AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rain : राज्यात आतापर्यंत कसा झाला पाऊस, कुठे कमी पडली सरासरी

Pune and Mumbai Rain : राज्यात मान्सूनचे आगमन होऊन दोन आठवडे झाले आहेत. परंतु राज्यात सर्वत्र मान्सून पुरेसा बरसलाच नाही. काही ठिकाणीच पाऊस झाला तर इतर ठिकाणी सरासरीपेक्षाही कमी पाऊस झाला आहे.

Rain : राज्यात आतापर्यंत कसा झाला पाऊस, कुठे कमी पडली सरासरी
| Updated on: Jul 09, 2023 | 10:29 AM
Share

प्रदीप कापसे, पुणे : राज्यात बिपरजॉयमुळे यंदा मान्सून उशिराने दाखल झाला. नेहमी ७ जूनपर्यंत राज्यभरात पसरणारा मान्सून २५ जून रोजी राज्यात आला. त्यानंतर तो सर्वत्र बरसलाच नाही. काही ठिकाणी सरासरीइतका पाऊस झाला. यामुळे राज्यात आत्तापर्यंत सरासरीपेक्षा 27 टक्के कमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडल्याची माहिती पुणे हवामान विभागाकडून देण्यात आली.

का कमी झाला पाऊस

यंदाच्या मोसमी पावसावर “एल निनो”चे सावट आहे. प्रशांत महासागरात एल निनो स्थिती निर्माण झाली आहे. एल निनोमुळे मोसमी पाऊस कमी पडण्याची शक्यता आहे. मात्र, हवामान विभागाच्या दीर्घकालीन अंदाजानुसार, देशात सरासरी इतकाच पाऊस पडण्याचा अंदाज आहे. राज्यात आतापर्यंत कोकणात सरासरी इतका पाऊस झाला आहे. तसेच ८ ते १२ जुलै दरम्यान मान्सून पुन्हा कमकुवत असणार असल्याचे हवामान विभागाचे शास्त्रज्ञ अनुप कश्यप यांनी म्हटले आहे. परंतु १२ जुलैनंतर पुन्हा मान्सून सक्रीय होणार आहे. त्यानंतर तीन ते चार दिवस राज्यात मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त केली आहे.

कुठे कमी झाला पाऊस

हिंगोली, अकोला, सांगली, जालनामध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. त्यानंतर चंद्रपूर, अमरावती, सातारा, पुणे, अहमदनगर, सोलापूर अन् जळगावमध्ये पावसाने सरासरी गाठली नाही. नागपूरमध्ये जवळपास आठवड्याभराच्या विश्रांतीनंतर रविवारी पुन्हा रिमझिम पावसाला सुरुवात झाली. जून महिन्यात विदर्भात पाऊस नसल्याने शेतकऱ्यांच्या पेरण्या खोळंबल्या होत्या. मात्र त्यानंतर पाऊस झाल्याने पेरण्या करण्यात आल्या होत्या. परंतु पावसाने आठवडाभराची चांगलीच उसंत घेतल्याने शेतकरी चिंतेत झाला होता, मात्र रात्रीपासून पुन्हा रिमझिम पावसाला सुरुवात झाल्यामुळे शेतकरी समाधानी आहे.

भंडारदरा पाणलोट क्षेत्रात पाऊस

भंडारदरा , मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात आता धो – धो पाऊस कोसळतोय. रविवारी या ठिकाणी पावसाचा जोर कायम होता. यामुळे भंडारदरा धरणाच्या जलसाठ्यात वाढ होऊ लागली आहे. आतापर्यंत हे धरण ६० टक्के भरले आहे. काही दिवसांच्या विश्रांतीनंतर गेल्या तीन दिवसांपासून भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे धबधबे प्रवाहीत झाले आहेत.

Follow Us
'...तर कॅबिनेट मंत्री पद मिळाले असते, पण,'...काय म्हणाले योगेश कदम?
'...तर कॅबिनेट मंत्री पद मिळाले असते, पण,'...काय म्हणाले योगेश कदम?.
जुन्या वादातून शेजाऱ्यांनी 7 वर्षांच्या मुलीला संपवले, पलंगात मृतदेह..
जुन्या वादातून शेजाऱ्यांनी 7 वर्षांच्या मुलीला संपवले, पलंगात मृतदेह...
भोंदूबाबाचे साटेलोटे, मुलीसोबत उपजिल्हाधिकाऱ्याच्या पतीची जमीन खरेदी
भोंदूबाबाचे साटेलोटे, मुलीसोबत उपजिल्हाधिकाऱ्याच्या पतीची जमीन खरेदी.
भोंदूबाबाच्या विरोधात आणखी एका महिलेची तक्रार,निर्लज्जतेचा कळसच गाठला
भोंदूबाबाच्या विरोधात आणखी एका महिलेची तक्रार,निर्लज्जतेचा कळसच गाठला.
भोंदूबाबा खरात याला एसआयटीने अज्ञातस्थळी हलवले, काय नेमके कारण?
भोंदूबाबा खरात याला एसआयटीने अज्ञातस्थळी हलवले, काय नेमके कारण?.
उद्धव ठाकरे यांचे मातोश्रीत खासदारांशी गुफ्तगू , डॅमेज कंट्रोलसाठी ?
उद्धव ठाकरे यांचे मातोश्रीत खासदारांशी गुफ्तगू , डॅमेज कंट्रोलसाठी ?.
चाकणकरांना खरात लिंग पिसाट आहे हे माहिती होते, तृप्ती देसाई यांचा आरोप
चाकणकरांना खरात लिंग पिसाट आहे हे माहिती होते, तृप्ती देसाई यांचा आरोप.
अशोक खरातला धरणाचे पाणी कोणी दिलं ? मुख्यमंत्र्यांनी काय दिला इशारा?
अशोक खरातला धरणाचे पाणी कोणी दिलं ? मुख्यमंत्र्यांनी काय दिला इशारा?.
भोंदूबाबाला जमीन विकल्यानंतर मुलगा आणि पैसेही गेले,शेतकऱ्याने सांगितले
भोंदूबाबाला जमीन विकल्यानंतर मुलगा आणि पैसेही गेले,शेतकऱ्याने सांगितले.
दर अमावस्या आणि पौर्णिमेला खरात गावात यायचा, गावकऱ्यांनी मांडली व्यथा
दर अमावस्या आणि पौर्णिमेला खरात गावात यायचा, गावकऱ्यांनी मांडली व्यथा.