8 महिने काबाड कष्ट करुन 30 हजार मासे वाढवले, इंदापुरात एका रात्रीत सर्व माशांचा मृत्यू, कारण काय?

राहुल ढवळे

| Edited By: |

Updated on: Aug 10, 2021 | 4:11 PM

इंदापूर तालुक्यातील पळसदेवजवळ असलेल्या शेलारपट्टा परिसरातील एका शेततळ्यातील 5 टन मासे अचानक मृत्यूमुखी पडले आहेत. अशोक केवटे असं शेततळ्याच्या मालकाचं नाव आहे.

8 महिने काबाड कष्ट करुन 30 हजार मासे वाढवले, इंदापुरात एका रात्रीत सर्व माशांचा मृत्यू, कारण काय?
Follow us

पुणे : इंदापूर तालुक्यातील पळसदेवजवळ असलेल्या शेलारपट्टा परिसरातील एका शेततळ्यातील 5 टन मासे अचानक मृत्यूमुखी पडले आहेत. अशोक केवटे असं शेततळ्याच्या मालकाचं नाव आहे. इतक्या माशांचा अचानक मृत्यू झाल्यानं शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालंय. मृत झालेले मासे रूपचंद जातीचे होते. अज्ञात व्यक्तीने शेततळ्याच्या पाण्यात विषारी औषध टाकल्यानं मृत्यू झाल्याचा संशय आहे. पीडित शेतकऱ्याने इंदापूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

अशोक केवटे यांनी त्यांच्या शेततळ्यात 8 महिन्यांपूर्वी रूपचंद जातीचे 30 हजार बीज सोडले होते. सध्या या माशांचे वजन 500 ते 700 ग्रॅम झाले होते. मात्र रात्री अचानक अज्ञात व्यक्तीने पाण्यात विषारी औषध टाकल्याने सुमारे 5 टन माशांचा मृत्यू झाला. यात या शेतकऱ्याचे सुमारे 5 लाखांचे नुकसान झाले आहे.

संबंधित व्हिडीओ पाहा :

हेही वाचा :

विषारी औषधामुळे शेततळ्यातील पाच टन माशांचा मृत्यू

मासे खाण्याचा विचार करताय? सावधान, मुरबाडात माशात लाल-सफेद जंतू, पाहा Video

लॉकडाऊननंतर क्रॉफर्ड मार्केटमधील मासेविक्रेत्यांसमोर नवं संकट, जागाच मिळत नसल्याने धंदा बसला

30 thousand fish dead in farm lake of Indapur Pune due to Poison

Non Stop LIVE Update

Related Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI