AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आजारी; नेमकं काय झालं?

येत्या 22 जानेवारी रोजी राम मंदिर प्रतिष्ठापना सोहळा आहे. बाकीच्या भानगडीत जाऊ नका. मलाही त्यात पडायचं नाही. पण राम मंदिर होणं याही पेक्षा मला सर्वात महत्त्वाचं वाटतं, ते म्हणजे कारसेवकांनी जे कष्ट घेतले, त्यांचं स्वप्न पूर्ण होतंय. त्यामुळे त्या दिवशी पूजा आरत्या करा. तुम्हाला जिथे जिथे काय करता येईल ते करा. हे करताना कुणाला त्रास होणार नाही, याची काळजी घ्या, असं आवाहन राज ठाकरे यांनी केलं.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आजारी; नेमकं काय झालं?
Raj ThackerayImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Jan 13, 2024 | 1:47 PM
Share

योगेश बोरसे, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, पुणे | 13 जानेवारी 2023 : मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे आजारी आहेत. त्यांना ताप आला असून अशक्तपणा जाणवत आहे. स्वत: राज ठाकरे यांनी ही माहिती दिली आहे. मला कार्यक्रमाला यायला उशीर झाला. मी येऊच शकत नव्हतो. काल संध्याकाळपासून ताप आल्यासारखं वाटत होतं. आता मी सकाळी उठल्यावर डोळे उघडत नव्हते. अशक्तपणा आहे. पण तुम्ही इतक्या लांबून आला आहात. तुमचं दर्शन घेतल्याशिवाय मी परतणार नाही. म्हणून कार्यक्रमाला आलो आहे, असं राज ठाकरे यांनी सांगितलं.

मनसेने ग्रामपंचायत सदस्य आणि सरपंचांचा मेळावा आयोजित केला होता. यावेळी राज ठाकरे यांनी मार्गदर्शन केलं. कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच त्यांनी तब्येतीची माहिती दिली. निधी कसा आणायचा? कोणत्या योजना राबवायच्या? काम कसं करायचं? हे तुम्हाला माहीत नसेल असं नाही. तुमच्या भागातील प्रश्न तुम्हाला माहीत आहेत. त्यामुळे ते कसं सोडवायचे हे माहीत आहे. आज ग्रामपंचायती. उद्या जिल्हा परिषदांवर जाल. नंतर आमदार, खासदार व्हाल. पण लगेच आताच स्वप्न पाहू नका. तुम्ही तुमच्या भागात योजना आणाल आणि प्रगती कराल याची कल्पना आहे, असं राज ठाकरे म्हणाले.

जगण्याचं वातावरणच नाही

यावेळी त्यांनी स्वच्छतेचा कानमंत्र दिला. तसेच आपल्या सभोवतालचं वातावरण चांगलं ठेवण्याच्याही सूचना केल्या. आपल्याकडे शिक्षण आणि नोकऱ्या मिळत नाही का? ग्रामीण भागातील मुलं शहरात यायला बघत आहेत. शहरातील मुलं हे परदेशात जाऊ इच्छित आहेत. म्हणजे काय चाललंय? आपली पोरं परदेशात का जात आहेत? शिक्षण आणि नोकऱ्या नाही म्हणून का? तर तसं नाही. ते बाहेर जात आहेत, कारण सभोवतालचं वातवरण नाही.

आसपास जगण्याचं वातावरण नाही. तिथे काय फार मोठ्या नोकऱ्या मिळतात असं काही नाही. इथून पळून जायचं आणि स्वीपर म्हणून काम करायचं. तो डंकी सिनेमा पाहिलाच असेल. त्यात तेच दाखवलं. ती कामे इथेही मिळतात. पण वातवरण चांगलं नाही. त्यामुळे वातावरण चांगलं करा. गावातील मुलांना नवनवीन कल्पना सूचल्या पाहिजे असं वातावरण करा, असं आवाहन राज यांनी केलं.

ठाकूरचा बाप पाणी…

मी एका गावात गेलो होतो. त्या गावात लोडशेडिंग होती. लोडशेडिंग कसली? 48 तास वीज यायची नाही. गावात नाला, त्याच्या बाजूला दोन घरे. वाईट अवस्था होती. त्या गावात टाकी पाहिली. मी विचार करत होतो. माझ्या शालेय जीवनातील अत्यंत भ्रष्टाचारी ग्रामपंचायत म्हणजे रामगड ग्रामपंचायत. शोले या सिनेमातील रामगड ग्रामपंचायत ही सर्वात भ्रष्ट होती. हा सिनेमा पाहिला का? त्या गावात सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणजे ठाकूर आहे. त्या गावात वीज नाही, पण पाण्याची टाकी आहे.

वीजच नाही तर टाकीत ठाकूरचा बाप पाणी चढवणार होता का? किती मोठं करप्शन. त्या टाकीला काहीही नव्हतं. या असल्या प्रकारच्या गोष्टी महाराष्ट्र सैनिकांकडून होता कामा नये. गावात गेल्यावर आधीच्या पिढ्यातील लोकांना वाटलं पाहिजे काम करावं तर या लोकांसारखं, नाही तर करू नये. एवढंच सांगायचं. गाव चांगलं आणि स्वच्छ ठेवा. गावातील वातावरण बदलून टाका, असं आवाहन त्यांनी केलं.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.