AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pune Heat : उकाड्यानं उडवली पुणेकरांची झोप! काय सांगतायत वैद्यकीय क्षेत्रातले तज्ज्ञ? वाचा…

झोपेसाठी कार्यक्षम थर्मोरेग्युलेशन महत्त्वाचे आहे, जसे वातावरणीय तापमान असते, त्यामुळे तापमान थंड असताना, म्हणजेच सूर्यास्तानंतर मनुष्य झोपेकडे जैविकदृष्ट्या प्रवृत्त असतो. बाहेरील उच्च तापमानामुळे शरीराला थंडावा मिळणे आणि चांगली झोप घेणे कठीण होते.

Pune Heat : उकाड्यानं उडवली पुणेकरांची झोप! काय सांगतायत वैद्यकीय क्षेत्रातले तज्ज्ञ? वाचा...
प्रातिनिधिक छायाचित्रImage Credit source: tv9
| Updated on: May 11, 2022 | 7:30 AM
Share

पुणे : सध्या पुण्यात ढगाळ (Cloudy) वातावरण असले तरी मागच्या काही दिवसांपासूनच्या उकाड्याने पुणेकर हैराण झाले आहेत. उष्णतेच्या (Heat) या लाटेने अनेकांच्या झोपेचे वेळापत्रक बिघडवले आहे. त्यामुळे अनेकांना झोप लागणे कठीण झाले आहे. मला सुस्त पण अस्वस्थ वाटते. दिवसभरात थोडीशी गैरसोय झाली तरी मला चिडचिड होते. हे सर्व उष्णतेमुळे होत असून मला रात्री नीट झोप येत नाही, अशा तक्रारी पुणेकर करत आहेत. अनेक भागात कमाल तापमान 40 अंश सेल्सिअसच्या वर गेल्याने आणि सूर्यास्तानंतरही उकाडा फारसा कमी होत नसल्याने अनेक नागरिकांची रात्रीची शांत झोप (Sleep) उडाली आहे. किती तास झोप होते, यापेक्षा किती शांत झोप लागते, हे महत्त्वाचे असल्याचे वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ सांगतात. त्यामुळे एकूणच काय वातावरणात गारवा येईपर्यंत पुणेकरांची झोप हा उन्हाळा उडवत राहणार असे दिसत आहे.

उष्णतेचा परिणाम

काही लोकांना तीव्र उष्णतेमुळे काही आठवडे नीट झोप लागली नाही. रात्रभर डोळे मिटून अंथरुणावर पडणे, एका कुशीवरून दुसऱ्या कुशीवर लोळणे असे प्रकार होत असतात. यामुळे झोप कमी होऊ शकते. अनेकांनी झोपेच्या पद्धतींमध्ये व्यत्यय आल्याची तक्रार केली आहे, अनेक वेळा त्यांना मध्येच जाग आली आहे. प्रौढ लोक त्यांच्या झोपेच्या कालावधीपैकी फक्त 20-25% रॅपिड आय मूव्हमेंट (REM) सायकलमध्ये घालवतात, परंतु शांत अवस्थेत जाणे विशेषतः उष्णतेमुळे कठीण झाले आहे, असे तज्ज्ञांचे मत आहे.

जड खाणे टाळा

झोपेसाठी कार्यक्षम थर्मोरेग्युलेशन महत्त्वाचे आहे, जसे वातावरणीय तापमान असते, त्यामुळे तापमान थंड असताना, म्हणजेच सूर्यास्तानंतर मनुष्य झोपेकडे जैविकदृष्ट्या प्रवृत्त असतो. बाहेरील उच्च तापमानामुळे शरीराला थंडावा मिळणे आणि चांगली झोप घेणे कठीण होते. अनेकांसाठी एअर कंडिशनिंग हा एक उपाय आहे. वैद्यकीय तज्ज्ञ रात्रीच्या वेळी तेलकट आणि जड जेवणाचा अतिरेक न करण्याचा सल्ला देतात, हायड्रेटेड राहा ज्यामुळे शरीर थंड राहण्यास मदत होईल आणि सैल कपडे घालावे त्याबरोबरच सुती पांघरूण असावे, असा सल्ला तज्ज्ञ देतात.

गंभीर आजारही होण्याची शक्यता

झोप कमी झाल्यास त्याचा परिणाम थेट कामावर होत असतो. गोंधळून जाणे, चिडचिड होणे, कामवासना कमी होणे या काही समस्या झोपेच्या कमतरतेमुळे उद्भवतात. परंतु यामुळे हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोग, उच्च रक्तदाब, पक्षाघात किंवा हृदयविकाराचा झटका यासारख्या गंभीर गुंतागुंतीदेखील होऊ शकतात, असे वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी सांगितले आहे.

Follow Us
आशा भोसले यांना अशोक सराफ यांनी वाहिली आदरांजली, म्हणाले त्यांचा आवाज
आशा भोसले यांना अशोक सराफ यांनी वाहिली आदरांजली, म्हणाले त्यांचा आवाज.
सुरांचा अमर आवाज हरपला... आशा भोसलेंच्या निधनावर देवेंद्र फडणवीसांचं भ
सुरांचा अमर आवाज हरपला... आशा भोसलेंच्या निधनावर देवेंद्र फडणवीसांचं भ.
संगीत क्षेत्रातला जादूई स्वर हरपला! ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचं निध
संगीत क्षेत्रातला जादूई स्वर हरपला! ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचं निध.
संजय राऊतांनी केले पाकिस्तानचे कौतुक, नेमकं काय म्हणाले? पाहा
संजय राऊतांनी केले पाकिस्तानचे कौतुक, नेमकं काय म्हणाले? पाहा.
मुंबईसह उपनगरात CNG च्या किमती वधारल्या, किती रुपयांवर पोहोचले दर?
मुंबईसह उपनगरात CNG च्या किमती वधारल्या, किती रुपयांवर पोहोचले दर?.
नाशिकमध्ये महिलांशी गैरवर्तन करणाऱ्या संशयितांचे मोबाईल जप्त, सापडलेल्
नाशिकमध्ये महिलांशी गैरवर्तन करणाऱ्या संशयितांचे मोबाईल जप्त, सापडलेल्.
'विभागत महिला नको म्हणून डावललं' मनिषा म्हैसरांचा महायुतीतील मंत्र्याव
'विभागत महिला नको म्हणून डावललं' मनिषा म्हैसरांचा महायुतीतील मंत्र्याव.
इराण- अमेरिकेचं आणखी बिनसलं? इस्लामाबादमधील भेटीत नेमकं काय -काय घडलं?
इराण- अमेरिकेचं आणखी बिनसलं? इस्लामाबादमधील भेटीत नेमकं काय -काय घडलं?.
भारताकडून इराणला मदतीचा हात, वैद्यकीय साहित्याची दुसरी खेप रवाना
भारताकडून इराणला मदतीचा हात, वैद्यकीय साहित्याची दुसरी खेप रवाना.
वारकरी संप्रदायाने बहुजन समाजाला धार्मिक अधिकार दिला - हर्षवर्धन सपकाळ
वारकरी संप्रदायाने बहुजन समाजाला धार्मिक अधिकार दिला - हर्षवर्धन सपकाळ.