Pune : शेतात खोदलेल्या खड्ड्यात बुडून तीन चिमुकल्यांचा दुर्दैवी मृत्यू; पुण्यातल्या आंबेठाण गावातली घटना

खेळता खेळता या डबक्यात ही मुले घसरली. त्यांना तत्काळ रुग्णवाहिकेद्वारे प्राथमिक उपचाराकरिता रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

Pune : शेतात खोदलेल्या खड्ड्यात बुडून तीन चिमुकल्यांचा दुर्दैवी मृत्यू; पुण्यातल्या आंबेठाण गावातली घटना
शेतात खोदलेल्या याच खड्ड्यात बुडून तीन मुलांचा झाला मृत्यूImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jul 12, 2022 | 6:00 PM

चाकण, पुणे : आंबेठाण गावातील लांडगे वस्तीवर शेतातील खड्ड्यात बुडून तीन चिमुकल्या भावडांचा दुर्दैवी मृत्यू (Children Dead) झाला आहे. खेड तालुक्यातील आंबेठाण गावातील लांडगे वस्तीवर शेतात एका खासगी व्यक्तीने खड्डा उकरून ठेवला आहे. या खड्ड्यात पाणी साचले होते. त्या ठिकाणी खेळता खेळता तीन भावडांचा पाण्यात बुडून मृत्यू (Drowning) झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बिहार येथील किशोर दास यांचे कुटुंब कामाच्या निमित्ताने लांडगे वस्ती येथे भाड्याने राहत होते. मृत्यू पावलेले तीन चिमुकले हे त्यांची अपत्ये होती. किशोर दास हे मूळ बिहार (Bihar) राज्यातील रहिवासी आहेत. त्यांना एकूण चार अपत्ये आहेत. त्यातील रोहित दास (वय 8), राकेश दास (वय 6), श्वेता दास (वय 4) अशी मृत पावलेल्या मुलांची नावे आहेत.

डॉक्टरांनी घोषित केले मृत

एका बेजबाबदार व्यक्तीने हा खड्डा करून ठेवल्याने हा मोठा अनर्थ झाल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. घटनास्थळी मदत कार्याची टीम आणि महाळुंगे पोलीस चौकीचे पोलीस प्रशासन दाखल झाले. खेळता खेळता या डबक्यात ही मुले घसरली. त्यांना तत्काळ रुग्णवाहिकेद्वारे प्राथमिक उपचाराकरिता रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. तीन लहान भावंडे एकाच घरातील होती. दोन मुले आणि एक मुलगी यात मृत पावले आहेत.

हे सुद्धा वाचा

‘पालकांनी पाल्यांवर लक्ष ठेवावे’

मृतदेह शवविच्छेदनासाठी वायसीएम रुग्णालयात पाठविण्यात आले आहेत. पुढील तपास महाळुंगे पोलीस करत आहेत. दरम्यान, सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे. अनेक ठिकाणी पुराचीही स्थिती निर्माण झाली आहे. अनेक ठिकाणच्या शाळा काही काळासाठी बंद ठेवण्यात आल्या आहेत. अशावेळी पालकांनी आपल्या मुलांवर लक्ष ठेवणे गरजेचे आहे. त्यांना अशा वातावरणात शक्यतो बाहेर पडू देऊ नये. पाण्याची खोली कुठे किती असेल याचा अंदाज येत नाही. अशावेळी जास्त काळजी घ्यावी. अशाप्रकारच्या खड्ड्यांच्या बाजूला अडथळा असणे गरजेचे आहे, अशी खबरदारी घेण्याचे आवाहन पोलीस प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

Non Stop LIVE Update
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.