AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अवकाळी पावसाने कांदा उत्पादक हवालदिल; रब्बी पिकांवरही बुरशीजन्य आजार

कांदा पीक हे नाशवंत असले तरी रोजच्या आहारामध्ये गरज असणारे पीक आहे. चालू हंगाम मध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्याच्या शेतातील कांदा रोपाला बुरशी होणे, लागवडीनंतर रोप न फुटणे, लागवड केलेला कांदा न उगवणे किंवा जोडणे, हवामानामुळे कांद्याच्या माना लांबने, पावसामुळे कांदा खराब होणे, निष्कृष्ट दर्जाचे कांदा बियाणे आदी वेगवेगळ्या कारणामुळे प्रचंड नुकसान शेतकरी वर्गाला होत आहे.

अवकाळी पावसाने कांदा उत्पादक हवालदिल; रब्बी पिकांवरही बुरशीजन्य आजार
संग्रहीत छायाचित्र
| Edited By: | Updated on: Dec 03, 2021 | 5:30 PM
Share

पुणे – दोन दिवसांपासून पुण्यात होत असलेल्या पाऊस व ढगाळ वातावरणामुळ शेतकरी हवालदिल झाले आहेत. जिल्ह्यातील कांद्याच्या उत्पादनासाठी महत्वाचा तालुका असलेल्या जुन्नरमध्ये ढगाळ वातावरण , अवकाळी पावसाने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे .ढगाळ वातावरणाने कांदा तरकारी भाजीपाल्यावर विविध रोगाचे संक्रमण होणार आहे कांद्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार असल्याने येथील कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे.

पिकांवर रोगाचा प्रादुर्भव जुन्नर तालुक्यात रोहोकडी, आंबेगव्हान,पाचघर, चिल्हेवाडी, अहिनावेवाडी गावातील अनेक शेतकरी तरकारी पालेभाज्या आणि कांदा पीक घेतात. अचानक हवामानाचा बदल झाल्याने पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव झाला त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये पुन्हा अवकाळी पावसाची धास्ती निर्माण झाली आहे. हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार दिवसभर अवकाळी पावसाने हजेरी लावली. संथ गतीने बरसणाऱ्या पावसाने रब्बी हंगामासमोर मोठा परिणाम झाला आहे.

ढगाळ हवामान आणि त्यामध्ये घनदाट धुके यामुळे पिकांवर बुरशीजन्य आणि किटकजन्य रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत आहे. कांदा पीक हे नाशवंत असले तरी रोजच्या आहारामध्ये गरज असणारे पीक आहे. चालू हंगाम मध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्याच्या शेतातील कांदा रोपाला बुरशी होणे, लागवडीनंतर रोप न फुटणे, लागवड केलेला कांदा न उगवणे किंवा जोडणे, हवामानामुळे कांद्याच्या माना लांबने, पावसामुळे कांदा खराब होणे, निष्कृष्ट दर्जाचे कांदा बियाणे आदी वेगवेगळ्या कारणामुळे प्रचंड नुकसान शेतकरी वर्गाला होत आहे. कांदा पिकावर मोठ्या प्रमाणात रोग पडून कांद्याचे पीक खराब होत आहे. खराब झालेले पीक दुरुस्त करण्यासाठी कांदा उत्पादकांना मोठा खर्च करावा लागत आहे. यामुळे येथील कांदा उत्पादक शेतकरी अक्षरश: मेटाकुटीस आला आहे.

Kangana Ranaut | पंजाबच्या किरतपूरमध्ये शेतकऱ्यांनी घातला कंगना रनौतच्या गाडीला घेराव

Special News| साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. नारळीकर यांचे अनकट अन् डोळ्यांत अंजन घालणारे स्फोटक भाषण…!

महाराष्ट्रात ओमिक्रॉनचे 28 संशयित, किती घाबरायला हवं? किती गंभीर? आरोग्यमंत्री टोपे म्हणतात..

पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन.