंभमेळ्याला बदनाम करणे थांबवा, अन्यथा नाशिककर चोप देतील; बड्या नेत्याचा राऊतांना इशारा
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी गृहमंत्री अमित शाह यांना बांधली राखी,
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी गृहमंत्री अमित शाह यांना बांधली राखी, पहा खास क्षणाचा व्हिडीओ
ममता बॅनर्जींवर थेट गुन्हा दाखल, कोर्टाच्या आदेशात...नेमकं प्रकरण काय?
ममता बॅनर्जींवर थेट गुन्हा दाखल, कोर्टाच्या आदेशात... नेमकं प्रकरण काय?