AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अजितदादांनी २० वर्षांत एका रुपयाचाही निधी दिला नाही, कोणी केला हा गंभीर आरोप

Ajit Pawar and Girish Mahajn : अजित पवार विरोधी आमदारांना निधी देत नाही, हा आरोप नेहमी होत असतो. आता पुन्हा यासंदर्भात चर्चा सुरु झाली आहे. गेल्या २० वर्षांत माझ्या मतदार संघात एका रुपयाचाही निधी दिला नसल्याचा आरोप आमदाराने केलाय.

अजितदादांनी २० वर्षांत एका रुपयाचाही निधी दिला नाही, कोणी केला हा गंभीर आरोप
ajit pawarImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Aug 06, 2023 | 2:37 PM
Share

विनय जगताप, पुणे | 6 ऑगस्ट 2023 : राज्यातील राजकारणात गेल्या दीडवर्षांपासून अनेक घडामोडी घडल्या. महाविकास आघाडीतून बाहेर पडताना एकनाथ शिंदे गटातील मंत्र्यांनी अजित पवार निधी देत नसल्याचा आरोप केला. त्यानंतर शिंदे गटातील ४० आमदारांनी भाजपसोबत येत सरकार स्थापन केले. आता अजित पवार निधी देत नसल्याचा पुन्हा आरोप झाला आहे. हा आरोप शिंदे गटातील नाही तर भाजप मंत्र्याने केला आहे. गेल्या २० वर्षांत अजितदादांनी माझ्या मतदार संघासाठी एका रुपयाचाही निधी दिला नाही, असे म्हटले आहे.

कोण केला आरोप

आज मैत्री दिवस आहे, अजितदादा आणि आमची मैत्री फार जुनी आहे.. आमची मैत्री आहे परंतु आमचा एकमेकांना राजकीय विरोध राहिला आहे. अजित पवार यांनी माझ्या मतदार संघासाठी गेल्या वीस वर्षात एक रुपयाचाही निधी दिला नाही. त्यांनी मला आव्हान दिले होते की मी निधी देणार नाही, अन् त्यांनी ते पाळले, असा आरोप भाजप नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांनी केला. यामुळे अजित पवार विरोधी आमदारांना निधी देत नाही, हा मुद्दा पुन्हा चर्चेला आला आहे.

अजित पवार यांनी गिरीश महाजन यांच्या फिटनेसचे कौतूक केले होते. त्याबद्दल बोलताना गिरीश महाजन यांनीही अजित पवार यांचे कौतूक केले. अजितदाद सकाळी लवकर उठतात, असे त्यांनी सांगितले.

नेमाडे यांचे वक्तव्य चुकीचे

लोकशाही आहे म्हणून काही बोलता येणार नाही, असे मत गिरीश महाजन यांनी व्यक्त केले. साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांनी जे काही विधान केले त्यासंदर्भात ते प्रतिक्रिया देत होते. ते म्हणाले की, आपल्याकडे चुकीचा इतिहास मांडला जात आहेत. पेशवाईबद्दल देखील नको ते बोललले जाते.

नेमाडे यांच्या म्हणण्यानुसार औरंगजेबाने सतीची प्रथा बंद केली आहे. परंतु त्यांनी हा सर्व इतिहास कोठून आणला? आपण वयाने ज्येष्ठ आहात, यामुळे काहीही बोलावे हे योग्य नाही. हे तर औरंगजेबाची उदगतीकरणच आहे. तुमच्यासारखे साहित्यिक लोकांना चुकीचा इतिहास का सांगत आहात, असा प्रश्न गिरीश महाजन यांनी विचारला.

मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं.
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा.
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू.
कुऱ्हाडीचा दांडा आपलीच लोक होत आहेत, उद्धव ठाकरे भावूक होत म्हणाले...
कुऱ्हाडीचा दांडा आपलीच लोक होत आहेत, उद्धव ठाकरे भावूक होत म्हणाले....
माझ्या डॉक्टरने पक्ष बदलला की काय ? राज यांच्या वक्तव्याने एकच हशा....
माझ्या डॉक्टरने पक्ष बदलला की काय ? राज यांच्या वक्तव्याने एकच हशा.....
'माझ्यासाठी ते पक्ष सोडणं नव्हतं, माझ्यासाठी...,'काय म्हणाले राज ठाकरे
'माझ्यासाठी ते पक्ष सोडणं नव्हतं, माझ्यासाठी...,'काय म्हणाले राज ठाकरे.
छगन भुजबळांना मोठा दिलासा; 'या' घोटाळा प्रकरणात ईडीकडून क्लीन चिट
छगन भुजबळांना मोठा दिलासा; 'या' घोटाळा प्रकरणात ईडीकडून क्लीन चिट.
राजकारणात लवचिकता नक्की असावी पण...
राजकारणात लवचिकता नक्की असावी पण....
हवा प्रदुषणावरून मुंबई हायकोर्ट आक्रमक, पालिका आयुक्तांचा पगार थांबवला
हवा प्रदुषणावरून मुंबई हायकोर्ट आक्रमक, पालिका आयुक्तांचा पगार थांबवला.
बाळासाहेबांना जर मानत असाल तर... भास्कर जाधवांच शिंदेंना आवाहन काय?
बाळासाहेबांना जर मानत असाल तर... भास्कर जाधवांच शिंदेंना आवाहन काय?.