AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोदी सरकारची महाराष्ट्राला मोठी भेट, राज्यातील सर्व विद्यार्थ्यांना होणार फायदा

Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत मुंबईसाठी महत्वाचा निर्णय घेण्यात आला. मुंबईत आता जागतिक दर्जाची संस्था सुरु होणार आहे.

मोदी सरकारची महाराष्ट्राला मोठी भेट, राज्यातील सर्व विद्यार्थ्यांना होणार फायदा
Image Credit source: tv9
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Jul 15, 2023 | 3:16 PM
Share

पुणे, दिनांक 15 जुलै 2023 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रासाठी मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे राज्यभरातील विद्यार्थ्यांचा फायदा होणार आहे. मुंबईत आता जागतिक स्तरावरील दर्जेदार शैक्षणिक संस्था सुरु होणार आहे. यासंदर्भातील निर्णय मोदी मंत्रिमंडळाने बुधवारी घेतल्याची माहिती भाजप नेते अन् आमदार आशिष शेलार यांनी दिली. देशात 65 वर्षे काँग्रेस सरकार होते, परंतु मुंबईला काही मिळाले नाही, असा दावा शेलार यांनी केला आहे.

काय मिळाले मुंबईला

मुंबईला IIM म्हणजेच भारतीय व्यवस्थापन संस्था सुरु होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाने या निर्णयास मान्यता दिली आहे. NITIE मुंबई ही देशातील २१ वी तर राज्यातील दुसरी आयआयएम असणार आहे. यापूर्वी राज्यात केवळ नागपूरसाठी आयआयएम होती. या निर्णयाबद्दल मुंबई भाजपकडून मोदी सरकारचे आभार मानले असल्याचे आशिष शेलार यांनी सांगितले.

काय म्हणाले शेलार

पवईत असणाऱ्या NITIE कॉलेजला IIM ची परवानगी मिळाली आहे. जगात नामवंत असणारी आयआयएमच्या 350 जागा मुंबईत मंजूर झाल्या आहेत. त्याला कॅबिनेटने मान्यता दिली असून संसदेच्या येत्या अधिवेशनात हे विधेयक मंजूर होईल. पण मुंबईमध्ये आयआयएम मिळाले तरी विरोधक गप्प का? या विषयावर ते बोलत का नाही? असे त्यांनी सांगितले.

शिक्षणात अनेक बदल

देशाच्या इतिहासात शिक्षण पॉलिसी बदलण्याचे धाडस मोदी सरकारने केली आहे. हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे यश आहे. मोदी सरकारने शिक्षण धोरणात केलेले बदल विद्यार्थ्यांपर्यंत नेणार आहे. त्यासाठी भाजप प्रत्येक विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहे. मुंबईला सगळे मिळत आहे, या सगळ्या योजना जनतेपर्यंत नेणार असल्याचे आशिष शेलार यांनी म्हटले आहे.

आदित्य ठाकरे यांना राजकीय कावीळ

ज्यांना कावीळ झाले आहे, त्यांना सगळ पिवळ दिसते. आदित्य ठाकरे यांना काही होऊ नये, परंतु त्यांना राजकिय कावीळ झाली आहे, हे खरे आहे. त्यामुळे आदित्य ठाकरे यांना सगळे निर्णय विद्यार्थ्यांच्या विरोधात होत असल्याचे वाटतात.

Follow Us
पेट्रोलच्या पावतीवर इथेनॉलचं प्रमाण द्या! कोर्टाने याचिका फेटाळली, पण
Supreme Court | पेट्रोलच्या पावतीवर इथेनॉलचं प्रमाण द्या! सुप्रीम कोर्टाने याचिका फेटाळली, पण...
प्रताप सरनाईकांवर भाजप नेत्याचाच गंभीर आरोप, अचानक...
बाळासाहेबांचं नाव वापरून कोट्यवधींचा... प्रताप सरनाईकांवर भाजप नेत्याचाच गंभीर आरोप
जरांगेंची उपोषणाच्या तिसऱ्या दिवसशी तब्येत खालावली, डॉक्टर म्हणाले...
जरांगेंची उपोषणाच्या तिसऱ्या दिवसशी तब्येत खालावली, डॉक्टर म्हणाले...
मोठा एल्गार! मुंबईला जायची तयारी करा; लवकरच... मनोज जरांगेंचं मराठा...
मोठा एल्गार! मुंबईला जाण्याची तयारी करा; लवकरच... मनोज जरांगे यांचे मराठा समाजाला आवाहन
दिल्लीतील स्लीपर बसमध्ये अल्पवयीन विद्यार्थिनीवर सामूहिक अत्याचार
New Delhi Crime | महिला सुरक्षेवर पुन्हा प्रश्नचिन्ह! दिल्लीतील स्लीपर बसमध्ये अल्पवयीन विद्यार्थिनीवर सामूहिक अत्याचार, नेमकं घडलं काय?
महायुतीत खलबत? दरेकरांच्या गडाला शिंदेंचे आव्हान, मुंबई बँकांच्या...
महायुतीत खलबत? दरेकरांच्या गडाला शिंदेंचे आव्हान, मुंबई बँकांच्या निवडणुकीत...
जळगावात ड्रग्जविरोधात मोठी कारवाई! 5 किलो MD पावडर जप्त, किंमत तब्बल..
Jalgaon | जळगावात ड्रग्जविरोधात मोठी कारवाई! 5 किलो MD पावडर जप्त, किंमत तब्बल 1.25 कोटी
MPSC पेपरफुटीत मोठा खुलासा! 5 लाखांचा व्यवहार अन् प्रकरण आलं समोर
MPSC पेपरफुटीत मोठा खुलासा! माजी विद्यार्थ्याच्या माध्यमातून फोडला पेपर? 5 लाखांचा व्यवहार अन् प्रकरण आलं समोर
जो ठाकरेंचा होऊ शकला नाही, तो जरांगेंचा कसा होणार?
Sanjay Raut UNCUT | जो ठाकरेंचा होऊ शकला नाही, तो जरांगेंचा कसा होणार?; बंडू जाधवांवर संजय राऊतांचा घणाघात
भागवतांचं ते विधान म्हणजे RSSच्या प्लेबुकमधली जुनी खेळी!
Asaduddin Owaisi | भागवतांचं ते विधान म्हणजे RSSच्या प्लेबुकमधली जुनी खेळी! असदुद्दीन ओवैसींचा थेट हल्लाबोल