AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pune News : पुणे मनपाला खड्ड्यांवरुन न्यायालयाने फटकारले, पण आता आणखी खड्डे होणार

Pune News : पावसाळा आला की रस्त्यांवर खड्डे तयार होता. दरवर्षी नेहमीच येतो पावसाळाप्रमाणे नेहमीच खड्डे तयार होतात. मुंबई उच्च न्यायालयाने पुणे शहरातील खड्डयांची गंभीर दाखल घेतली होती. त्यानंतर खड्डेमुक्त पुणे शहर अजून लांबच असणार आहे.

Pune News : पुणे मनपाला खड्ड्यांवरुन न्यायालयाने फटकारले, पण आता आणखी खड्डे होणार
Pune PotholeImage Credit source: tv9 Marathi
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Sep 03, 2023 | 8:41 AM
Share

पुणे | 3 सप्टेंबर 2023 : पावसाळ्यात रस्त्यावरील खड्डे हा सर्वात जास्त चर्चेला येणारा विषय असतो. रस्त्यांवर निर्माण झालेल्या खड्ड्यांमुळे अनेक अपघात होतात. यानंतर स्थानिक नागरिक आंदोलन करतात. काही दिवस हा विषय चर्चेत असतो. पण स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रशासन असो की राज्य सरकार काहीच करत नाही आणि रस्त्यांवरील खड्डे कायम राहतात. यामुळे पुणे शहरात झालेल्या खड्ड्यांची दखल मुंबई उच्च न्यायालयाने घेतली होती. मुंबई उच्च न्यायालयाने पुणे महानगरपलिका आणि राज्य सरकारला फटकारले होते. परंतु खड्डेमुक्त शहर हे स्वप्न पूर्ण होण्यास मोठा कालावधी लागणार आहे.

पुणे शहरात पुन्हा होणार खड्डे

पुणे शहरात समान पाणीपुरवठा योजनेची अंमलबजावणी करण्याचा निर्णय झाला आहे. यामुळे पुणे शहरातील तब्बल ५२५ किलोमीटर लांबीचे रस्ते खोदले जाणार आहे. रस्ते खोदले जाणार असल्यामुळे पुणेकरांची खड्ड्यांमधून काही लवकर सुटका होणार नाही. पुणे शहरात समान पाणीपुरवठा योजनेसाठी १ हजार ८०० किलोमीटरच्या नवीन जलवाहिन्या टाकल्या जाणार आहेत.

त्या वेळी खोदाई झाली पण रस्ते तसेच होते

कोरोना आणि यानंतरचा काळात पुणे शहरात मोठ्या प्रमाणात जलवाहिन्या टाकण्यासाठी खोदाई करण्यात आली होती. परंतु यानंतर योग्य पद्धतीने रस्त्यांची दुरुस्ती करण्यात आली नाही. यामुळे पुणे सारख्या प्रगत शहरात अनेक ठिकाणी खड्ड्यांचे साम्राज्य पसरले होते. प्रशासनाला शर्थीचे प्रयत्न करुन खड्डे बुजवावे लागले. यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आला. परंतु खड्डेमुक्त शहर झाले नाहीच.

न्यायालयाने घेतली दखल

पुणे शहरातील खड्ड्यांसंदर्भात मुंबई उच्च न्यायालयात स्वयंप्रेरणे याचिका दाखल झाली होती. ऑगस्ट महिन्यात झालेल्या या सुनावणी दरम्यान न्यायालयाने पुणे मनपाला चांगलेच फटकारले. शहरे खड्डेमुक्त ठेवणे आणि त्यावर देखरेख ठेवण्याची जबाबदारी सरकारची आहे. तुमची जबाबदारी आम्ही का पार पाडावी? या शब्दांत न्यायालयाने सरकारला फटकारले होते. त्यानंतर या प्रकरणी 29 सप्टेंबरपर्यंत उत्तर देण्याचे आदेश उच्च न्यायालयाने पुणे महानगरपालिकेला दिला होते.

Follow Us
मॅनहोल मृत्यू प्रकरण तापलं! अमित साटम यांना पदावरून हटवा...
Mumbai | मॅनहोल मृत्यू प्रकरण तापलं! अमित साटम यांना पदावरून हटवा; संदीप देशपांडेंचा भाजपवर घणाघात
काँग्रेससोबत गेलात तेव्हा हिंदुत्व कुठे होतं? ठाकरेंच्या आंदोलनावर...
Breaking | काँग्रेससोबत गेलात तेव्हा हिंदुत्व कुठे होतं? उद्धव ठाकरेंच्या राम रक्षा आंदोलनावर उदय सामंतांचा घणाघात!
धावत्या स्कूटरवर कोसळलं नारळाचं झाड! अन् पुढे जे झालं....
Tree Collapse Mumbai | धावत्या स्कूटरवर कोसळलं नारळाचं झाड! तरुणाचा दुर्दैवी मृत्यू; निष्काळजीपणामुळे आणखी एकाचा बळी
हृदयद्रावक घटना! घरासमोर खेळत होता... उघड्या खड्ड्याने घेतला जीव
हृदयद्रावक घटना! घरासमोर खेळत होता... उघड्या खड्ड्याने घेतला 2 वर्षांच्या सोहमचा जीव
मुसळधार पावसाचा कहर; नवी मुंबईतील सर्व शाळांना सुट्टी जाहीर
ब्रेकिंग! मुसळधार पावसाचा कहर; नवी मुंबईतील दुपारच्या सत्रातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर
पुणे-रायगडमध्ये पावसाचा हाहाकार! हवामान विभागाचा रेड अलर्ट; रस्ते जलमय
Rain Update | पुणे-रायगडमध्ये पावसाचा हाहाकार! हवामान विभागाचा रेड अलर्ट; रस्ते जलमय
उद्धव ठाकरे पुन्हा हिंदुत्वाच्या रणांगणात! पत्रकार परिषदेत मोठी घोषणा
Uddhav Thackeray UNCUT | उद्धव ठाकरे पुन्हा हिंदुत्वाच्या रणांगणात! पत्रकार परिषदेत मोठी घोषणा; येत्या रविवारी...
अमित साटम की चाटम? साटम यांच्या हकालपट्टीची थेट संजय राऊतांकडून मागणी!
Sanjay Raut Press | अमित साटम की चाटम? मृत्यूंवर हसणं महागात पडणार; अमित साटम यांच्या हकालपट्टीची थेट संजय राऊतांकडून मागणी!
महाराष्ट्रात लागू होणार समान नागरी कायदा? अधिवेशनाकडे राज्याचे लक्ष
महाराष्ट्रात लागू होणार समान नागरी कायदा? फडणवीस सरकारच्या मोठ्या हालचाली सुरू; आजच्या अधिवेशनाकडे राज्याचे लक्ष
पालखीपूर्वी इंद्रायणीला प्रदूषणाचा विळखा! वारकऱ्यांचा संताप अनावर
Indrayani River | पालखीपूर्वी इंद्रायणीला प्रदूषणाचा विळखा! फेसाळलेल्या नदीने वारकऱ्यांचा संताप अनावर