AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भाजपचा प्रत्येक जिल्ह्यासाठी खास प्लान, लोकसभा, विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू; नवी समिती जाहीर

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. त्यामुळे भाजपने या दोन्ही लोकसभा निवडणुकीची जय्यत तयारी सुरू केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून भाजपने पदाधिकाऱ्यांवर काही महत्त्वाच्या जबाबदाऱ्या दिल्या आहेत.

भाजपचा प्रत्येक जिल्ह्यासाठी खास प्लान, लोकसभा, विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू; नवी समिती जाहीर
bjpImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 26, 2023 | 12:20 PM
Share

प्रदीप कापसे, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, पुणे | 26 सप्टेंबर 2023 : लोकसभा आणि राज्यातील विधानसभा निवडणुका कधीही जाहीर होण्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्ष निवडणुकीची रणनीती ठरवताना दिसत आहेत. अगदी छोट्या पक्षांनीही जोर बैठका सुरू केल्या आहेत. वंचित बहुजन आघाडीने तर काल लोकसभेच्या 48 जागांची तयारी सुरू केल्याचं विधान केलं आहे. महाविकास आघाडीच्या जागा वाटपाच्या फॉर्म्युल्या आधीच वंचितने त्यांची तयारी सुरू केली आहे. तर, दुसरीकडे भाजपनेही अधिकृतपणे निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. त्यासाठी एक समिती स्थापन केली असून प्रत्येक जिल्ह्यावर लक्ष वेधलं आहे.

भाजपने लोकसभा निवडणुकीबरोबरच विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. प्रत्येक जिल्ह्यासाठी भाजपने एक व्यवस्थापन समिती स्थापन केली आहे. या समिती अंतर्गत विधानसभा संयोजकांची नियुक्ती करण्यात आली आहे. या संयोजकांवर कामांची जबाबदारी देण्यात आली आहे. काय केलं पाहिजे आणि काय करू नये याची माहिती देण्यात आली आहे. तसेच या संयोजकांना काही टारर्गेटही देण्यात आले आहेत. तसेच त्यांनी त्यांचं लक्ष पूर्ण केलं की नाही याचा आढावाही घेतला जाणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

लोकसभेचा कार्यक्रम देणार

या विधानसभा संयोजकांना मतदारसंघात नियोजन करण्यास सांगितलं आहे. पुणे जिल्ह्यातही विधानसभा संजोयक नेमायला सुरुवात केली आहे. या संयोजकांना लवकरच भाजपकडून निवडणूक कार्यक्रम दिला जाणार आहे. विधानसभेच्या माध्यमातून भाजपने लोकसभेची जोरदार तयारी सुरू केली आहे. एक एक विधानसभा मतदारसंघ पिंजून काढणे म्हणजे लोकसभा मतदारसंघच पिंजून काढण्यासारखं आहे. त्यामुळे छोट्या छोट्या जबाबदाऱ्या देऊन भाजपकडून कामाचं वाटप केलं जात आहे.

जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचणार

प्रत्येक लोकसभा निवडणुकीत भाजप अधिक बारकाईने काम करत असते. अनेक पातळीवर पक्षाचं काम वाढवण्याचं काम केलं जातं. बुथपासून लोकसभा मतदारसंघापर्यंतचं भाजपचं प्लानिंग असतं. आता विधानसभा आणि लोकसभेसाठी भाजपने जिल्ह्यांवर लक्ष केंद्रीत केलं आहे. प्रत्येक जिल्ह्यात त्या जिल्ह्याच्या परिस्थितीनुसार पदाधिकाऱ्यांना कार्यक्रम दिला जाणार आहे. जास्तीत जास्त मतदार कसा भाजपकडे येईल याची खबरदारी घेतली जात आहे, असं सूत्रांनी सांगितलं.

Follow Us
पंजाबचे माजी मुख्यमंत्री सुखबीर सिंह यांच्यावर हल्ल्याचं नेमकं कारण...
Sukhbir Singh Badal | पंजाबच्या माजी मुख्यमंत्री सुखबीर सिंह यांच्यावर हल्ल्याचं नेमकं कारण काय? याआधीही... मोठी अपडेट समोर
अगामी सुनावणी मंगळवारी, पण... कोर्टाबाहेर येताच संजय राऊत नेमकं काय...
अगामी सुनावणी मंगळवारी, पण... कोर्टाबाहेर येताच संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
शिवसेनेच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट! हायकोर्टही पक्षाची नोंदणी रद्दचे...
शिवसेनेच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट! हायकोर्टही पक्षाची नोंदणी रद्दचे आदेश आयोगाला देऊ शकत नाही, मग...
अपात्र होणाऱ्या... एकनाथ शिंदेंच्या अडचणी वाढल्या? कपिल सिब्बल...
अपात्र होणाऱ्या... एकनाथ शिंदेंच्या अडचणी वाढल्या? कपिल सिब्बल यांनी नेमका युक्तिवाद काय लढवला?
मोठी बातमी! निकाल कोणाच्या बाजून झुकतोय? सिब्बल यांचा नेमक्या...
मोठी बातमी! निकाल कोणाच्या बाजूने झुकतोय? सिब्बल यांचा नेमक्या मुद्यावर युक्तिवाद, कोर्टाचं निदर्शन काय?
कपिल सिब्बल यांचा निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान
शिवसेना पक्षचिन्ह प्रकरण: कपिल सिब्बल यांचा निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान
पेगलवाडी रस्त्याची पाहणी. विद्यार्थ्यांशी साधला संवाद.
आदित्य ठाकरे यांच्याकडून त्र्यंबकेश्वरमधील पेगलवाडी रस्त्याची पाहणी. विद्यार्थ्यांशी साधला संवाद.
कोर्टातील निकालाच मोठा परिणाम हा... शिंदेंच्या गट नेत्याचं मोठं विधान
कोर्टातील निकालाच मोठा परिणाम हा... एकीकडे कोर्टात सुनावणी सुरू दुसरीकडे शिंदेंच्या गट नेत्याचं मोठं विधान
विरोधकांच्या गोंधळामुळे संसदेचं 61% कामकाज ठप्प
विनोद तावडे: विरोधकांच्या गोंधळामुळे संसदेचं 61% कामकाज ठप्प
कंगना राणावत यांची टीका: गृह मंत्रालयाबाबत दुहेरी भूमिका
राहुल गांधींच्या भूमिकेवर कंगना राणावत यांची टीका: गृह मंत्रालयाबाबत दुहेरी भूमिका