AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अतिवृष्टीमुळे पुण्यात पाच तालुक्यातील शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर

पुण्यात 25 सप्टेंबर रोजी झालेल्या अतिवृष्टीच्या (Pune heavy rain) पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये. तसेच, अतिवृष्टीमुळे आपत्त्कालीन परिस्थिती निर्माण झालेली असल्याने त्याचा परिणाम शालेय विद्यार्थ्यांवर होऊ नये यासाठी जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी पुण्यातील पाच जिल्ह्यांतील शाळा, महाविद्यालयांना शुक्रवारी (27 सप्टेंबर) सुट्टी जाहीर केली आहे

अतिवृष्टीमुळे पुण्यात पाच तालुक्यातील शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर
| Updated on: Sep 27, 2019 | 9:00 AM
Share

पुणे : पुण्यात 25 सप्टेंबर रोजी झालेल्या अतिवृष्टीच्या (Pune heavy rain) पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये. तसेच, अतिवृष्टीमुळे आपत्त्कालीन परिस्थिती निर्माण झालेली असल्याने त्याचा परिणाम शालेय विद्यार्थ्यांवर होऊ नये यासाठी जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी पुण्यातील पाच जिल्ह्यांतील शाळा, महाविद्यालयांना शुक्रवारी (27 सप्टेंबर) सुट्टी जाहीर केली आहे (Holiday Declare in Pune).

पुणे जिल्ह्यातील पुणे शहर, हवेली, पुरंदर, भोर आणि बारामती या पाच तालुक्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे (Pune Schools).

पुण्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे आपत्त्कालीन परिस्थिती निर्माण झाली आहे. त्याचा परिणाम शालेय विद्यार्थ्यांवर होऊ नये, यासाठी ही खबरदारी घेण्यात आली आहे.

पुण्यात अतिवृष्टीमुळे 14 मृत्यू, 9 अद्याप बेपत्ता

मुसळधार पावसाने पुण्यातील 14 जणांचा बळी घेतला, तर नऊ जण अजूनही बेपत्ता आहेत. बुधवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील पाच तालुक्यांना फटका बसला. शहरासह ग्रामीण भागातील सखल भागातील घरात पाणी शिरलं होतं. या परिस्थितीनंतर प्रशासनाने युद्धपातळीवर पूरग्रस्तांना (Pune heavy rain flood) सुरक्षितस्थळी हलवलं आणि मदतीसाठी एनडीआरएफची पाच पथकं कार्यरत झाली. प्रशासनाकडून परिस्थितीवर लक्ष असून सर्व मदत दिली जात असल्याची माहिती जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी दिली.

गेल्या 22 वर्षात पहिल्यांदाच ऑगस्ट महिन्यात धरणं भरली असल्याचं जिल्हाधिकारी म्हणाले. तुलनेने रात्री झालेला पाऊस किती तरी जास्त होता. यावर्षी जिल्ह्यात 180 टक्के पाऊस झाला आहे. बुधवारच्या पावसामुळे जिल्ह्यात 14 जणांचा मृत्यू झाला, ज्यात पुणे शहरातील सहा, हवेली तालुक्यातील सहा आणि पुरंदर तालुक्यातील दोन जणांचा समावेश आहे.

संबंधित बातम्या :

पुण्यातील मुसळधार पावसाने 14 जणांचा मृत्यू, 9 जण अजूनही बेपत्ता

Pune Rain Live Update | पुण्यात पावसाचा कहर, मृतांचा आकडा 13 वर

ढगफुटी नाही, मग पुण्यातील पावसाचं नेमकं कारण काय?

झेडपी निवडणुकांवर टांगती तलवार; 50 टक्के आरक्षण मर्यादा ओलांडून....
झेडपी निवडणुकांवर टांगती तलवार; 50 टक्के आरक्षण मर्यादा ओलांडून.....
कांदा-मका दरघसरणीविरोधात चांदवडमध्ये शेतकऱ्यांचे आमरण उपोषण
कांदा-मका दरघसरणीविरोधात चांदवडमध्ये शेतकऱ्यांचे आमरण उपोषण.
पैश्यातून सत्ता आणि सत्तेतून पैसा ही एकमेव भाजपची भूमिका
पैश्यातून सत्ता आणि सत्तेतून पैसा ही एकमेव भाजपची भूमिका.
सांगलीमध्ये शेतकऱ्यांचा शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्यासाठी भव्य मोर्चा
सांगलीमध्ये शेतकऱ्यांचा शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्यासाठी भव्य मोर्चा.
माझा जवळचा मित्र गमावला; अजितदादांच्या आठवणींना उजाळा देताना....
माझा जवळचा मित्र गमावला; अजितदादांच्या आठवणींना उजाळा देताना.....
उद्धव ठाकरेंनी अजितदादांच्या निधनावर व्यक्त केला शोक, म्हणाले...
उद्धव ठाकरेंनी अजितदादांच्या निधनावर व्यक्त केला शोक, म्हणाले....
तर दादा त्यांना झापायचे; एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?
तर दादा त्यांना झापायचे; एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?.
अजित पवारांच्या विमान अपघातावर मोठी शंका; आव्हाडांनी ब्लॅक बॉक्सवर...
अजित पवारांच्या विमान अपघातावर मोठी शंका; आव्हाडांनी ब्लॅक बॉक्सवर....
मला कुणी विचारलंच नाही, तर मी का बोलू! जितेंद्र आव्हाड स्पष्टच बोलले
मला कुणी विचारलंच नाही, तर मी का बोलू! जितेंद्र आव्हाड स्पष्टच बोलले.
पहाटेचा शपथविधी, अजितदादा का नाराज व्हायचे? फडणवीसांनी सांगितला किस्सा
पहाटेचा शपथविधी, अजितदादा का नाराज व्हायचे? फडणवीसांनी सांगितला किस्सा.