AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जेजुरी देवस्थानच्या वादावर प्रथमच विश्वस्तांचे स्पष्टीकरण, आरोपांवर दिले उत्तर

Jejuri Temple Trust dispute : जेजुरीच्या खंडोबा देवस्थानच्या वाद रंगला आहे. विश्वस्त मंडळ निवडीवरून ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. त्यानंतर या प्रकरणी विश्वस्थांनी माध्यमांसमोर भूमिका मांडली आहे. आता वादावर पडदा पडणार का? हे पाहावे लागणार आहे.

जेजुरी देवस्थानच्या वादावर प्रथमच विश्वस्तांचे स्पष्टीकरण, आरोपांवर दिले उत्तर
Image Credit source: tv9
| Updated on: Jun 07, 2023 | 2:38 PM
Share

अभिजित पोते, पुणे : महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरी येथील खंडोबा देवस्थानचा वाद गेल्या काही दिवसांपासून रंगला आहे. विश्वस्त पदाच्या निवडीचा हा वाद चांगलाच पेटला आहे. ग्रामस्थांनी देवस्थान विश्वस्त निवडीला विरोध केला आहे. त्याविरोधात बेमुदत धरणे आंदोलन सुरू आहे. तसेच आता जेजुरी गाव बंद करण्याचा निर्णय आंदोलकांनी घेतला आहे. यानंतर मंगळवारी विश्वस्तांनी माध्यमांसमोर आपली भूमिका मांडली आहे. विश्वस्तांनी केलेल्या खुलाश्यानंतर हा वाद मिटणार का? हा प्रश्न कायम आहे.

काय म्हटले विश्वस्थांनी

ग्रामस्थांशी सुरु असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात आज जेजुरी देवस्थानच्या नवनिर्वाचित विश्वस्तांनी पत्रकार परिषद घेतली. नवनिर्वाचित विश्वस्तांवर होणारे आरोप, त्यासोबतच विश्वस्तांच्या निवडी विरोधात सुरू असणारे जेजुरी ग्रामस्थांचं आंदोलन या सर्व विषयावर नव्या विश्वस्तांनी पत्रकार परिषद घेत स्पष्टीकरण दिल आहे.

आमच्या सर्व नियुक्त्या घटनेनुसार

आमच्या सगळ्या नियुक्त्या घटनेनुसारच झाल्या आहेत. या नियुक्त्यांमध्ये काहीही गैर नाही. जेजुरी देवस्थानच्या घटनेनुसारच आमच्या नियुक्त्या झाल्या असल्याचं स्पष्टीकरण यावेळी विश्वस्तांनी दिले आहे. त्यासोबतच नवनियुक्त विश्वस्त हे कुठल्याही राजकीय पक्षाशी संबंधित नाही. तसेच धर्मदाय आयुक्तांकडे आम्ही कुठलीही शिफारस केली नाही, आंदोलन करणाऱ्यांपैकी काही व्यक्ती खोटी अफवा पसरवत आहे, आरोप देखील या विश्वस्तांनी केला आहे.

तेरा दिवसांपासून आंदोलन

गेल्या तेरा दिवसापासून जेजुरी गावामध्ये ग्रामस्थांनी नव्या विश्वस्त निवडी विरोधात आंदोलन सुरू केले आहे. ही निवड बेकायदेशीर आहे. बाहेरचे लोक विश्वस्त पदावर घेतले आहेत, असा आरोप करत सर्व ग्रामस्थ आंदोलनाला बसले आहेत. सात जणांच्या विश्वस्त मंडळात जेजुरीबाहेरील तब्बल पाच जणांची नियुक्ती करण्यात आली आहे. यासाठी सहधर्मदाय आयुक्तांनी कोणते निकष लावले, असा प्रश्न उपस्थित करत ग्रामस्थांनी या निवडीला विरोध केला आहे.

नवे विश्वस्त कोण?

  1. अभिजीत अरविंद देवकाते (बारामती)
  2. राजेंद्र बबन खेडेकर (कोथरूड)
  3. मंगेश अशोक घोणे (जेजुरी)
  4. विश्वास गोविंद पानसे (बारामती)
  5. अनिल रावसाहेब सौदाडे
  6. पांडुरंग ज्योतिबा थोरवे (बालेवाडी)
  7. पोपट सदाशिव खोमणे (जेजुरी)

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.