AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pune Heat : उकाड्यानं उडवली पुणेकरांची झोप! काय सांगतायत वैद्यकीय क्षेत्रातले तज्ज्ञ? वाचा…

झोपेसाठी कार्यक्षम थर्मोरेग्युलेशन महत्त्वाचे आहे, जसे वातावरणीय तापमान असते, त्यामुळे तापमान थंड असताना, म्हणजेच सूर्यास्तानंतर मनुष्य झोपेकडे जैविकदृष्ट्या प्रवृत्त असतो. बाहेरील उच्च तापमानामुळे शरीराला थंडावा मिळणे आणि चांगली झोप घेणे कठीण होते.

Pune Heat : उकाड्यानं उडवली पुणेकरांची झोप! काय सांगतायत वैद्यकीय क्षेत्रातले तज्ज्ञ? वाचा...
प्रातिनिधिक छायाचित्रImage Credit source: tv9
Pradeep Garad
Pradeep Garad | Updated on: May 11, 2022 | 7:30 AM
Share

पुणे : सध्या पुण्यात ढगाळ (Cloudy) वातावरण असले तरी मागच्या काही दिवसांपासूनच्या उकाड्याने पुणेकर हैराण झाले आहेत. उष्णतेच्या (Heat) या लाटेने अनेकांच्या झोपेचे वेळापत्रक बिघडवले आहे. त्यामुळे अनेकांना झोप लागणे कठीण झाले आहे. मला सुस्त पण अस्वस्थ वाटते. दिवसभरात थोडीशी गैरसोय झाली तरी मला चिडचिड होते. हे सर्व उष्णतेमुळे होत असून मला रात्री नीट झोप येत नाही, अशा तक्रारी पुणेकर करत आहेत. अनेक भागात कमाल तापमान 40 अंश सेल्सिअसच्या वर गेल्याने आणि सूर्यास्तानंतरही उकाडा फारसा कमी होत नसल्याने अनेक नागरिकांची रात्रीची शांत झोप (Sleep) उडाली आहे. किती तास झोप होते, यापेक्षा किती शांत झोप लागते, हे महत्त्वाचे असल्याचे वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ सांगतात. त्यामुळे एकूणच काय वातावरणात गारवा येईपर्यंत पुणेकरांची झोप हा उन्हाळा उडवत राहणार असे दिसत आहे.

उष्णतेचा परिणाम

काही लोकांना तीव्र उष्णतेमुळे काही आठवडे नीट झोप लागली नाही. रात्रभर डोळे मिटून अंथरुणावर पडणे, एका कुशीवरून दुसऱ्या कुशीवर लोळणे असे प्रकार होत असतात. यामुळे झोप कमी होऊ शकते. अनेकांनी झोपेच्या पद्धतींमध्ये व्यत्यय आल्याची तक्रार केली आहे, अनेक वेळा त्यांना मध्येच जाग आली आहे. प्रौढ लोक त्यांच्या झोपेच्या कालावधीपैकी फक्त 20-25% रॅपिड आय मूव्हमेंट (REM) सायकलमध्ये घालवतात, परंतु शांत अवस्थेत जाणे विशेषतः उष्णतेमुळे कठीण झाले आहे, असे तज्ज्ञांचे मत आहे.

जड खाणे टाळा

झोपेसाठी कार्यक्षम थर्मोरेग्युलेशन महत्त्वाचे आहे, जसे वातावरणीय तापमान असते, त्यामुळे तापमान थंड असताना, म्हणजेच सूर्यास्तानंतर मनुष्य झोपेकडे जैविकदृष्ट्या प्रवृत्त असतो. बाहेरील उच्च तापमानामुळे शरीराला थंडावा मिळणे आणि चांगली झोप घेणे कठीण होते. अनेकांसाठी एअर कंडिशनिंग हा एक उपाय आहे. वैद्यकीय तज्ज्ञ रात्रीच्या वेळी तेलकट आणि जड जेवणाचा अतिरेक न करण्याचा सल्ला देतात, हायड्रेटेड राहा ज्यामुळे शरीर थंड राहण्यास मदत होईल आणि सैल कपडे घालावे त्याबरोबरच सुती पांघरूण असावे, असा सल्ला तज्ज्ञ देतात.

गंभीर आजारही होण्याची शक्यता

झोप कमी झाल्यास त्याचा परिणाम थेट कामावर होत असतो. गोंधळून जाणे, चिडचिड होणे, कामवासना कमी होणे या काही समस्या झोपेच्या कमतरतेमुळे उद्भवतात. परंतु यामुळे हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोग, उच्च रक्तदाब, पक्षाघात किंवा हृदयविकाराचा झटका यासारख्या गंभीर गुंतागुंतीदेखील होऊ शकतात, असे वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी सांगितले आहे.

Follow Us
गेल्या वर्षी परवानगी होती आणि आता कशी काय नाकारली?-जरांगे
Manoj Jarange Patil | गेल्या वर्षी परवानगी होती आणि आता कशी काय नाकारली?
मुंबईच्या राजाचा मुखदर्शन सोहळा; गणेश गल्लीच्या राजाचा पहिला लूक
Mumbaicha Raja 2026 | मुंबईच्या राजाचा मुखदर्शन सोहळा; गणेश गल्लीच्या राजाचा पहिला लूक
सणासुदीत आंदोलन नको! मनोज जरांगे पाटलांना प्रवीण दरेकरांचा सल्ला;
सणासुदीत आंदोलन नको! मनोज जरांगे पाटलांना प्रवीण दरेकरांचा सल्ला; म्हणाले, 'वातावरण खराब होऊ नये...
महाएल्गार आंदोलनावरून सेना-राष्ट्रवादीत पुन्हा रणसंग्राम!
Mahendra Thorave | महाएल्गार आंदोलनावरून सेना-राष्ट्रवादीत पुन्हा रणसंग्राम! महेंद्र थोरावेंचा राष्ट्रवादीवर जोरदार हल्लाबोल
हिरव्यागार भातशेतीतून लाडक्या बाप्पाचं कोकणात आगमन, मनोरम दृश्य
Ratnagiri Ganeshotsav | हिरव्यागार भातशेतीतून लाडक्या बाप्पाचं कोकणात आगमन, मनोरम दृश्य
राजापूरमध्ये प्रवाशांनी भरलेला टेम्पो ट्रॅव्हलर भिंतीवर आदळला
Rajapur | राजापूरमध्ये प्रवाशांनी भरलेला टेम्पो ट्रॅव्हलर भिंतीवर आदळला; अपघातात 8 ते 10 जण गंभीर जखमी, नेमकं घडलं काय?
साताऱ्यातून लष्कर-ए-तोयबा कनेक्शनचा संशय; मुंबई व्यावसायिकाला धमकी...
साताऱ्यातून लष्कर-ए-तोयबा कनेक्शनचा संशय; मुंबई व्यावसायिकाला धमकी प्रकरणात एकाला अटक
भोपाळहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचं आपत्कालीन लँडिंग, नेमकं काय घडलं?
Bhopal | भोपाळहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचं आपत्कालीन लँडिंग, नेमकं काय घडलं?
मराठ्यांच्या मतांशिवाय निवडणूक जिंकून दाखवा! जरांगेंचं भाजपला आव्हान
Manoj Jarange Patil | मराठ्यांच्या मतांशिवाय निवडणूक जिंकून दाखवा! मनोज जरांगेंचं भाजपला थेट आव्हान; बावनकुळेंवरही केले गंभीर आरोप
अमित शाह यांची एशियाटिक सोसायटीला भेट, सांस्कृतिक वारसा जतन करण्याचे..
अमित शाह यांची एशियाटिक सोसायटीला भेट, सांस्कृतिक वारसा जतन करण्याचे आश्वासन