AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उद्धव ठाकरे नव्हे, या नेत्याने… तुरुंगातून सुटताच राऊतांना पहिला फोन कुणाचा? संजय राऊत यांचा मोठा खुलासा काय?

संजय राऊत यांनी तुरुंगातील अनुभवावर मनमोकळ्या गप्पा मारल्या. पत्रा चाळ प्रकरणात तुरुंगातून सुटल्यावर त्यांना पहिला फोन राहुल गांधी यांचा आला होता, उद्धव ठाकरेंचा नव्हे, हा त्यांनी केलेला महत्त्वाचा खुलासा आहे. राहुल गांधींनी त्यांच्या भारत जोडो यात्रेदरम्यान राऊतांना धीर दिला.

उद्धव ठाकरे नव्हे, या नेत्याने... तुरुंगातून सुटताच राऊतांना पहिला फोन कुणाचा? संजय राऊत यांचा मोठा खुलासा काय?
sanjay rautImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 05, 2026 | 1:08 PM
Share

ठाकरे गटाचे संजय राऊत हे काही काळ तुरुंगात होते. पत्रावाला चाळ प्रकरणात त्यांच्यावर कारवाई झाली होती. तुरुंगातील दाहक अनुभवावर त्यांनी पुस्तकही लिहिलं आहे. काल एका मुलाखतीत त्यांनी या आठवणींना पुन्हा उजाळा दिला. यावेळी त्यांनी तुरुंगातून अनेक नेत्यांना पत्र लिहिल्याचं सांगितलं. पण या नेत्यांना पत्र मिळालीच नसल्याचा दावाही त्यांनी केला. तसेच, तुरुंगातून सुटल्यावर त्यांना पहिला फोन उद्धव ठाकरे यांचा नव्हे तर, काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा आला होता. संजय राऊत यांनीच त्याबाबतची माहिती दिली आहे.

दिनमान साहित्य उत्सवात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची मुलाखत घेण्यात आली. ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे आणि अमेय तिरोडकर यांनी राऊत यांना तुरुंगातील दिवसांबद्दल बोलतं केलं. राऊत यांनीही मनमोकळ्या गप्पा मारत, त्यावेळचे सर्व प्रसंग सांगितले. मी तुरुंगातून सुटल्यावर पहिला फोन मला राहुल गांधींचा आला होता. अनेकांचे फोन आले होते. पण प्रमुख नेत्यांपैकी पहिला फोन राहुल गांधींचा होता. राहुल गांधी यांची त्यावेळी भारत जोडो यात्रा सुरू होती. नांदेडला ही यात्रा आली होती. तेव्हा त्यांनी मला फोन केला. तुम्ही जे भोगलं त्यातून अनेकांना प्रेरणा मिळाली आहे. तुम्ही झुकला नाही हे बरं झालं. आता लोकांना धीर येईल. लोक त्यातून प्रेरणा घेतील. कुणालाही घाबरणार नाही, असा धीर राहुल गांधींनी दिला, असं राऊत म्हणाले.

राहुल गांधीच निर्विवाद नेते

राहुल गांधींची भाजपने जी बदनामी केली होती, त्यावरूनही त्यांनी हल्ला चढवला. राहुल गांधी राजकारणात आले, तेव्हा मोदी आणि त्यांच्या लोकांनी राहुल गांधींची बदनामी सुरू केली. त्यावेळी पहिल्यांदा मी म्हटलं, राहुल गांधी देशाचे नेते आहेत. ते देशाचं नेतृत्व करतील, असं मी म्हणालो होतो. राहुल गांधींना पप्पू बनवण्यासाठी या लोकांनी हजारो कोटी रुपये खर्च केले. 12 वर्षात 17 हजार कोटी रुपये खर्च केले होते. पण जेनजीने मोदींना एका क्षणात छोटा बंदर केलं. बिना पैशात. जंतरमंतरवरील दोन मुलींनी बिना पैशात डफली घेऊन बंदर बनवलं, असं सांगतानाच राहुल गांधी देशातील अनडिस्प्युटेड नेते आहेत, असंही राऊत यांनी स्पष्ट केलं.

मी बाळासाहेबांचा विश्वासू

सर्व पक्षीय संबंधावरही त्यांनी भाष्य केलं. मी शिवसेनेचा नेता, खासदार आहे. मी संपादक आहे. मी बाळासाहेबांचा विश्वासू माणूस आहे. माझी बाळासाहेबांवर जेवढी श्रद्धा आहे, तेवढी देवावर नाही. जेव्हा आपण राष्ट्रीय राजकारण करतो तेव्हा राष्ट्रीय राजकारण हे एक पक्षीय असतं नाही. माझ्या पक्षाचा विचार घेऊन इतर पक्षांसोबत संवाद ठेवला पाहिजे. फक्त मी राजकारणात राहिल असं होता कामा नये. हे मोदी आणि शाहांनी सुरू केलं हे घातक आहे. लोकशाहीत सर्वांनी राजकारण करण्याचा त्यांना अधिकार आहे. जे माझ्या विचाराचे नाहीत त्यांना दिमागी नक्षली म्हणता येणार नाही. नक्षलवादालाही एक विचार आहे. लोक हातात बंदूक का घेतात? तुम्हाला गांधीवर गोळी मारणारा चालतो. तुम्हाला बिल्किस बानूच्या खुन्यांना प्रतिष्ठा दिलेली चालते. हे दिमागी नक्षली नाही का? आम्ही जेव्हा बोलतो तेव्हा ते दिमागी नक्षली? तरुण मुलं रस्त्यावर येतात ते दिमागी नक्षली. सर्व समावेशक राजकारण केलं तरच देश पुढे जाईल. नाही तर देशाची शकलं होतील, असा इशाराही त्यांनी दिला.

Follow Us
उद्धव ठाकरेंच्या खांद्यावर चढून... ठाण्यातील दहीहंडी कार्यक्रमात...
उद्धव ठाकरेंच्या खांद्यावर चढून... ठाण्यातील दहीहंडी कार्यक्रमात शिंदे गटातील नेत्याचा राऊतांना खोचक टोला
ठाण्यात दहीहंडीच्या 21व्या वर्षी मोठा संकल्प; शाळेतूनच प्रो-गोविंदा...
Dahi Handi in Thane | ठाण्यात दहीहंडीच्या 21व्या वर्षी मोठा संकल्प; गोविंदांना शाळेतूनच प्रो-गोविंदा प्रशिक्षण, लक्ष्य थेट...
रविंद्र फाटकांच्या दहीहंडी कार्यक्रमात हास्यजत्रेतील कलाकारांची हजेरी
रविंद्र फाटकांच्या दहीहंडी कार्यक्रमात हास्यजत्रेतील कलाकारांची हजेरी; प्रत्येक कलाकाराचे...
कृषी सेवा परीक्षेच्या निकालावर विद्यार्थ्यांनी उपस्थित केले गंभीर प्रश
Krushi Exam | एका पेपरला एक परीक्षक, तर काहींना तीन? कृषी सेवा परीक्षेच्या निकालावर विद्यार्थ्यांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न
देवेंद्र फडणवीस मुंबई, ठाण्यात 14 दहीहंडी मंडळांना देणार भेट...
देवेंद्र फडणवीस मुंबई, ठाण्यात 14 दहीहंडी मंडळांना देणार भेट; राज्यभरात गोविंदांचा उत्साह
शुभम मोटघरे यांच्या घरावर गोळीबार प्रकरणात मोठी कारवाई! 7 आरोपी अटकेत
शुभम मोटघरे यांच्या घरावर गोळीबार प्रकरणात मोठी कारवाई! 7 आरोपी अटकेत; मुख्य सूत्रधारावर तब्बल...
तायवाडेंचा भुजबळांना पूर्ण पाठिंबा; सरसकट कुणबी प्रमाणपत्राला विरोध
Babanrao Taywade | ओबीसींच्या हक्कांवर गदा आली तर रस्त्यावर उतरू! बबनराव तायवाडेंचा भुजबळांना पूर्ण पाठिंबा; सरसकट कुणबी प्रमाणपत्राला विरोध
सरकारचं हे दुटप्पी धोरण! ध्वनी प्रदूषणाच्या मुद्द्यावर राऊतांचा संताप
Sanjay Raut | सरकारचं हे दुटप्पी धोरण! ध्वनी प्रदूषणाच्या मुद्द्यावर संजय राऊतांचा संताप; बापटांच्या भूमिकेला पाठिंबा
दहीहंडीच्या 11 थरांसोबत सामाजिक संदेशाचीही उंची! जय जवान गोविंदा...
Dahi Handi in Mumbai | दहीहंडीच्या 11 थरांसोबत सामाजिक संदेशाचीही उंची! जय जवान गोविंदा पथकाने उत्सवातून समाजाला दिला मोठा संदेश
मुंबई-ठाण्यात दहीहंडीचा जल्लोष! गोविंदा पथकांचा उत्साह शिगेला
Dahi Handi 2026 | मुंबई-ठाण्यात दहीहंडीचा जल्लोष! गोविंदा पथकांचा उत्साह शिगेला; महिला गोविंदांचाही दमदार सहभाग