AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

OBC Reservation| …तर ओबीसी आरक्षणशिवाय निवडणुका घ्याव्या लागतील निवडणुका लांबवणं कुठल्याही राजकीय पक्षाच्या हातात नसतं – उल्हास बापट

सरकारने घाई घाईत अहवाल केल्यामुळे कोर्टाने तो नाकारला आहे. आता ओबीसी आरक्षणाविना आता निवडणुका घ्याव्या लागणार आहे. खुल्या वर्गातून आता निवडणुका घ्याव्या लागणार आहे. इंपेरिकल डेटा गोळा केल्याशिवाय आरक्षण टिकवता येणार नाही त्याची जबाबदारी राज्य सरकारची आहे

OBC Reservation| ...तर ओबीसी आरक्षणशिवाय निवडणुका घ्याव्या लागतील निवडणुका लांबवणं कुठल्याही राजकीय पक्षाच्या हातात नसतं - उल्हास बापट
उल्हास बापट, घटनातज्ज्ञ
| Edited By: प्राजक्ता ढेकळे | Updated on: Mar 03, 2022 | 3:45 PM
Share

पुणे – ” इंपेरिकल डेटा गोळा केल्याशिवाय आरक्षण टिकवता येणार नाही. घाईगर्दीचा अहवाल सर्वोच्च न्यायालय (Supreme Court) कधीचं मान्य करणार नाही. इम्पेरिकल डाटा गोळा करणं हा एकमेव पर्याय आहे. राज्य घटनेशी सुसंगत कायदे असायला लागतात. कार्य काळ संपला असेल तर ओबीसी आरक्षणशिवाय (OBC Reservation) निवडणुका घ्याव्या लागतील निवडणुका(Election) लांबवणं कुठल्याही राजकीय पक्षाच्या हातात नसतं. राज्य घटनेशी सुसंगत कायदे नसतील तर ते घटनाबाह्य ठरतात. कोलेट आणि कंटेमनेईस असा हा डाटा हवा. निवडणुका ओबीसी आऱक्षणाशिवाय होतील. आरक्षणाशिवाय निवडणुका घ्यावा लागतील.” असे मत घटनातज्ञ उल्हास बापट यांनी व्यक्त केलं आहे.

जबाबदारी राज्य सरकारची

सरकारने घाई घाईत अहवाल केल्यामुळे कोर्टाने तो नाकारला आहे. आता ओबीसी आरक्षणाविना आता निवडणुका घ्याव्या लागणार आहे. खुल्या वर्गातून आता निवडणुका घ्याव्या लागणार आहे. इंपेरिकल डेटा गोळा केल्याशिवाय आरक्षण टिकवता येणार नाही त्याची जबाबदारी राज्य सरकारची आहे.असेही ते म्हणाले आहेत.

न्यायालयाचा निर्णय

ओबीसींच्याराजकीय आरक्षणावर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने आज महाराष्ट्रातील (Maharashtra) ठाकरे सरकारला जोरदार धक्का दिला आहे. याबाबत मागासवर्ग आयोगाने सादर केलेला अंतरिम अहवाल सर्वोच्च न्यायालयाने नाकारला आहे. या अहवालामध्ये राजकीय प्रतिनिधित्वाची योग्य आकडेवारी नसल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालय जोपर्यंत पुढचा निर्देश देत नाही, तोपर्यंत ओबीसी आरक्षणासह या निवडणुका होणार नाहीत. शिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या ओबीसी आरक्षणाशिवाय घ्याव्यात, अशा सूचना दिल्या आहेत. यापूर्वी डिसेंबर महिन्यात न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमधील 27 टक्के राजकीय आरक्षणाची महाराष्ट्र सरकारने काढलेली अधिसूचना रद्द केली होती. तसेच कसलिही आकडेवारी गोळा न करता राज्यात राजकीय आरक्षण लागू केल्याचे ताशेरे ओढले होते.

Anil Gote | ‘Iqbal Mirchiकडून Devendra Fadanvis यांनी 10 कोटी घेतले’

महाविकास आघाडी सरकारची ओबीसींसोबत बेइमानी, OBC मंत्र्यांनी राजीनामा द्यावा, चंद्रशेखर बावनुकळेंचा हल्लाबोल

धक्कादायक | आमदारांच्याच गावातील सरपंचावर खुनी हल्ला; कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगडमधील खळबळजनक घटना

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली