AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Raj Thackeray : खड्ड्यांच्या प्रश्नावर राज ठाकरे यांचं सडतोड उत्तर, ज्यांना मतं दिली त्यांना विचारा

Raj Thackeray : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे पुणे दौऱ्यावर आहेत. त्यांनी मनसे पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. त्यांनी जेन झी बद्दल महत्वाचं वक्तव्य केलं आहे.

Raj Thackeray : खड्ड्यांच्या प्रश्नावर राज ठाकरे यांचं सडतोड उत्तर, ज्यांना मतं दिली त्यांना विचारा
Raj Thackeray
| Updated on: Aug 14, 2026 | 12:27 PM
Share

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे पुणे दौऱ्यावर आहेत. त्यांनी आज मनसे पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. त्यांनी जेन झी बद्दल महत्वाचं वक्तव्य केलं आहे. “जेन झी वर लक्ष केंद्रीत करा. जेन झी वर फोकस करा. जेन झी मध्ये बदल घडवण्याची ताकद आहे. त्यांच्याशी समरस व्हा. पुढचं राजकारण जेन झी भोवती फिरणार आहे. त्यामुळे त्यांच्यावर लक्ष द्या” अशा सूचना राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. आज पुणे शहर कार्यालय येथे राज ठाकरेंची पदाधिकाऱ्यांसोबत बैठक पार पडली. त्यांनी पुण्यातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्याशी वन टू वन चर्चा केली. पुण्यातील खड्डे आणि एकतानगरमध्ये पाणी भरलेलं, त्या बद्दल विचारलं. त्यावर राज ठाकरे यांनी आपल्या खास शैलीत उत्तर दिलं. ‘ज्यांना मतं दिली, त्यांना विचारा’ असं राज ठाकरे म्हणाले.

महाराष्ट्रात सध्या खड्ड्यांचा प्रश्न गंभीर बनलाय. रस्त्यांची दुरावस्था, खड्डे यामुळे अनेक निष्पाप नागरिकांना आपले प्राण गमवावे लागत आहेत. नाशिकमध्ये चार ते पाच जणांचा मृत्यू खड्ड्यांमुळे झाला आहे. काही शाळकरी विद्यार्थ्यांनी रस्त्यांची दुरावस्था सांगणारे व्हिडिओ बनवले. हे व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले. त्यामुळे खड्ड्यांच्या मुद्यावर राज ठाकरे यांनी ‘ज्यांना मत दिली, त्यांना विचारा’ ही प्रतिक्रिया बरच काही सांगून जाते. त्याशिवाय कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनामुळे जेन झी ची ताकद राज ठाकरे यांच्या लक्षात आली आहे. या जेन झीं च्या आंदोलनामुळे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावा लागला. म्हणून ते म्हणाले भविष्यात राजकारण जेन झी भोवती फिरणार आहे.

पक्ष संघटना बळकट करण्यावर लक्ष

राज ठाकरेंनी सध्या पक्ष बांधणीवर लक्ष केंद्रीत केलय. त्यामुळे ते सध्या विविध जिल्ह्यांच्या दौऱ्यावर आहेत. मागच्या आठवड्यात त्यांनी नाशिक दौरा केला. आज ते पुण्यामध्ये आहेत. मुंबई, पुणे, नाशिक या शहरांमध्ये मनसेचा मुख्य जनाधार आहे. या शहरांमध्ये मनसेला काही वर्षांपूर्वी चांगलं यश मिळालं होतं. आता मुंबई, पुणे, नाशिकमध्ये राज ठाकरे यांनी पक्ष संघटना बळकट करण्यावर लक्ष केंद्रीत केलं आहे.

Follow Us
MNS शहराध्यक्षांच्या गाडीची तोडफोड: मनसेचा भाजपवर आरोप
अंबरनाथमधील भाजप-मनसे राड्यावरुन मनसे नेते आक्रमक, गाडी तोडफोड करणाऱ्यांवर कारवाईची मागणी
चाकणच्या 20 कंपन्या स्थलांतराच्या तयारीत? 2 हजार रोजगारांचा प्रश्न
Sharad Pawar | चाकणच्या 20 कंपन्या स्थलांतराच्या तयारीत? 2 हजार रोजगारांचा प्रश्न; शरद पवार यांचा दावा
आमदार अपात्रता निर्णयावर राहुल नार्वेकरांचं मोठं वक्तव्य...
Rahul Narwekar | आमदार अपात्रता निर्णयावर राहुल नार्वेकरांचं मोठं वक्तव्य; सुप्रीम कोर्टात निर्णय....
फडणवीसांच्या निर्देशाने महा-आयडी; नागरिकांना मिळणार एकच डिजिटल ओळख
मुख्यमंत्री फडणवीसांच्या निर्देशाने महा-आयडी; नागरिकांना मिळणार एकच डिजिटल ओळख
पाकिस्तानचे PM शाहबाज शरीफ यांची पुन्हा भारताला धमकी
‘सिंधूचं पाणी आमची रेड लाईन’; पाकिस्तानचे PM शाहबाज शरीफ यांची भारताला धमकी
‘गावातील शाळांना सुविधा मिळेपर्यंत स्वातंत्र्याचं स्वप्न अपूर्ण'-दिपके
‘गावातील शाळांना सुविधा मिळेपर्यंत स्वातंत्र्याचं स्वप्न अपूर्ण'- अभिजीत दिपके
जमिनीच्या वादात अडकलेल्यांसाठी मोठी बातमी! सरकारचा मेगा प्लॅन
Chandrashekhar Bawankule | जमिनीच्या वादात अडकलेल्यांसाठी मोठी बातमी! सरकारचा मेगा प्लॅन; चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली घोषणा, म्हणाले...
जरांगेंच्या टीकेनंतर बावनकुळे भावुक; लाड म्हणाले, ‘वैयक्तिक टीक नको’
जरांगेंच्या टीकेनंतर बावनकुळे भावुक; प्रसाद लाड म्हणाले, ‘वैयक्तिक टीका नको’
मनिषा कायंदे यांचा संजय राऊतांवर हल्लाबोल : "शिंदेंच्या जीवावर खासदार
मनिषा कायंदे यांचा संजय राऊतांवर हल्लाबोल :
राजकीय उद्योग सोडून उद्योजकांकडे लक्ष द्यावे: सामंतांवर हल्लाबोल
राजकीय उद्योग सोडून उद्योजकांकडे लक्ष द्यावे: रोहित पवारांचा उद्योगमंत्री सामंतांवर हल्लाबोल