AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शाहू महाराज-बाबासाहेब एकत्र येऊ शकतात, मग प्रकाश आंबेडकर-संभाजीराजे का नाही? : छत्रपती संभाजीराजे

शाहू महाराज आणि डॉ. आंबेडकर एकत येऊ शकतात, तर मी आणि प्रकाश आंबेडकर का एकत्र येऊ शकत नाहीत? हा भेटीमागचा हेतू होता, असं संभाजीराजे यांनी म्हटलंय.

शाहू महाराज-बाबासाहेब एकत्र येऊ शकतात, मग प्रकाश आंबेडकर-संभाजीराजे का नाही? : छत्रपती संभाजीराजे
खासदार संभाजीराजे छत्रपती आणि प्रकाश आंबेडकर
| Updated on: May 29, 2021 | 5:09 PM
Share

पुणे : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. अशावेळी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आक्रमक भूमिका घेतलीय. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर त्यांनी सर्वपक्षीय नेत्यांच्या गाठीभेटी घेतल्या. त्याचाच भाग म्हणून संभाजीराजे यांनी आज पुण्यात वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली. त्यावेळी बऱ्याच दिवसांपासून प्रकाश आंबेडकर यांची भेट घ्यायची होती. मला शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा वारसा आहे. शाहू महाराज आणि डॉ. आंबेडकर एकत येऊ शकतात, तर मी आणि प्रकाश आंबेडकर का एकत्र येऊ शकत नाहीत? हा भेटीमागचा हेतू होता, असं संभाजीराजे यांनी म्हटलंय. (Sambhajiraje Chhatrapati meeting with Prakash Ambedkar on Maratha reservation)

संभाजीराजे छत्रपती आणि प्रकाश आंबेडकर यांची बैठक पार पडल्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. गेल्या अनेक दिवसांपासून प्रकाश आंबेडकर यांची भेट घ्यायची होती. भेट घेण्यामागे जातीय विषमता कमी करता येईल, बहुजन समाज एका छताखाली राहील, हे कारण आहे. त्याचबरोबर मराठा आरक्षण हा एक भेटीचा भाग होईल. शाहू महाराज यांनी सुरुवातीला बहुजन समाजाला आरक्षण दिलं. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचीही मराठा समाजाला आरक्षण मिळावं अशी इच्छा होती, असंही संभाजीराजे यावेळी म्हणाले.

राजकीय पक्षांना मराठ्यांना आरक्षण देण्यात रस नव्हता – आंबेडकर

संभाजीराजेंनी जो मराठा आरक्षमाचा विषय घेतला आहे, त्याला राजकीय पक्षांमध्ये रस नव्हता. आरक्षणाच्या मुद्यावरुन बाबासाहेबांनी राजीनामा दिला होता. काँग्रेस वर्किंग कमिटीने मान्य केल्यानंतर बाबासाहेबांनी राजीनामा मागे घेतला होता. आरक्षण हे समाजाला व्यवस्थेशी जोडणारा एक भाग आहे. आता प्रशासनाशीही जोडण्याचं प्रिन्सिपल आहे. मात्र ते मान्य करायला तयार नाही, असं प्रकाश आंबेडकर यावेळी म्हणाले.

‘राज्यसत्तेच्या माध्यमातून कोर्टाच्या अडचणीवर मात करु शकतो’

पहिली घटना दुरुस्ती झाली ती आरक्षणाच्या मुद्द्यावरुनच झाली. ही घटनादुरुस्ती बाबासाहेबांनी केली त्यावेळचं भाषण महत्त्वाचं होतं. येणाऱ्या सरकारला आरक्षणाचा मुद्दा हा त्रासदायक ठरणार आहे, हा मुद्दा इतकं डोकं वर काढेल की राज्यसत्ता चालवायलाच कठीण होईल, अशी परिस्थिती आहे, असंही आंबेडकर म्हणाले. मराठा आरक्षणासाठी रिव्हू पिटीशन नाही, तर राष्ट्रपती किंवा राज्यपालांमार्फत रिव्ह्यू करता येईल. म्हणूनच राज्यसत्तेची गरज आहे. राज्यसत्ता असेल तर आपण राज्यपालांमार्फत रिव्हू मागू शकतो आणि कोर्टाच्या अडचणीवर मात करु शकतो. हा एक मार्ग मला दिसत असल्याचंही आंबेडकर यांनी म्हटलंय.

‘राज्यसत्तेसाठी संभाजीराजेंनी पुढाकार घ्यावा’

आताच्या परिस्थितीत सुप्रीम कोर्टाने निर्णय दिलाय त्यामध्ये दोन मार्ग आहे. एक म्हणजे रिव्हूय पिटीशन आणि ती फेटाळल्यावर क्युरेटिव्ह हे दोन मार्ग आहेत. तेव्हा राज्य सत्तेशिवाय हा प्रश्न सुटणार नाही. महाराष्ट्राच्या राजकारणात शिळेपणा आला आहे. तो ताजेपणा आणायचा असेल, तर संभाजीराजेंनी पुढाकार घेतला तर तो येऊ शकतो, असं मतही आंबेडकर यांनी यावेळी व्यक्त केलंय.

संबंधित बातम्या :

महाराष्ट्राच्या राजकारणात शिळेपणा, संभाजीराजे पुढाकार घ्या, प्रकाश आंबेडकरांनी पाठ थोपटली; मराठा आरक्षणाचा मार्ग सांगितला!

त्यावेळी संभाजी छत्रपतींनी संसदेत तोंड का उघडले नाही?; कोळसे-पाटलांचा सवाल

Sambhajiraje Chhatrapati meeting with Prakash Ambedkar on Maratha reservation

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.