AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुणे शहरातील ओला, उबेर रिक्षा बंद होणार? काय आहे कारण?

Pune Auto Services : पुणे उपप्रादेशिक परिवहन विभागाने घेतलेल्या एका निर्णयामुळे शहरातील ओला, उबेर रिक्षा बंद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पुणे व पिंपरी चिंचवड मिळून सुमारे 40,000 ते 45,000 हजार रिक्षांनी ओला, उबेर या कंपन्यांशी करार केलेला आहे.

पुणे शहरातील ओला, उबेर रिक्षा बंद होणार? काय आहे कारण?
pune auto
| Updated on: Apr 22, 2023 | 4:55 PM
Share

पुणे : पुणे आणि पिंपरी चिंचवड शहर लोकप्रिय झालेल्या ओलो अन् उबेर या रिक्षा बंद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पुणे उपप्रादेशिक परिवहन विभागाने (आरटीओ) घेतलेल्या एका निर्णयामुळे या रिक्षा बंद होणार आहे. पुणे शहरात काही ठिकाणी प्रिपेड रिक्षा सेवा सुरु झाली आहे. परंतु ती सर्वत्र नाही. दुसरीकडे ओलो, उबेर रिक्षा सेवा सर्वत्र होती. आता ती बंद होणार असल्याने पुणेकरांना पर्यायी वाहतूक मार्ग शोधावा लागणार आहे. पुणे व पिंपरी चिंचवडीमधील सुमारे 40,000 ते 45,000 हजार रिक्षांनी ओला, उबेर या कंपन्यांशी करार केला होता.

का होणार बंद

‘मोटार वाहन मार्गदर्शक सूचना- 2020’ नुसार ओलो, उबेरसह चार कंपन्यांनी आवश्यक बाबींची पूर्तता केली नाही. त्यात मे. ॲनी टेक्नॉलॉजी प्रा. लि. पुणे, मे. उबेर इंडिया सिस्टीम्स प्रा.लि., मे. किव्होल्युशन टेक्नॉलॉजीज प्रा.लि. पुणे आणि मे. रोपन ट्रान्सपोर्ट्रेशन सर्व्हिस प्रा.लि. पुणे यांचा समावेश आहे. यामुळे या चार कंपन्यांना पुणे प्रादेशिक परिवहन विभागाने परवाना नाकारला आहे.

असा होता अर्ज

पुणे परिवहन विभागाकडे ओला, उबेर, रॅपीडो आणि किव्होल्युशन टेक्नॉलॉजीजने तीन चाकी सेवेसाठी अर्ज केला होता. यामध्ये ओला, उबरने तीन चाकीसोबत चारचाकी हलक्या वाहनांसाठी अर्ज केला होता. परंतु त्यांनी नियमाप्रमाणे पुर्तता केली नाही. यामुळे चारही कंपन्यांचा परवाना नाकारण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच ॲनी टेक्नॉलॉजीज प्रा.लि. व मे. उबेर इंडिया यांना चारचाकी हलकी मोटार वाहने परवाना जारी करण्याबाबत शासनाकडून मार्गदर्शन घेण्याचा निर्णय प्राधिकरणाने घेतला आहे.

उच्च न्यायालयाचा होता आदेश?

मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार आता परवाना म्हणजेच ऍग्रिगेट टॅक्सी सेवा देणाऱ्यांना लायसन्स काढावं लागेल. हे लायसन्स काढण्यासाठी राज्य सरकारला अधिसूचना जारी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यावेळी ज्यांना परवाना मिळेल, त्यांना टॅक्सी सेवा देता येईल. ज्यांना परवाना मिळणार नाही, त्यांना रस्त्यांवर वाहनं चालवता येणार नाहीत, असं हायकोर्टानं नमूद केलंय. प्रादेशिक वाहतूक प्राधिकरणारे कोणत्या कारणास्तव अर्ज फेटाळला, तर त्याबाबत अपिलही ऍग्रिगेटर कंपन्या करु शकतील.

ओला, उबेर बंद होणार?

आरटीओच्या निर्णयानंतर पुणे व पिंपरी चिंचवड शहरात सुरु असलेली ओला उबेरची सेवा बंद करावी लागण्याची शक्यता आहे. दोन्ही कंपन्यांच्या ॲग्रीगेटर लायसन्सला परवानगी नाकारली आहे.

यामुळे होत्या लोकप्रिय

पुणे शहरात प्रवास करण्यासाठी पुणेकर स्वत:चं वाहन वापरतात. पण स्वत:चे वाहन नसल्यास PMPML, रिक्षा, कॅब किंवा ओला उबर रिक्षाचा वापर करतात. यात स्वस्त आणि परवडणारी सेवा ओला, उबेरकडून सेवा पुरवणाऱ्या रिक्षांचा वापर होत होता.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.