AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सर्वात मोठी बातमी, महाराष्ट्रात पावसाचा मुक्काम आणखी किती दिवस? महत्त्वाची माहिती समोर

महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये सध्या मुसळधार पाऊस पडत आहे. मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं आहे. दरम्यान, प्रशासनाकडून शेकडो नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आलं आहे.

सर्वात मोठी बातमी, महाराष्ट्रात पावसाचा मुक्काम आणखी किती दिवस? महत्त्वाची माहिती समोर
Image Credit source: प्रातिनिधिक फोटो
| Edited By: Chetan Patil | Updated on: Jul 28, 2023 | 7:17 PM
Share

पुणे | 28 जुलै 2023 : महाराष्ट्रात गेल्या दोन आठवड्यांपासून प्रचंड मुसळधार पाऊस पडतोय. राज्यातील तीन-चार जिल्हे वगळता सर्वत्र मुसळधार पाऊस पडला. मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, पालघर, सिंधुदुर्ग, चंद्रपूर, यवतमाळ, बुलढाणा, अमरावती, कोल्हापूर, सातारा, नांदेड, पुणे या जिल्ह्यांना पावसाने अक्षरश: झोडपून काढलं आहे. अनेक भागांमध्ये नद्यांना पूर आलाय, घरं पाण्याखाली गेले आहेत. मुसळधार पावसामुळे दरडी कोसळण्याच्या देखील घटना घडल्या आहेत. रायगडच्या इर्शाळवाडी गावावर डोंगराचा भला मोठा कडा पडला. त्यामुळे संपूर्ण गाव चिरडलं गेलं. राज्यभरात धुमाकूळ घालणारा हा पाऊस आता किती दिवस मुक्काम करणार? असा प्रश्न अनेकांना पडलाय. हवामान विभागाकडून याबाबत महत्त्वाची माहिती देण्यात आली आहे.

हवामान विभागाकडून महाराष्ट्रासाठी पुढच्या पाच दिवसांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलं आहे. राज्यासाठी आता रेड अलर्ट टळला आहे. याशिवाय महाराष्ट्रात पुढच्या पाच दिवसांमध्ये पाऊस कमी होणार आहे. महाराष्ट्रात सध्या अतिवृष्टीची स्थिती नाही. पावसाचा जोर कमी होत जाणार, अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे.

कोकणसाठी ऑरेंज अलर्ट

कोकणातील जिल्ह्यांना पुढील पाच दिवसांसाठी ऑरेंज अलर्ट असणार आहे. तसेच मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही आता अतिवृष्टी होणार नाही. हवामान विभागाचे प्रमुख डॉ. अनुपम कश्यपी यांनी याबाबत माहिती दिली आहे.

पावसाचा जोर उद्यापासून आणखी कमी होईल. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ सर्व ठिकाणी आता वातावरण नॉर्मल आहे. तरीही आजसाठी कोकण, ठाणे, रायगड, पालघर, रत्निगिरी या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुणे, सातारा आणि घाट परिसरात मुसळधार पावसाची शक्यता आहे. पण पुढच्या पाच दिवसांत कुठेही अतिवृष्टीची शक्यता नाही, असं डॉ. अनुपम कश्यपी यांनी सांगितलं.

चंद्रपुरात पावसाचा हाहा:कार

चंद्रपुरात शहरात पावसाचा मोठा फटका बघायला मिळाला. शहरातील घरांमध्ये सात ते आठ फुटांपर्यंत पाणी आलं. नागरीक स्वत:ला वाचवण्यासाठी घराच्या छतावर गेले. घटनेचं गांभीर्य लक्षात एनडीआरएफची टीम शहरात मदतीला लागली. घरात कुणी आहे का? असा आवाज देत एनडीआरएफच्या जवानांनी नागरिकांना सुरक्षितस्थळी नेलं. एनडीआरएफच्या जवानांनी अशापद्धतीने 70 पेक्षा जास्त जणांना सुरक्षितस्थळी हलवलं.

ठाणे जिल्ह्यातही प्रचंड पाऊस

मुंबईसह ठाणे जिल्ह्यातही प्रचंड पाऊस पडला. ठाणे जिल्ह्यातील कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर, भिवंडी या शहरांमध्ये प्रचंड पाऊस पडला. कल्याणमध्ये काल प्रचंड पाऊस पडला. त्यामुळे नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आलं होतं.

Follow Us
वेळेवर मदत मिळाली असती तर... ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नातेवाईकांचा
मोठी बातमी! वेळेवर मदत मिळाली असती तर... ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नातेवाईकांचा आक्रोश
KDMC डॉक्टरांना मारहाण प्रकरणाला वेगळंच वळण! "काका मला मारू नका, मी...
KDMC डॉक्टरांना मारहाण प्रकरणाला वेगळंच वळण!
मृत्यूचा हाहाकार! 33 भारतीय पर्यटक असलेलं जहाज उलटलं; थरकाप उडवणारा
मृत्यूचा हाहाकार! 33 भारतीय पर्यटक असलेलं जहाज उलटलं; थरकाप उडवणारा Video समोर
एकनाथ शिंदेंच्या दालनातील बैठकीपासून तर विलिनीकरणापर्यंत; अखेर सुप्रिय
एकनाथ शिंदेंच्या दालनातील बैठकीपासून तर विलिनीकरणापर्यंत; अखेर सुप्रिया सुळेंनी पक्षातील Inside Story सांगितलीच
केंद्रात जाणार का? CM फडणवीसांचे मिश्कील विधान तुफान चर्चेत, म्हणाले..
केंद्रात जाणार का? CM फडणवीसांचे मिश्कील विधान तुफान चर्चेत, म्हणाले...
थेट धमकी अन् XXX... आणखी एका खासदाराची खळबळजनक ऑडिओ क्लिप व्हायरल
मोठी बातमी! थेट धमकी अन् XXX... आणखी एका खासदाराची खळबळजनक ऑडिओ क्लिप व्हायरल
राज्याच्या तिजोरीवर शेतकऱ्यांचा पहिला अधिकार, लाखो शेतकऱ्यांना फायदा
राज्याच्या तिजोरीवर शेतकऱ्यांचा पहिला अधिकार, लाखो शेतकऱ्यांना फायदा होणार; उपमुख्यमंत्री शिंदेंचे विधान
राऊतांच्या भाकितावर बच्चू कडूंचा टोला; थेट म्हणाले, दिल्लीत...
Bachchu Kadu | राऊतांच्या भाकितावर बच्चू कडूंचा टोला; थेट म्हणाले, दिल्लीत...
टाळ-मृदंगाच्या गजरात ज्ञानेश्वर माऊलींची पालखी सासवडकडे मार्गस्थ; खडतर
Pandharpur Wari | टाळ-मृदंगाच्या गजरात ज्ञानेश्वर माऊलींची पालखी सासवडकडे मार्गस्थ; खडतर दिवेघाट सर करत वारी चालली पंढरी
पवारांच्या घरी पुन्हा वाजणार सनई-चौघडे, पार्थ पवारांचं लग्न ठरलं,
पवारांच्या घरी पुन्हा वाजणार सनई-चौघडे, पार्थ पवारांचं लग्न ठरलं, कोण आहे पवार कुटुंबातील होणारी सून?