AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सरकारी कर्मचाऱ्यांना आणखी एका धक्का, आता काय घेतला शिंदे-फडणवीस सरकारने निर्णय

अनेक वर्ष एकाच ठिकाणी काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना शिंदे-फडणवीस सरकारने धक्का दिला आहे. पुणे जिल्ह्यातील तहसीलदारांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. त्याचवेळी पुणे मनपाने अभियंत्यांचाही बदल्या केल्या आहेत.

सरकारी कर्मचाऱ्यांना आणखी एका धक्का, आता काय घेतला शिंदे-फडणवीस सरकारने निर्णय
सरकारी कर्मचारीImage Credit source: टीव्ही९ नेटवर्क
| Updated on: Apr 13, 2023 | 12:34 PM
Share

योगेश बोरसे, पुणे : एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांना आणखी एक धक्का दिला आहे. एकाच विभागामध्ये वर्षानुवर्षे काम करणारे अधिकाऱ्यांना हा धक्का दिला आहे. राज्य शासनाचे सहसचिव माधव वीर यांनी काढलेल्या आदेशामुळे अनेक अधिकाऱ्यांना आपले सध्याचे कार्यालय सोडावे लागणार आहे. या अधिकाऱ्यांना नवीन ठिकाणी जाण्यासाठी कमी मुदत दिली आहे. येत्या १७ एप्रिलपर्यंत त्यांना नवीन जागेवर रुजू व्हावे लागणार आहे. यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून एकाच ठिकाणी ठाण मांडलेल्या अधिकाऱ्यांना हा धक्का आहे. पुणे मनपातील अधिकाऱ्यांनाही धक्का दिला आहे.

काय घेतला निर्णय

पुणे विभागातील 13 तहसीलदारांच्या बदल्या शिंदे-फडणवीस सरकारने केल्या आहेत. या सर्व जणांना 17 तारखेपर्यंत नवीन ठिकाणी हजर राहण्याचे आदेश सहसचिव माधव वीर यांनी काढले आहेत. पुणे जिल्ह्यातील बारामती, आंबेगाव, मावळ, वेल्हा ,मुळशी या पाच तालुक्यातील तहसीलदारांच्या बदल्या झाल्या आहेत.

पुणे मनपात बदल्या

अनेक वर्ष एकाच विभागात काम करणाऱ्या अभियंत्यांच्या बदल्या पुणे महानगरपालिकेने केल्या आहेत. 132 अभियंत्यांच्या बदल्या महापालिका प्रशासनाकडून करण्यात आल्या आहेत. अभियंत्यांना तीन वर्षापेक्षा एकाच विभागात जास्त काळ ठेऊ नये असा आदेश असताना काहीजण सहा सहा वर्षे एकाच विभागात होते.

राजकीय पक्षांच्या तक्रारी

अधिकारी अन् कर्मचाऱ्यांकडून नागरिकांची अडवणूक होते, भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप राजकीय पक्षांनी केला होता. त्यानंतर प्रशासनाने 132 कनिष्ठ अभियंत्यांच्या तडकाफडकी बदल्या केल्या आहेत. स्थापत्य पदावरील 109, विद्युत पदावरील 17 आणि यांत्रिकी पदावरील 6 कनिष्ठ अभियंत्यांचा समावेश आहे. पुढील काही दिवसांतच अधीक्षक आणि लिपिकांच्या देखील बदल्या करण्यात येणार आहे.

यांनी केली होती तक्रार

काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे आणि शिवसेना (शिंदे गट) शहरप्रमुख नाना भानगिरे यांनी महापालिका आयुक्तांना निवेदन देऊन तक्रारी केल्या होत्या. पुणे मनपातील अनेक अधिकारी वर्षानुवर्षे एकाच विभागात असल्याचा आरोप त्यांनी केला होता. हे अधिकारी नागरिकांची अडवणूक करतात. त्यांची तातडीने बदली करावी, अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा दिला होता.त्याची दखल घेत महापालिकेच्या सामान्य प्रशासनाने सहा वर्षे एकाच विभागात कार्यरत असलेल्या 132 अभियंत्यांच्या बुधवारी तडकाफडकी बदल्या केल्या.

हे ही वाचा

Ratan Tata House Photos : रतन टाटा यांचे घर पहिले का? काय आहेत सुविधा जाणून घ्या?

 

दोन दिवस राज्यातील जवळपास सर्वच जिल्ह्यांना यलो अलर्ट, गारपीट अन् अवकाळीचे संकट

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.