AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Loudspeaker : सत्ताधारी अन् विरोधकांनी भोंग्यावरून समाजात तेढ निर्माण करणं थांबबावं, अन्यथा…; मराठा क्रांती ठोक मोर्चाचा पुण्यात इशारा

भोंग्यांच्या वादात मराठा क्रांती ठोक मोर्चाने उडी घेतली आहे. भोंगे (Loudspeaker) प्रकरणावरून राज्यात वाद थांबला नाही, तर मराठा क्रांती ठोक मोर्चा रस्त्यावर उतरेल, असा इशारा मराठा क्रांती ठोक मोर्चातर्फे देण्यात आला आहे.

Loudspeaker : सत्ताधारी अन् विरोधकांनी भोंग्यावरून समाजात तेढ निर्माण करणं थांबबावं, अन्यथा...; मराठा क्रांती ठोक मोर्चाचा पुण्यात इशारा
मराठा क्रांती ठोक मोर्चा (संग्रहित छायाचित्र)Image Credit source: tv9
| Updated on: Apr 27, 2022 | 3:23 PM
Share

पुणे : सत्ताधारी आणि विरोधी पक्षाने दोन समाजात तेढ निर्माण करणे थांबवावे, असे मराठा क्रांती ठोक मोर्चाने (Maratha kranti thok morcha) म्हटले आहे. भोंग्यांच्या प्रकरणावरून मराठा क्रांती ठोक मोर्चाने सरकारवर टीका केली आहे. यानिमित्ताने भोंग्यांच्या वादातही उडी घेतली आहे. भोंगे (Loudspeaker) प्रकरणावरून राज्यात वाद थांबला नाही, तर मराठा क्रांती ठोक मोर्चा रस्त्यावर उतरेल, असा इशारा मराठा क्रांती ठोक मोर्चातर्फे देण्यात आला आहे. सध्या राज्यात भोंग्यांचा विषय तापला असून विविध पक्ष आक्रमक झाले आहेत. तर दुसरीकडे गुणरत्न सदावर्ते यांच्यावर अनेक ठिकाणी गुन्हे दाखल आहेत. सदावर्ते यांची सनद रद्द करण्याच्या मागणीसाठी लवकरच बार कौन्सिलच्या (Bar council) अध्यक्षांची भेट घेणार असल्याचेही मराठा क्रांती मोर्चातर्फे सांगण्यात आले आहे.

एक मेला होतेय राज ठाकरेंची सभा

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची 1 मे रोजी औरंगाबादमध्ये जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. राज ठाकरे यांच्या या सभेला काही राजकीय पक्षांनी विरोध केला आहे. त्यात मराठा क्रांती मोर्चाने उडी घेतली आहे. हा वाद म्हणजे दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रकार आहे. हे जर थांबले नाही, तर मराठा क्रांती ठोक मोर्चा आंदोलन करेल, असा इशारा देण्यात आला आहे.

सदावर्तेंविरोधात आक्रमक

गुणरत्न सदावर्ते यांना शरद पवारांच्या सिल्व्हर ओक निवासस्थानी झालेल्या हल्लाप्रकरणानंतर ताब्यात घेण्यात आले होते. त्यानंतर त्यांची रवानगी सातारा पोलिसाांच्या ताब्यात होती. मग तिथून त्यांचा ताबा कोल्हापूर पोलिसांकडे देण्यात आला होता. दरम्यान, यानंतर कोल्हापूर आणि साताऱ्यातून जामीन मिळाल्यानंतर सदावर्ते यांना आर्थर रोड जेलमध्ये आणण्यात आले होते. तिथेही पुणे पोलीस सदावर्तेंचा ताबा घेण्यासाठी आले होते. या सर्व पार्श्वभूमीवर मराठा क्रांती ठोक मोर्चा आक्रमक झाली असून अशाप्रकारचे गुन्हे दाखल असलेल्या माणसाची सनद रद्द करावी, या मागणीसाठी बार कौन्सिलकडे जाण्याचीही तयारी मराठा क्रांती ठोक मोर्चा करीत आहे.

आणखी वाचा :

Pune Sachin Kharat : तुमचंच रक्त मनुवादी आहे, ते आधी बदलून घ्या म्हणजे बाष्कळ बडबड थांबेल, सचिन खरात यांचा संभाजी भिडेंना टोला

पुणे : पावसाळ्यापूर्वी नालेसफाई होणार, पुणे पालिकेचा दावा; मात्र आतापर्यंत नाले अन् पावसाळी गटारांची झालीय अवघी 8 टक्केच स्वच्छता

Pune accident : जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर ट्रकनं दिली दुचाकीला धडक; 10 वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू

Follow Us
AQI 150 ते 190 दरम्यान, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईची मागणी!
AQI 150 ते 190 दरम्यान, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईची मागणी!.
राज्यसभेवर जाणाऱ्या पार्थ पवारांना सुप्रिया सुळे यांचा खास सल्ला
राज्यसभेवर जाणाऱ्या पार्थ पवारांना सुप्रिया सुळे यांचा खास सल्ला.
राज्यसभा निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता; सुप्रिया सुळे यांचे वक्तव्य
राज्यसभा निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता; सुप्रिया सुळे यांचे वक्तव्य.
उद्धव नाही, आदित्य नाही, ठाकरे गटाचे निर्णय फक्त राऊतच घेतात
उद्धव नाही, आदित्य नाही, ठाकरे गटाचे निर्णय फक्त राऊतच घेतात.
राष्ट्रवादी आमदारांची उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याशी चर्चा
राष्ट्रवादी आमदारांची उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याशी चर्चा.
अखेरच्या दिवशी महायुती व मविआकडून प्रमुख उमेदवारांचे अर्ज दाखल
अखेरच्या दिवशी महायुती व मविआकडून प्रमुख उमेदवारांचे अर्ज दाखल.
राज्यसभेसाठी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस; शरद पवारांचा अर्ज दाखल
राज्यसभेसाठी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस; शरद पवारांचा अर्ज दाखल.
अमेरिका–इराण संघर्षाचे पडसाद; जळगावच्या चटई उद्योगाला मोठा फटका
अमेरिका–इराण संघर्षाचे पडसाद; जळगावच्या चटई उद्योगाला मोठा फटका.
रोहित पवारांचा व्हीएसआर कंपनीवर कागदपत्र फेरफारीचा आरोप
रोहित पवारांचा व्हीएसआर कंपनीवर कागदपत्र फेरफारीचा आरोप.
जेएनपीएमध्ये केळी, कांदा, द्राक्षे, तांदळाचे हजारो कंटेनर अडकले
जेएनपीएमध्ये केळी, कांदा, द्राक्षे, तांदळाचे हजारो कंटेनर अडकले.