AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ajit Pawar : दोनच मुलांवर थांबा… देवाची नाही, आपलीच कृपा असते; अजितदादा यांची मिश्किल टोलेबाजी

मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन केलं. मुख्यमंत्र्यांबरोबर त्यांची चर्चा झाली. निवृत्त न्यायाधीश शिंदे यांची समिती नेमली आहे. ते अभ्यास करत आहेत. सर्व पक्षीयांची बैठक घेतली. सर्वांनी सांगितलं 52 टक्के आरक्षणाला धक्का न देता राहिलेल्यामधून आरक्षण द्या. आमचा पाठिंबा आहे.

Ajit Pawar : दोनच मुलांवर थांबा... देवाची नाही, आपलीच कृपा असते; अजितदादा यांची मिश्किल टोलेबाजी
ajit pawar Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 23, 2023 | 2:50 PM
Share

सागर सुरवासे, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, सोलापूर | 23 ऑक्टोबर 2023 : वाढती लोकसंख्या आणि त्यामुळे होणारे दुष्परिणाम यावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मिश्किल भाष्य केलं आहे. दिवसे न् दिवस पिढी वाढते तसं शेतीत तुकडे पडतात. त्यामुळे शेतकरी अल्पभूधारक होतो. कुणी थांबायलाच तयार नाही. स्वातंत्र्य मिळालं तेव्हा आपण 35 कोटी होतो. आता 140 कोटी झालो आहोत. चौपट लोकसंख्या वाढली. आपण एकदोन अपत्यावर थांबलं पाहिजे. सर्व समाजाने दोन मुलावर थांबलं पाहिजे. कोणत्याही जाती धर्म, पंथात काही सांगितलेलं नाही. देवाची कृपा.. देवाची कृपा… काही देवाची कृपा नसते. आपलीच कृपा असते, अशी मिश्किल टोलेबाजी अजित पवार यांनी केली.

अजित पवार आज सोलापूरच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी पार पडलेल्या सभेला ते संबोधित करत होते. मराठा आरक्षणाची गेल्या 63 वर्षात कधी मागणी नव्हती. विलासराव देशमुख असताना आरक्षणाच्या मागणीने डोकं वर काढलं. पृथ्वीराज चव्हाण यांच्या काळात आरक्षण द्यायचा निर्णय झाला. आम्हाला जो सल्ला देण्यात आला त्या पद्धतीने आम्ही आरक्षण दिलं. पण कोर्टात टिकलं नाही. नंतर फडणवीस यांचं सरकार आलं. त्यांनी दिलेलं आरक्षण उच्च न्यायालयात टिकलं. पण सर्वोच्च न्यायालयात टिकलं नाही, अशी माहिती अजित पवार यांनी दिली.

मीही मराठाच

कुणबी प्रमाणपत्र द्या असं जरांगे पाटील यांचं म्हणणं आहे. ओबीसीत 350 जाती आहेत. कुणबीही आहेत, त्यांना आरक्षण आहे. विदर्भात देशमुखांना आरक्षण आहे. निजामशाहीतील काळातील रेकॉर्ड तपासायला सांगितलं. तोही प्रयत्न सुरू आहे. मीही मराठा समाजाचा आहे. दुसऱ्या समाजाचा नाही. मलाही समाजातील गरीब वर्गाला आरक्षण मिळावं वाटतं. आमच्या मुलामुलींना आरक्षणाची गरज नाही. पण समाजातील एका वर्गाला आरक्षणाची गरज आहे, असं त्यांनी सांगितलं.

राज्यातील आरक्षण 62 टक्क्यांवर

आपल्या राज्यात 52 टक्के आरक्षण आहे. आदिवासी, मागासवर्गीय, इतर मागासवर्गीय आणि भटक्यांना हे आरक्षण आहे. आर्थिकदृष्ट्या मागासांना 10 टक्के आरक्षण दिलं. त्यामुळे आरक्षण एकूण 62 टक्के झालं. आरक्षणासाठी 58 मोर्चे निघाले. आम्हीही त्या मोर्चात असायचो. कोणताही बोर्ड नसायचा. सकल मराठा समाज या बॅनरखाली सर्व एकवटले होते, असं ते म्हणाले.

52 टक्के समाज बिथरेल ना

आम्ही राज्यकर्ते आहोत. आम्ही आरक्षण दिलं आणि टिकलं नाही तर लोक म्हणतील आम्हाला फसवतात. बनवतात. अशाच पद्धतीने समाजाचा दृष्टीकोण होईल. त्यामुळे दूधाने तोंड पोळल्याने ताक फुंकून पितो तसा प्रयत्न सुरू आहे. आज समजून घेण्याची मानसिकता मराठा तरुण-तरुणीची राहिली नाही. कुणालाही नाऊमेद करण्याचा आमचा प्रयत्न नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं. सोशल मीडियात आमच्याबद्दल काहाही पसरवलं जातं. आम्ही आरक्षणाच्या बाजूचे आहोत. पण आता दिलेल्या आरक्षणाला धक्का न देता आरक्षण द्यायचं आहे. नाही तर 52 टक्के समाज बिथरेल ना, असं ते म्हणाले.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.