AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोदी सरकारची महाराष्ट्राला मोठी भेट, राज्यातील सर्व विद्यार्थ्यांना होणार फायदा

Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत मुंबईसाठी महत्वाचा निर्णय घेण्यात आला. मुंबईत आता जागतिक दर्जाची संस्था सुरु होणार आहे.

मोदी सरकारची महाराष्ट्राला मोठी भेट, राज्यातील सर्व विद्यार्थ्यांना होणार फायदा
Image Credit source: tv9
| Updated on: Jul 15, 2023 | 3:16 PM
Share

पुणे, दिनांक 15 जुलै 2023 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रासाठी मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे राज्यभरातील विद्यार्थ्यांचा फायदा होणार आहे. मुंबईत आता जागतिक स्तरावरील दर्जेदार शैक्षणिक संस्था सुरु होणार आहे. यासंदर्भातील निर्णय मोदी मंत्रिमंडळाने बुधवारी घेतल्याची माहिती भाजप नेते अन् आमदार आशिष शेलार यांनी दिली. देशात 65 वर्षे काँग्रेस सरकार होते, परंतु मुंबईला काही मिळाले नाही, असा दावा शेलार यांनी केला आहे.

काय मिळाले मुंबईला

मुंबईला IIM म्हणजेच भारतीय व्यवस्थापन संस्था सुरु होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाने या निर्णयास मान्यता दिली आहे. NITIE मुंबई ही देशातील २१ वी तर राज्यातील दुसरी आयआयएम असणार आहे. यापूर्वी राज्यात केवळ नागपूरसाठी आयआयएम होती. या निर्णयाबद्दल मुंबई भाजपकडून मोदी सरकारचे आभार मानले असल्याचे आशिष शेलार यांनी सांगितले.

काय म्हणाले शेलार

पवईत असणाऱ्या NITIE कॉलेजला IIM ची परवानगी मिळाली आहे. जगात नामवंत असणारी आयआयएमच्या 350 जागा मुंबईत मंजूर झाल्या आहेत. त्याला कॅबिनेटने मान्यता दिली असून संसदेच्या येत्या अधिवेशनात हे विधेयक मंजूर होईल. पण मुंबईमध्ये आयआयएम मिळाले तरी विरोधक गप्प का? या विषयावर ते बोलत का नाही? असे त्यांनी सांगितले.

शिक्षणात अनेक बदल

देशाच्या इतिहासात शिक्षण पॉलिसी बदलण्याचे धाडस मोदी सरकारने केली आहे. हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे यश आहे. मोदी सरकारने शिक्षण धोरणात केलेले बदल विद्यार्थ्यांपर्यंत नेणार आहे. त्यासाठी भाजप प्रत्येक विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहे. मुंबईला सगळे मिळत आहे, या सगळ्या योजना जनतेपर्यंत नेणार असल्याचे आशिष शेलार यांनी म्हटले आहे.

आदित्य ठाकरे यांना राजकीय कावीळ

ज्यांना कावीळ झाले आहे, त्यांना सगळ पिवळ दिसते. आदित्य ठाकरे यांना काही होऊ नये, परंतु त्यांना राजकिय कावीळ झाली आहे, हे खरे आहे. त्यामुळे आदित्य ठाकरे यांना सगळे निर्णय विद्यार्थ्यांच्या विरोधात होत असल्याचे वाटतात.

मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा.
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी.
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर.