AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमावेळी पोलिसांकडून चक्क महिलेवर लाठीचार्ज? नेमका प्रकार काय?

आमच्या जागेत कार्यक्रम होता. आम्हाला न विचारता मारहाण का केली, असा आरोप युवकांनी केला. यामुळे कार्यक्रमातील नागरिक आणि पोलीस यांच्यात चांगलाच संघर्ष झाला.

गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमावेळी पोलिसांकडून चक्क महिलेवर लाठीचार्ज? नेमका प्रकार काय?
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jun 02, 2023 | 8:36 PM
Share

सुनील थिगडे, प्रतिनिधी, पुणे : नृत्यांगणा गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमात काही ना काहीतरी गोंधळ होत असतो. गौतमीच्या नावावर हजारो लोकं कार्यक्रमाला येतात. या लोकांना सांभाळणे पोलिसांच्या नाकीनऊ येते. काही युवक कार्यक्रमात हुल्लडबाजी करतात. त्यामुळे गौतमी पाटील आणि तिच्या कार्यक्रमात राडा हे जणू समीकरण झालंय. अशीच एक घटना जुन्नर तालुक्यात घडली. कार्यक्रमात हुल्लडबाजी केली, म्हणून पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला. पण, आम्हच्या जागेत कार्यक्रम होता. आम्हाला न विचारता मारहाण का केली, असा आरोप युवकांनी केला. यामुळे कार्यक्रमातील नागरिक आणि पोलीस यांच्यात चांगलाच संघर्ष झाला.

युवकांचा गोंधळ घालण्याचा प्रयत्न

आघाडीची नृत्यांगना गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमात प्रत्येकवेळी काही ना काही राडा होत असतो. जुन्नर तालुक्यात निमगाव सावा येथे आयोजित केलेल्या गौतमी पाटील हिच्या डिजे शो कार्यक्रमात अनेकवेळा काही युवकांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. यामुळे पोलिसांना सौम्य लाठीमार देखील करावा लागला.

पोलिसांनी मारहाण केल्याचा आरोप

मात्र येथील खुडे कुटुंबातील नयन खुडे आणि त्यांचा भाऊ तसेच त्यांच्या आईवर पोलिसांनी मारहाण केली, असा आरोप खुद्द नयन खुडे आणि त्याच्या भावाने आणि आईने केला आहे.

आमच्याच जागेत आम्हाला मारहाण का?

ज्या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केला आहे ती जागा आमच्या मालकीची आहे. आम्हाला साधं विचारलं देखील नाही. या कारणावरून त्यांनी हातात ज्वलनशील द्रवरूप इंधन बाटलीमध्ये घेऊन गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. या कारणावरून पोलिसांनी त्यांना मार दिला असा दावा स्थानिक ग्रामस्थांनी केला.

कार्यक्रमातील लोकांना सांभाळणे खूप कठीण असते. अशावेळी पोलिसांना लाठीचा वापर करावा लागतो. कधीकधी गैरसमजातूनही असे प्रकार होतात. पोलीस म्हणतात, युवकांनी गोंधळ घातला. त्यामुळे सौम्य लाठीमार करावा लागला. पण, युवकांनी पोलिसांवरच गंभीर आरोप केले आहेत. आम्हाला विचारपूस करता का मारहाण केली, असं युवकांचं म्हणण आहे.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.