AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pune Heat : उकाड्यानं उडवली पुणेकरांची झोप! काय सांगतायत वैद्यकीय क्षेत्रातले तज्ज्ञ? वाचा…

झोपेसाठी कार्यक्षम थर्मोरेग्युलेशन महत्त्वाचे आहे, जसे वातावरणीय तापमान असते, त्यामुळे तापमान थंड असताना, म्हणजेच सूर्यास्तानंतर मनुष्य झोपेकडे जैविकदृष्ट्या प्रवृत्त असतो. बाहेरील उच्च तापमानामुळे शरीराला थंडावा मिळणे आणि चांगली झोप घेणे कठीण होते.

Pune Heat : उकाड्यानं उडवली पुणेकरांची झोप! काय सांगतायत वैद्यकीय क्षेत्रातले तज्ज्ञ? वाचा...
प्रातिनिधिक छायाचित्रImage Credit source: tv9
| Updated on: May 11, 2022 | 7:30 AM
Share

पुणे : सध्या पुण्यात ढगाळ (Cloudy) वातावरण असले तरी मागच्या काही दिवसांपासूनच्या उकाड्याने पुणेकर हैराण झाले आहेत. उष्णतेच्या (Heat) या लाटेने अनेकांच्या झोपेचे वेळापत्रक बिघडवले आहे. त्यामुळे अनेकांना झोप लागणे कठीण झाले आहे. मला सुस्त पण अस्वस्थ वाटते. दिवसभरात थोडीशी गैरसोय झाली तरी मला चिडचिड होते. हे सर्व उष्णतेमुळे होत असून मला रात्री नीट झोप येत नाही, अशा तक्रारी पुणेकर करत आहेत. अनेक भागात कमाल तापमान 40 अंश सेल्सिअसच्या वर गेल्याने आणि सूर्यास्तानंतरही उकाडा फारसा कमी होत नसल्याने अनेक नागरिकांची रात्रीची शांत झोप (Sleep) उडाली आहे. किती तास झोप होते, यापेक्षा किती शांत झोप लागते, हे महत्त्वाचे असल्याचे वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ सांगतात. त्यामुळे एकूणच काय वातावरणात गारवा येईपर्यंत पुणेकरांची झोप हा उन्हाळा उडवत राहणार असे दिसत आहे.

उष्णतेचा परिणाम

काही लोकांना तीव्र उष्णतेमुळे काही आठवडे नीट झोप लागली नाही. रात्रभर डोळे मिटून अंथरुणावर पडणे, एका कुशीवरून दुसऱ्या कुशीवर लोळणे असे प्रकार होत असतात. यामुळे झोप कमी होऊ शकते. अनेकांनी झोपेच्या पद्धतींमध्ये व्यत्यय आल्याची तक्रार केली आहे, अनेक वेळा त्यांना मध्येच जाग आली आहे. प्रौढ लोक त्यांच्या झोपेच्या कालावधीपैकी फक्त 20-25% रॅपिड आय मूव्हमेंट (REM) सायकलमध्ये घालवतात, परंतु शांत अवस्थेत जाणे विशेषतः उष्णतेमुळे कठीण झाले आहे, असे तज्ज्ञांचे मत आहे.

जड खाणे टाळा

झोपेसाठी कार्यक्षम थर्मोरेग्युलेशन महत्त्वाचे आहे, जसे वातावरणीय तापमान असते, त्यामुळे तापमान थंड असताना, म्हणजेच सूर्यास्तानंतर मनुष्य झोपेकडे जैविकदृष्ट्या प्रवृत्त असतो. बाहेरील उच्च तापमानामुळे शरीराला थंडावा मिळणे आणि चांगली झोप घेणे कठीण होते. अनेकांसाठी एअर कंडिशनिंग हा एक उपाय आहे. वैद्यकीय तज्ज्ञ रात्रीच्या वेळी तेलकट आणि जड जेवणाचा अतिरेक न करण्याचा सल्ला देतात, हायड्रेटेड राहा ज्यामुळे शरीर थंड राहण्यास मदत होईल आणि सैल कपडे घालावे त्याबरोबरच सुती पांघरूण असावे, असा सल्ला तज्ज्ञ देतात.

गंभीर आजारही होण्याची शक्यता

झोप कमी झाल्यास त्याचा परिणाम थेट कामावर होत असतो. गोंधळून जाणे, चिडचिड होणे, कामवासना कमी होणे या काही समस्या झोपेच्या कमतरतेमुळे उद्भवतात. परंतु यामुळे हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोग, उच्च रक्तदाब, पक्षाघात किंवा हृदयविकाराचा झटका यासारख्या गंभीर गुंतागुंतीदेखील होऊ शकतात, असे वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी सांगितले आहे.

सुनेत्रा पवार यांच्या शासकीय वाहनप्रकरणी वाद; अनिकेत तटकरेंवर टीका
सुनेत्रा पवार यांच्या शासकीय वाहनप्रकरणी वाद; अनिकेत तटकरेंवर टीका.
विलीनीकरणानंतर पवार राजकारणापासून होणार होते दूर,नेमकं काय घडणार होतं?
विलीनीकरणानंतर पवार राजकारणापासून होणार होते दूर,नेमकं काय घडणार होतं?.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून वाद; महिलेला कपडे फाडत मारहाण
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून वाद; महिलेला कपडे फाडत मारहाण.
राज ठाकरे यांना आम्ही विकासासाठी सोबत घेणार, शिरसाटांचं विधान
राज ठाकरे यांना आम्ही विकासासाठी सोबत घेणार, शिरसाटांचं विधान.
राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची सुनील तटकरे यांनाही पूर्वकल्पना होती?
राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची सुनील तटकरे यांनाही पूर्वकल्पना होती?.
संजय राऊत आणि दादा भुसे यांच्यातील फौजदारी खटला संपला
संजय राऊत आणि दादा भुसे यांच्यातील फौजदारी खटला संपला.
टिपू सुलतानच्या मुद्द्यावर ठाकरे गटाची भूमिका काय? संजय राऊतांनी एका..
टिपू सुलतानच्या मुद्द्यावर ठाकरे गटाची भूमिका काय? संजय राऊतांनी एका...
रोहित पवारांचे VSR कंपनीवर गंभीर आरोप; SR कंपनीला एका बड्या नेत्याचा..
रोहित पवारांचे VSR कंपनीवर गंभीर आरोप; SR कंपनीला एका बड्या नेत्याचा...
बदलापूरमध्ये अंडाशय तस्करीचा धक्कादायक प्रकार उघड; तीन महिलांना अटक
बदलापूरमध्ये अंडाशय तस्करीचा धक्कादायक प्रकार उघड; तीन महिलांना अटक.
चंद्रपूरचा बदला भिवंडीत, काँग्रेसच्या पाठिंब्याने नारायण चौधरी महापौर
चंद्रपूरचा बदला भिवंडीत, काँग्रेसच्या पाठिंब्याने नारायण चौधरी महापौर.