AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ladki Bahin Yojana : ‘त्या’ बहिणींना जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबरचे पैसे मिळणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सर्वात मोठी घोषणा; रक्षाबंधनाआधीच मोठी भेट

CM Eknath Shinde : या लाडक्या बहि‍णींना आता एकदाच तीन महिन्यांचा माहेरचा आहेर भेटणार आहे. या महिलांना जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबरचे पैसे मिळणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुण्यात याविषयीची मोठी घोषणा केली आहे. रक्षा बंधनाआधीच मुख्यमंत्र्‍यांनी या बहि‍णींच्या चेहऱ्यावर हसू फुलवले आहे.

Ladki Bahin Yojana : 'त्या' बहिणींना जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबरचे पैसे मिळणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सर्वात मोठी घोषणा; रक्षाबंधनाआधीच मोठी भेट
लाडक्या बहिणीसाठी मोठी घोषणा
| Updated on: Aug 17, 2024 | 4:16 PM
Share

लाडकी बहीण योजनेने राज्यातील महिलांच्या खात्यात 1500 रुपये जमा होण्यास सुरुवात झाली आहे. रक्षा बंधनापूर्वी अनेक महिलांच्या खात्यात रक्कम जमा होईल. पण ज्यांनी ऑगस्ट महिन्यात अर्ज भरला त्यांचे काय? त्यांच्या अर्जांना अजून मंजूरीचा संदेश प्राप्त झालेला नाही. त्या बहिणी चिंतीत आहेत. त्यांच्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी घोषणा केली आहे. या लाडक्या बहि‍णींना आता एकदाच तीन महिन्यांचा माहेरचा आहेर भेटणार आहे. या महिलांना जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबरचे पैसे मिळणार आहेत. रक्षाबंधना पूर्वीच मुख्यमंत्र्यांनी या बहि‍णींच्या चेहऱ्यावर हसू फुलवले आहे.

पुण्यातून दिली महत्वाची माहिती

महायुती सरकारने आज पुण्यातील बालेवाडीत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम घेतला. त्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला. या योजनेवरून त्यांनी विरोधकांवर टीका केली. मी बहिणींशी संवाद साधून स्वातंत्र्य दिन साजरा केला. अनेक बहिणींनी भावना व्यक्त केल्या. आम्हाला आधार मिळाला म्हणाल्या. त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद व्यक्त केला, असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

भाऊ म्हणून आम्ही समर्थ

सरकार स्थापन झाल्यापासून आरोप प्रत्यारोप सुरू आहे. हे सरकार पडणार असं वारंवार सांगत आहेत. पण बहीण आणि ज्येष्ठांच्या आशीर्वादाने सरकार टिकलं नाही, अधिक मजबूत झालं. बहिणीच्या हिताच्या आड कोणी आला तर गाठ माझ्याशी आहे. व्यासपीठावर बसलेल्या भावांशी आहे. बाकी कशाचा नाद करा. पण या विषयात नाद करायचा नाही. आम्ही भाऊ म्हणून समर्थ आहोत.

ही देना बँक, लेना बँक नाही

या राज्यातील सामान्य बहीण भाऊ आणि वरिष्ठ ज्येष्ठांच्या आयुष्यात सुखाचे दिवस आणायचा आमचा प्रयत्न आहे. आम्ही ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण करतो. आमचं सरकार तेच करतं. सर्व सामान्यासंसाठी या योजना राबवत असतो. काही लोकं म्हणाले पैसे मिळणार नाही. आता पैसे आल्यावर म्हणतात लवकर काढून घ्या. पण तुम्हाला सांगतो हे देणारं सरकार आहे. घेणारं नाही. ही देना बँक आहे. लेना बँक नाही.

कधी मिळणार पैसे?

ज्या बहिणीच्या खात्यात पैसे गेले नसतील त्यांच्या खात्यात पैसे जाईल. ज्यांचं आधार लिंक राहिलं असेल त्यांनाही पैसे मिळेल. ३१ ऑगस्ट पर्यंत मुदत आहे. ऑगस्टमध्ये अर्ज भरल्यावर तुम्हाला जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबरचे पैसे मिळतील. तुम्हाला दर महिन्याला दीड हजाराचा माहेरचा आहेर मिळणार आहे, अशी मोठी घोषणा त्यांनी केली आहे.

हम दो हमारे दो एवढंच ज्यांना कळतं त्यांना दीड हजाराची किंमत काय कळणार. यांना गरीबी काय माहीत. मीही शेतकरी कुटुंबातून आलो आहे. माझी आई कशी कसरत करायची मला माहीत आहे. माझ्या आई वडिलांनी कसे हाल सहन केले याचा मी साक्षीदार आहे. आम्ही संघर्ष करून आलो. सोन्याचा चमचा घेऊन नाही आलो. आम्ही चटके सोसले आहेत, असे ते म्हणाले.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.