AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Unauthorized schools : अनधिकृत शाळांचं फुटलं पेव! राज्यात 674 तर पुण्यातल्या 22 शाळांना मान्यताच नाही..! शिक्षण विभाग करणार दंडात्मक कारवाई

शासनाचे परवानगी आदेश आणि ना हरकत प्रमाणपत्र प्राप्त झाल्याशिवाय कोणालाही शाळा सुरू करता येत नाही. अनधिकृतरित्या शाळा सुरू ठेवल्यास संबंधित शाळा व्यवस्थापनाला एक लाख रुपये दंड आणि शाळा बंद करण्याच्या सूचना दिल्या जातात.

Unauthorized schools : अनधिकृत शाळांचं फुटलं पेव! राज्यात 674 तर पुण्यातल्या 22 शाळांना मान्यताच नाही..! शिक्षण विभाग करणार दंडात्मक कारवाई
शाळा (प्रातिनिधिक छायाचित्र)Image Credit source: tv9
| Updated on: May 23, 2022 | 1:24 PM
Share

पुणे : राज्यात सध्या अनधिकृत शाळांचे (Unauthorized schools) पेव फुटले असून पुणेही त्यात मागे नाही. राज्यभरात 674 शाळा अनधिकृत असल्याचे समोर आले आहे. तर त्यातील 22 शाळा या पुण्यातील आहेत. या अनधिकृत शाळांवर आता कारवाई होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. शासनाची कोणतीही परवानगी न घेता राजरोसपणे या शाळा सुरू आहेत. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांची फसवणूक होत आहे. या सर्व शाळांची यादी शिक्षण विभागाला (Education department) मिळाली आहे. या शाळांची नावे जाहीर करून त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली जाणार आहे. तर कोणत्याही भौतिक सुविधा नसल्याने दुसऱ्या ठिकाणी राज मंडळाची बारावीची परीक्षा घेणाऱ्या 14 शाळांची मान्यता (Permission) रद्द करण्याची प्रक्रिया नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वीच केली जाणार आहे. काही संस्थाचालकांनी शासनाच्या नियम-अटींचे पालन केले आहे, मात्र परवानगी नाही. त्यामुळे अशा शाळांवर काय कारवाई होते, हे पाहावे लागणार आहे.

अनधिकृत शाळा बंद न केल्यास दंड

शासनाकडून राज्यातील सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांची नोंद यू डायसवर केली जाते. विद्यार्थ्याच्या आधारकार्डची माहिती संकेतस्थळावर भरली जाते. मात्र काही अनधिकृत शाळांनी मान्यतेसाठी शासनाकडे पत्रव्यवहार केला आहे. त्यादरम्यान परवानगी मिळालेली नसतानाही शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. त्यामुळे अशा शाळांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. शासनाचे परवानगी आदेश आणि ना हरकत प्रमाणपत्र प्राप्त झाल्याशिवाय कोणालाही शाळा सुरू करता येत नाही. अनधिकृतरित्या शाळा सुरू ठेवल्यास संबंधित शाळा व्यवस्थापनाला एक लाख रुपये दंड आणि शाळा बंद करण्याच्या सूचना दिल्या जातात. त्यानंतरही बंद न ठेवल्यास 10 लाख रूपये प्रतिदिवस दंड ठोठावण्यात यावा, असे आदेश शिक्षण विभागाने दिले आहेत.

भौतिक सुविधा नसलेल्या शाळांची मान्यता रद्द

भौतिक सुविधा नसल्यानेही अनेक शाळांची मान्यता रद्द करण्याची प्रक्रियाही सुरू झाली आहे. अशा जवळपास 14 शाळा आहेत. त्यात सहा शाळांची सुनावणी पूर्ण झाली असून चार शाळांची बाकी आहे. नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी त्यांची मान्यता काढली जाणार असल्याचे शिक्षणाधिकाऱ्यांनी सांगितले आहे. तर याप्रकरणी पुणे विभागाचे शिक्षण संचालक औदुंबर उकिरडे म्हणाले, की शिक्षण अधिकाऱ्यांकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरात 22 शाळा अनधिकृत असल्याचे समोर आले आहे. त्याची यादी प्रसिद्ध करून दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.