AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rain : दोन दिवसांत पावसाचा जोर वाढणार, कोणत्या भागांत कोसळणार मुसळधार

IMD Weather forecast : ऑगस्ट महिन्यात पाऊस नव्हता. यामुळे आता पावसाची सर्व अपेक्षा सप्टेंबर महिन्यावर आहे. यावेळी हवामान विभागाने चांगली बातमी दिली आहे. राज्यात येत्या दोन, तीन दिवसांत पावसाचा जोर वाढणार आहे.

Rain : दोन दिवसांत पावसाचा जोर वाढणार, कोणत्या भागांत कोसळणार मुसळधार
| Updated on: Sep 05, 2023 | 2:24 PM
Share

पुणे | 5 सप्टेंबर 2023 : देशात मान्सूनवर यंदा अल निनोचा प्रभाव दिसून आला. यामुळे जून आणि ऑगस्ट महिन्यात पाऊस झाला नाही. केवळ जुलै महिन्यात झालेल्या पावसामुळे राज्यात खरीप हंगाम घेतला गेला. त्यानंतर ऑगस्ट महिन्यात पडलेल्या खंडामुळे खरीप हंगाम धोक्यात आला. सप्टेंबर महिन्यात चांगला पाऊस होईल, असा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त केला गेला आहे. आता पुणे हवामान विभागाचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांनी पावसासंदर्भात दिलासा देणारी बातमी दिली आहे. येत्या दोन, तीन दिवसांत राज्यात पावसाचा जोर वाढणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

काय आहे हवामान विभागाचा अंदाज

हवामान विभागाच्या मॉडेलच्या मार्गदर्शनानुसार महाराष्ट्रात येत्या दोन, तीन दिवसांत पावसाचा जोर वाढणार आहे. राज्यात सहा आणि सात सप्टेंबर रोजी मुसळधार पाऊस होईल. विदर्भातील काही भाग, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील काही भागात चांगला पाऊस होणार आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. यामुळे मान्सून वारे सक्रीय होणार आहे. कर्नाटक, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात यामुळे आता चांगला पाऊस होणार आहे.

पुणे जिल्ह्यातील चार तालुक्यात दुष्काळ

पुणे जिल्ह्यातील चार तालुके दुष्काळाच्या उंबरठ्यावर आहे. राज्यातील 27 तालुक्‍यांमध्ये 1 जून ते 1 सप्टेंबरपर्यंत 25 ते 50 टक्के कमी पाऊस झालेला आहे. पुणे जिल्ह्यातील बारामती, इंदापूर, पुरंदर आणि हवेली या चार तालुक्‍यांमध्ये कमी पाऊस झाला आहे तर बारामती, इंदापूर, दौंड, पुरंदर आदी तालुक्‍यांत अद्यापही पावसाचे प्रमाण अत्यल्प आहे. यामुळे या भागात दुष्काळसद्दश्य परिस्थिती निर्माण होणार आहे. याबाबत खासदार सुप्रिया सुळे यांचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांना पत्र लिहिले आहे.

सोलापूरमध्ये पाऊस, नाशिकमधील जलसाठा कमी

सोलापूर जिल्ह्यातील माढा शहरासह परिसरातील गावात सोमवारी रात्रीपासून जोरदार पाऊस सुरु आहे. सलग दुसऱ्या दिवशीही पाऊस झाल्याने शेतकरी समाधानी आहे. सोलापूर जिल्ह्यात अनेक महिन्यांपासून पावसाची प्रतिक्षा होती. नाशिक जिल्ह्यातील २४ धरणांमध्ये गेल्यावर्षी पेक्षा यंदा २५ टक्के कमी पाणीसाठा झाला आहे. नाशिक जिल्ह्यातील धरणांमध्ये यंदाच्या वर्षी केवळ ५९ टक्के जलसाठा आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात ८३ टक्के भरले आहे.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.