AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मराठा आंदोलनाचा विषय पुन्हा पेटणार, आता हे आहे कारण

maratha reservation : मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयात रद्द झाल्यानंतर मराठा समाजाकडून अनेक वेळा आंदोलने झाली. परंतु त्यानंतर ठोस निर्णय झाला नाही. आता पुन्हा मराठा समाज आंदोलन उभारण्याच्या तयारीत आहे.

मराठा आंदोलनाचा विषय पुन्हा पेटणार, आता हे आहे कारण
Image Credit source: tv9
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Aug 27, 2023 | 9:12 AM
Share

पुणे | 27 ऑगस्ट 2023 : सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द करण्याच्या निर्णय घेतला होता. त्यानंतर मराठा समाजास आरक्षण (maratha reservation ) मिळण्यासाठी समाजाने अनेक आंदोलने केली. परंतु सरकारकडून ठोस निर्णय झाला नाही. न्यायालयीन प्रक्रियेत हा निर्णय अडकणार असल्यामुळे मराठा समाजाला 50 टक्क्यांच्या आतच ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी सतत होत आहे. या मागणीसाठी मराठा समाज पुन्हा आक्रमक झाला आहे. त्यासाठी आंदोलन उभारण्यात येणार आहे. यामुळे पोलिसांनी मराठा समन्वयकांना नोटिसा दिल्या आहे.

का दिल्या नोटिसा

मराठा आरक्षणासाठी सरकारकडून कोणताही ठोस निर्णय अद्याप झाला नाही. यामुळे मराठा समाजाने 29 तारखेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा बंगल्यावर आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे पोलिसांनी मराठा समन्वयकांना नोटिसा दिल्या आहेत. वर्षा बंगला परिसरात आंदोलन करू नका, अशा नोटिसा मराठा समन्वयकांना मुंबई पोलिसांकडून दिल्या आहेत.

काय आहे आंदोलकांची मागणी

मराठा समाजाला 50 टक्क्यांच्या मर्यादेत आरक्षण देण्याची मागणी केली जात आहे. ओबीसीच्या कोट्यातून हे आरक्षण देण्याची मागणी केली जात आहे. तसेच जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत नोकरभरणी करू नका, अशी मागणी मराठा समन्वयकांनी केली आहे. त्यासाठी 29 ऑगस्टला वर्षा बंगल्याबाहेर आंदोलन करणार आहे.

मराठा समाजाच्या इतर मागण्या

राज्य सरकारने मराठा आरक्षणाचा प्रलंबित असलेला प्रश्न तात्काळ सोडवावा, अरबी समुद्रात उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे काम तात्काळ सुरू करावे, पंजाबराव देशमुख निर्वाण भत्ता आणि वस्तीगृह योजनेचा लाभ सर्वच मराठा विद्यार्थ्यांना मिळावा, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळातून मराठा समाजातील उमेदवारांना कर्ज दिले जाते, परंतु त्यासाठी अनेक जाचक अटी आहेत, त्या अटी रद्द कराव्यात, कोपर्डी प्रकरणातील आरोपींना झालेल्या फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी करावी तसेच मराठा आरक्षणाच्या आंदोलकांवर दाखल झालेले सर्व गुन्हे मागे घ्यावे, या मागण्या मराठा समाजाच्या आहेत. यासाठी समाजाकडून राज्यात अनेक वेळा आंदोलन, उपोषण करण्यात आले आहे.

Follow Us
फलटणच्या रुग्णालयात पुन्हा डॉक्टरची आत्महत्या; राजकीय धमकी अन्...
Video | फलटणच्या रुग्णालयात पुन्हा डॉक्टरची आत्महत्या; राजकीय धमकी अन् प्रशासकीय छळाच्या आरोपांनी प्रकरणाला नवं वळण!
जरांगेंची प्रकृती खालावली; डॉक्टरांची धावपळ, मात्र उपचार घेण्यास नकार
Manoj Jarange Health Issues | मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; डॉक्टरांची धावपळ, मात्र उपचार घेण्यास नकार
एसआयआर मोहिमेतून महाराष्ट्रातील 2.07 कोटी मतदारांची नावे वगळली
एसआयआर मोहिमेतून महाराष्ट्रातील 2.07 कोटी मतदारांची नावे वगळली
मुंबई महानगरपालिकेत शिवसेना आणि भाजपमधील शीतयुद्ध सुरूच
मुंबई महानगरपालिकेत शिवसेना आणि भाजपमधील शीतयुद्ध सुरूच: समितीच्या कामकाजावरून वाद
मुंबई बँक निवडणुकीवरून दरेकरांचे सूचक विधान
मुंबई बँक निवडणुकीवरून दरेकरांचे सूचक विधान: महायुती म्हणून एकत्रित लढण्याला प्राधान्य
Instagram वर इशारा, हातावर नोट लिहून डॉक्टराचा टोकाचे पाऊल उचलण्याचा..
Instagram वर इशारा, हातावर नोट लिहून डॉक्टराचा टोकाचे पाऊल उचलण्याचा प्रयत्न
व्याकुळ नजर, आपली माणसे शोधण्याचा प्रयत्न; नेपाळमधील महाप्रलयानंतर...
व्याकुळ नजर, आपली माणसे शोधण्याचा प्रयत्न; नेपाळमधील महाप्रलयानंतर कुत्र्याने मालकाच्या घरासमोर ठाण मांडलं
CJPचा मोर्चा रोखण्याची सरकारची मोठी तयारी? उद्या कोर्टात...
CJPचा मोर्चा रोखण्याची सरकारची मोठी तयारी? उद्या कोर्टात... राजकारणातील हालाचली वाढल्या
त्रिशुलीतील बँक बचाव मोहीम: पुराच्या पाण्यातून सोने आणि रोकड जप्त
नेपाळ पूर: पाण्यात बुडालेल्या बँकेतून ५० कोटींचे सोने सुरक्षित बाहेर
राहुल गांधी मोठ्या अडचणीत? खर्गेंच्या सभेनंतर शुद्धीकरण वादातून थेट...
राहुल गांधी मोठ्या अडचणीत? खर्गेंच्या सभेनंतर शुद्धीकरण वादातून थेट गुन्हा दाखल