राज्यपालांना नावं ठेवण्यात अर्थ नाही, आम्ही त्यांना उशिरा कळवलं; भुजबळांनी दिलं स्पष्टीकरण

सावित्रीबाई फुले विद्यापीठात सावित्रीबाई फुले यांचा पुतळा बसविण्यात आला आहे. पुतळ्याचे काम पूर्ण होत आले आहे. मात्र, पुतळा अनावरणाच्या कार्यक्रमाचं राज्यपालांना उशिरा निमंत्रण देण्यात आलेलं आहे.

राज्यपालांना नावं ठेवण्यात अर्थ नाही, आम्ही त्यांना उशिरा कळवलं; भुजबळांनी दिलं स्पष्टीकरण
chhagan bhujbal
Follow us
| Updated on: Jan 03, 2022 | 11:21 AM

पुणे: सावित्रीबाई फुले विद्यापीठात सावित्रीबाई फुले यांचा पुतळा बसविण्यात आला आहे. पुतळ्याचे काम पूर्ण होत आले आहे. मात्र, पुतळा अनावरणाच्या कार्यक्रमाचं राज्यपालांना उशिरा निमंत्रण देण्यात आलेलं आहे. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. राज्यपालांना नावं ठेवण्यात अर्थ नाही. आम्हीच त्यांना उशिरा कळवलं होतं, असं राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी स्पष्ट केलं आहे.

छगन भुजबळ यांनी मीडियाशी बोलताना ही माहिती दिली. 3 तारखेला जयंतीदिनी आज अनावरण करावं हा आमचा प्रयत्न होता. पण एक महिन्यात सगळ्या घडामोडी घडल्या आहेत. काम अर्धवट राहिलं. त्यामुळे राज्यपालांना एक महिना आधी कळवण शक्य नव्हतं. काम पूर्ण होईल की नाही याची शाश्वती नव्हती. त्यामुळे राज्यपालांना निमंत्रण दिल आणि काम पूर्ण झालं नसतं तर? राज्यपालांना नाव ठेवण्यात अर्थ नाही, राज्यपालांना आम्ही उशिरा कळवलं, काम पूर्ण होईल कीं नाही याबाबत शंका होती, असं ते म्हणाले. आता 9 तारखेला संध्याकाळी विद्यापीठातील पुतळा अनावरणाचा कार्यक्रम होईल. आणखी 8 दिवस मिळताहेत चांगलं काम करू. राज्यपालांनी दुसरे कार्यक्रम घेतले होते. 2 ते 4 दिवसांनी राज्यपाल येतील त्याने काही फरक पडणार नाही, असंही त्यांनी सांगितलं.

राणेंकडून अपेक्षा उंचावल्यात

मी सगळ्यांना पुरुन उरलोय, या केंद्रीय सुक्ष्म, लघु, मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांच्या विधानाचीही त्यांनी खिल्ली उडवली. नारायण राणे मोठ्या पदावर आहेत, ते केंद्राचे मंत्री आहेत.राज्य शासनाचे 50 हजार कोटी केंद्राकडे अडकून पडलेत. त्यासाठी त्यांनी प्रयत्न करावा. त्यांच्याकडून फार अपेक्षा उंचावल्या आहेत. मोठ्या योजना त्यांनी राज्यासाठी आणाव्यात, असा टोला भुजबळांनी राणेंना लगावला आहे.

12 कोटी जनतेची जनगणना करायचीय, एका गावाची नाही

यावेळी भुजबळांनी ओबीसी आरक्षणावरही प्रतिक्रिया व्यक्त केली. आवश्यक असलेली सर्व पूर्तता शासनाच्या वतीने केलेली आहे. एका गावाची जनगणना करायची नाही, 12 कोटी जनतेची करायची आहे. कोरोनाच्या काळात लोकांनी घरोघरी जाऊन जनगणना करावी अशी इच्छा असेल तर ते लोकांसाठी अन्यायकारक असेल. आरक्षण टिकलं पाहिजे एवढी माझी इच्छा आहे, असंही ते म्हणाले. एका दिवसात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढलीय. अशावेळी लॉकडाउन करावा अशी माझीही इच्छा नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं.

संबंधित बातम्या:

लॉकडाऊन लागणार काय?; राज्याला किती लसींची गरज, मास्क कोणता वापरावा?; वाचा तुमच्या मनातील प्रश्नांना राजेश टोपेंचे उत्तर

Property tax| आमचाही मालमत्ता कर रद्द करा; राज्यभरातील प्रमुख शहरांतून मुख्यमंत्र्यांकडे मागणी, सरकार काय करणार?

Children Covid Vaccination: जालन्यात आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते किशोरवयीनांच्या लसीकरणाला सुरुवात

Non Stop LIVE Update
महायुतीत जागांचा तिढा सुटला, कुणाला कुठं मिळणार लोकसभेचं तिकीट?
महायुतीत जागांचा तिढा सुटला, कुणाला कुठं मिळणार लोकसभेचं तिकीट?.
मतांसाठी कचाकचा बटण, घटनेसाठी किरकोळ बदल ते दौपदी...दादा सापडले वादात
मतांसाठी कचाकचा बटण, घटनेसाठी किरकोळ बदल ते दौपदी...दादा सापडले वादात.
दादांना पक्षचिन्ह मिळाल, पण जागांच काय? प, महाराष्ट्रातून घड्याळ गायब?
दादांना पक्षचिन्ह मिळाल, पण जागांच काय? प, महाराष्ट्रातून घड्याळ गायब?.
तर तुतारी वाजवून टाका, राणांच्या विधानानंतर सुजय विखेंच वक्तव्य चर्चेत
तर तुतारी वाजवून टाका, राणांच्या विधानानंतर सुजय विखेंच वक्तव्य चर्चेत.
हा आचारसंहितेचा भंग नाही?दादांच्या वक्तव्यावर ठाकरेंच्या नेत्याचा सवाल
हा आचारसंहितेचा भंग नाही?दादांच्या वक्तव्यावर ठाकरेंच्या नेत्याचा सवाल.
राणा दाम्पत्याची अडसूळांनी काढली अक्कल; म्हणाले, राजकारण सोडेल पण...
राणा दाम्पत्याची अडसूळांनी काढली अक्कल; म्हणाले, राजकारण सोडेल पण....
पुढे द्रौपदीचा विचार...मुलींच्या जन्मदरावर दादांच्या वक्तव्याची चर्चा
पुढे द्रौपदीचा विचार...मुलींच्या जन्मदरावर दादांच्या वक्तव्याची चर्चा.
थेट विमानातून पंतप्रधान मोदी झाले 'त्या' विलक्षण सोहळ्याचे साक्षीदार
थेट विमानातून पंतप्रधान मोदी झाले 'त्या' विलक्षण सोहळ्याचे साक्षीदार.
उदयनराजेंना तिकीट मिळालं पण भाजपने अपमान केला, अभिजीत बिचुकलेंची टीका
उदयनराजेंना तिकीट मिळालं पण भाजपने अपमान केला, अभिजीत बिचुकलेंची टीका.
संध्याकाळी 6 वाजेनंतर उमेदवारांना प्रचार करता येणार नाही, कारण....
संध्याकाळी 6 वाजेनंतर उमेदवारांना प्रचार करता येणार नाही, कारण.....