AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pune PMC | पुणे महापालिकेत समाविष्ट झालेल्या 23 गावांचा आराखडा तयार ; पण 11  गावांच्या विकासाचा मुहूर्त कधी साधणार?

गेल्या तीन वर्षापासून महापालिकेत समावेश होवूनही या गावांचा विकास थांबला आहे. मात्र दुसरीकडं अवघ्या पाच महिन्यांपूर्वी महापालिकेत समाविष्ट झालेल्या 23 गावांच्या विकास आराखड्याला गती मिळाली आहे. ही गावे 23 गावे पालिकेत आली असली तरी त्याच्या विकास आराखड्याचे काम पीएमआरडीएकडून सुरू असल्याने शासनाने हे काम त्यांच्याकडेच ठेवले होते.

Pune PMC | पुणे महापालिकेत समाविष्ट झालेल्या 23 गावांचा आराखडा तयार ; पण 11  गावांच्या विकासाचा मुहूर्त कधी साधणार?
PMCImage Credit source: TV9
| Updated on: Mar 18, 2022 | 8:30 AM
Share

पुणे – पुणे महापालिकेत(Pune Municipal Corporation)  नव्याने समावेश झालेल्या 23 गावांचा आराखडा तयार झाला आहे. त्यावर सुनावणी सुरु आहे. मात्र 2017  मध्ये पुणे महापालिकेत समाविष्ट झालेल्या 11 गावांचा विकास आराखडा(Development plan) अद्यापही पूर्ण झाला नसल्याचे समोर आले आहे. या 11  गावांच्या विकासाला मुहूर्त कधी लागणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. आगामी महानगरपालिकेच्या निवडणुका (Election)लक्षात घेत नव्याने सामाविष्ट झालेल्या 23 गावांना विकासकामे सुरु न झाल्याचं कारण देत कर सवलत ही नुकतीच देण्यात आली आहे. त्यानंतर आता गावांच्या नियोजनात्मक विकास सुरू करण्याच्या दृष्टीने पावले उचलली जात आहे. मात्र दुसरीकडे महापालिकेट समाविष्ट झालेल्या 11 विकासाचा मुहूर्त कधी साधणार याकडे लक्ष लागले आहे.

या गावांचा समावेश

महानगरपालिकेच्या हद्दीत २०१७मध्ये ११ गावांचा समावेश झाला. यामध्ये लोहगाव (उर्वरित), उर्वरित हडपसर- साडेसतरा नळी, मुंढवा, केशवनगर, उंड्री, आंबेगाव खुर्द, बुद्रुक, शिवणे, शिवणे-उत्तमनगर, धायरी (काही भाग), उरुळी देवाची आणि फुरसुंगी पूर्ण या गावांचा समावेश करण्यात आला. त्यानंतर जवळपास वर्षभराने पुणे महापालिकेने ऑक्‍टोबर 2018 मध्ये या गावांसाठी विकास आराखडा जाहीर करण्याचा मानस व्यक्त केला. मात्र त्यानंतर आलेल्या कोरोनाच्या संकटामुळे विकास आराखड्याचे काम बारगळले ते आद्यपही सुरु झालेले नाही. सद्यस्थितीला महापालिकेने आराखड्याच्या कामासाठी 22 जून 2022 पर्यंतची मुदत दिली आहे

आराखडा वेगाने मार्गी लागला

गेल्या तीन वर्षापासून महापालिकेत समावेश होवूनही या गावांचा विकास थांबला आहे. मात्र दुसरीकडं अवघ्या पाच महिन्यांपूर्वी महापालिकेत समाविष्ट झालेल्या 23 गावांच्या विकास आराखड्याला गती मिळाली आहे. ही गावे 23 गावे पालिकेत आली असली तरी त्याच्या विकास आराखड्याचे काम पीएमआरडीएकडून सुरू असल्याने शासनाने हे काम त्यांच्याकडेच ठेवले होते. त्यामुळे, हा आराखडा वेगाने मार्गी लागला असून आता त्यावर हरकती आणि सूचनांची सुनावणी सुरू झाली आहे. वर्षभरात तो मान्यही केला जाईल. त्यामुळे 11 गावांच्या आधी 23 गावांचा आराखडा मार्गी लागेल असे चित्र स्पष्ट झाले आहे.

Punjab चे मुख्यमंत्री भगवंत मान यांची मोठी घोषणा, भ्रष्टाचाराची तक्रार करण्यासाठी हेल्पलाईन सुरु करणार, तारीख ठरली

TRP: कशी ठरविली जाते टीव्ही न्यूज चॅनल्सची रेटिंग, BARC म्हणजे नेमके काय? टीआरपी मोजण्यासाठी कोणत्या तांत्रिक पद्धतीचा केला जातो वापर?

Holi Celebration | होळीनिमित्त Nandurbarमध्ये साखरेच्या दागिन्यांनी सजल्या बाजारपेठा

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.